शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

प्लास्टिक पिशव्यांच्या वापराकडे मनपाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 23:17 IST

राज्यात शासनाने प्लास्टिक बंदी जाहीर केल्यानंतर संबंधित प्रशासनासह महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काही दिवस कारवाईचा देखावा केला. आता मात्र शहरात सर्वत्र प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरु असून महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. याकडे महापौरांसह, पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे‘युझ अ‍ॅण्ड थ्रो’ची सवय : अधिकाऱ्यांचा कारवाईचा देखावा काही दिवसांतच विरला

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यात शासनाने प्लास्टिक बंदी जाहीर केल्यानंतर संबंधित प्रशासनासह महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काही दिवस कारवाईचा देखावा केला. आता मात्र शहरात सर्वत्र प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरु असून महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. याकडे महापौरांसह, पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे. युझ अ‍ॅण्ड थ्रो संस्कृतीची सवय जडलेल्या नागरिकांमुळे पर्यावरणाची मोठी हाणी होत आहे. दुसरीकडे प्लास्टिकच्या अनिर्बंध वापरावर शासकीय यंत्रणेचा अंकुश नसल्याने सर्वत्र खच पडला आहे.बाजारात ग्राहक सर्रास प्लास्टिक पिशव्यांची मागणी करतात. प्लास्टिकचा कचरा वाढू लागल्याने शासनाने त्यावर बंदी आणली. परंतु त्यानंतरही शासकीय यंत्रणेकडून अंमलबजावणी होत नसल्याने प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण आले नाही. वजनाने हलक्या असल्याने प्लास्टिक पिशव्या हवेबरोबर वाहत जावून पाणीसाठे, जंगल आणि जमिनीवर साचतात.मोकाट जनावरे, जलचर प्राणी अन्न समजून या प्लास्टिक पिशव्या गिळतात. आतड्यात प्लास्टिक साचल्याने त्यांचा मृत्यू होतो. पावसाळ्यात प्लास्टिक पिशव्यामुळे गटारे कोंबून पाणी साचते. डबके निर्माण झाल्याने डासांची पैदास होऊन रोगराई निर्माण होते. एवढेच नाही तर प्लास्टिकमधील पॉलीमर्स जमीन, पाणी व अन्नसाखळी दुषित करतात. ही मानवी आरोग्यासाठी अत्यंत हानीकारक बाब आहे. त्यासाठी प्लास्टिक पिशव्यांवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. प्लास्टिकच्या अतिवापराने आज विविध समस्या निर्माण झाल्या आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. या जंगलात वन्य प्राणी आहेत. हे प्राणी प्लास्टिकच्या विळख्यात सापडण्याची भिती आहे. वन्यप्राण्यांनी प्लास्टिक भक्षण केले तर त्यांनाही धोका होऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीने ठरविले तर प्लास्टिकपासून मुक्ती मिळू शकते.शासनाने राज्यात प्लास्टिक बंदी केली. ३५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांना ही बंदी आहे. मात्र सर्वत्र प्लास्टिक पिशव्यांचा वापर होताना दिसत आहे. या बंदीची ज्यांच्यावर जबाबदारी शासनाने सोपविली, त्यांनी काही दिवस देखावा केला. आता मात्र सदर कारवाई थंडावली आहे. जिल्ह्यासह शहरात राजरोसपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला आहे. त्यामुळे कारवाई करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे, यासाठी जनजागृतीची आवश्यकता आहे. यासोबतच कायद्याची अंमलबजावणी होणेही महत्त्वाचे आहे. मात्र यासाठी संबंधित अधिकारी, कर्मचाºयांची मानसिकता आवश्यक आहे. केवळ देखावा करून चालणार नाही, तर ठोक कारवाई करून कायमस्वरुपी बंदी घालणे महत्त्वाचे आहे.