शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

स्वातंत्र्य लढ्यात नेताजींचे योगदान महत्त्वपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 22:40 IST

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात ज्या थोरविरांनी कशाचीही पर्वा न करता उडी घेऊन भारताला स्वतंत्र करण्यात मोलाची भूमिका बजावली, त्या थोर वीरांमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव आघाडीने घेतले जाते.

ठळक मुद्देहंसराज अहीर : नेताजी सुभाषचंद्र बोस पुतळा सौदर्यीकरणाचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात ज्या थोरविरांनी कशाचीही पर्वा न करता उडी घेऊन भारताला स्वतंत्र करण्यात मोलाची भूमिका बजावली, त्या थोर वीरांमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव आघाडीने घेतले जाते. नेताजींचे स्वातंत्र्यलढयातील कार्य म्हत्वपूर्ण असून आजही प्रत्येक तरुणाला प्रेरणा देणारे, अन्यायाविरुद्ध हातात शस्त्र उठवायला लावणारे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या खासदार स्थानिक विकास निधीतून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेताजी चौक, बाबुपेठ येथील पुतळ्याचे नूतनीकरण व सौदर्यीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर व नेताजींचे नातू चंद्रकुमार बोस यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते.नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आंदोलनाची इंग्रजांनी धास्ती घेतली होती. नेताजींचे एकूण जीवनच देशभक्त क्रांतिकारकाचे व रोमांचकारी आहे. परदेशात जाऊन इतर मित्रराष्ट्रांच्या साह्याने त्यांनी प्रतिसरकार स्थापन केले. हे त्यांच्या धडाडीचे, संघटना कौशल्याचे, समयसूचकतेचे व मुत्सद्देगिरीचे निदर्शक आहे. त्यांचा स्वभाव दृढनिश्चयी व प्रसंगी कठोरही होता; तथापि त्यांचे वागणे मात्र सौजन्यशील व सौहार्देचे असे. मूळात त्यांचा कल आध्यात्मिक साधनेकडे होता. दूरदृष्टी, आत्मविश्वास, धडाडी आणि निर्भयता यांमुळे कोणत्याही प्रसंगी ते डगमगले नाहीत. आजच्या युवकांनी नेताजींचा आदर्श बाळगणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.