शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

सुरक्षा फलकांचा निव्वळ देखावाच..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 22:07 IST

वेकोलि कोळसा खाणीत पर्यावरण संतुलन व धुळ प्रदूषणावर आळा घालण्यासाठी लाखो रूपयांचा खर्च दरवर्षी केला जातो. मात्र खाणीतील पर्यावरणाची स्थिती बघता निव्वळ देखावा म्हणून पर्यावरण संतुलन व खननविषयी खाण परिसरात पर्यावरणाचे नियम सांगणारे फलक लावण्यात आले आहे.

ठळक मुद्देपर्यावरणाचे नियम धाब्यावरवेकोलि अधिकाऱ्यांचे दुर्लक्षनागरिकांमध्ये नाराजी

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : वेकोलि कोळसा खाणीत पर्यावरण संतुलन व धुळ प्रदूषणावर आळा घालण्यासाठी लाखो रूपयांचा खर्च दरवर्षी केला जातो. मात्र खाणीतील पर्यावरणाची स्थिती बघता निव्वळ देखावा म्हणून पर्यावरण संतुलन व खननविषयी खाण परिसरात पर्यावरणाचे नियम सांगणारे फलक लावण्यात आले आहे.राजुरा तालुक्यात बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या गोवरी वेकोलिमध्ये मोठ्या प्रमाणात भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहे. गोवरी, सास्ती, पोवनी व साखरी परिसरामध्ये धुळीचे प्रदूषण वाढल्याने नागरिक हैराण झालेत. वेकोलित पर्यावरण संतुलनाचे मोठमोठे फलक लावून वेकोलिच्या कोळसा खाणीत पर्यावरण सुरक्षित असल्याचा आव आणला जातो. जागतिक पर्यावरणदिनी कोळसा खाणीत पर्यावरणाच्या सुरक्षेसंबंधी वेकोलि प्रशासनाने गाजावाजा करून लाखो रूपयांची उधळपट्टी केली जात आहे. पण, वर्षभरातील पर्यावरण सुरक्षिततेचे काय, असा प्रश्न परिसरातील नागरिकांनी विचारला आहे.वेकोलि कोळसा खाणीत दरवर्षी सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. यात पर्यावरणाच्या सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे समजावून त्याचे तंतोतंत पालन करण्याचे सागिंतले जाते. कामगारांच्या सुरक्षेसंबंधी नियमांचे पालन करण्याची शपथही दिली जाते. पण, हा निव्वळ देखावा असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. पर्यावरणाची सुरक्षा जोपासण्यासाठी वेकोलिला वर्षाकाठी लाखो रूपयांचा खर्च करावा लागतो. मात्र प्रत्यक्षात वेकोलिच्या कोळसा खाण परिसरातील परिस्थिती वेगळीच आहे कोळसा खाणीत पर्यावरण संतुलनाचे कोणतेच नियम पाळले जात नाही.प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेकोलिला अनेकदा नोटीस दिली. या नोटीसांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या. पर्यावरण संतुलन राखण्याचे सर्व नियम पाळले जात नाही. पर्यावरणाच्या नियमांना तिलांजली देत वेकोलिने मागील अनेक वर्षांपासून कोट्यवधी रुपयांच्या कोळशाचे उत्पादन सुरू ठेवले आहे.कोळसा खाणीतील पर्यावरण संतुलन बिघडल्याने वेकोलि परिसरातील शेतीच दरवर्षीे मोठे नुकसान होते. मागील वर्षी या परिसरातील शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन लागवड केली होती. अल्प पाऊस व वाढत्या प्रदुषणाचाही अनिष्ट परिणाम पिकांवर झाला.यावर आळा घालणारी व वेकोलिला पर्यावरणाचा नियम सांगून धडा शिकविणारी सक्षम व कर्तव्यदक्ष यंत्रणा वेकोलिने अद्याप तयार केली नाही. त्यामुळे वेकोलिचे कोळसा उत्पादन पर्यावरणाच्या मुळावर उठले आहे.जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निसर्गप्रेमी व पर्यावरण सामाजिक संघटनांकडून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून पर्यावरणाचा संदेश दिला जाणार आहे. यामध्ये सामाजिक संघटनांचाही पुढाकार असतो. परंतु, पर्यावरणाचे सर्रास उल्लंघन करून करणाºया वेकोलिने केवळ फलक लावल्याचे परिसरात दिसून येत आहे.जागतिक पर्यावरण दिनी पर्यावरण बचाव संदेश५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. निसर्गप्रेमी व पर्यावरणाची सुरक्षितता जोपासणाऱ्या सामााजिक संघटनांकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. पर्यावरणाचा झपाट्याने होणारा ऱ्हास थांबविण्यासाठी ‘पर्यावरण बचाव’ चा संदेश दिला जातो. यासाठी सामाजिक संघटनांचा खुप मोलाचा वाटा आहे. पर्यावरणाचे जतन करणे सर्वांचे कर्तव्य आहे. त्यासाठी वेकोलिने सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून झटले पाहिजे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.वेकोलिमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्यामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. वातावरण सर्वत्र दूषित झाल्याने नागरिकांसह सजीव सृष्टीवर विघातक परिणाम झाला. त्यामुळे वेकोलिने पर्यावरण जोपासण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.- रिंकु मरस्कोल्हेनिसर्गप्रेमी मित्रमंडळ, राजुरा