शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

पराक्रमी आदिवासींची गाथा नव्याने लिहिण्याची गरज

By admin | Updated: January 12, 2015 22:46 IST

जन्मजातच आदिवासी जमात ही पराक्रमी आहे आणि साहित्याला कुठलीही जात नाही. परंतु जातीची विभागणी त्यांच्या-त्यांच्या कुलचिन्हावर विभागली आहे. म्हणून अशा चर्चासत्रांमधून

सुरेश द्वादशीवार यांचे प्रतिपादन : मूल येथे पार पडले एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रमूल : जन्मजातच आदिवासी जमात ही पराक्रमी आहे आणि साहित्याला कुठलीही जात नाही. परंतु जातीची विभागणी त्यांच्या-त्यांच्या कुलचिन्हावर विभागली आहे. म्हणून अशा चर्चासत्रांमधून आदिवासी जमातीची गाथा नव्याने संशोधन करुन लिहिण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ‘लोकमत’चे संपादक तथा ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी येथे केले.स्थानिक कर्मवीर महाविद्यालयात ‘मराठी साहित्यात आदिवासी साहित्याचे योगदान’ या विषयावर आयोजित केलेल्या एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सहकार महर्षी अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे यांनीही आपल्या अध्यक्षीय भाषणात शिक्षण आणि साहित्यातूनच समाजाला नवीन दिशा मिळत असते असे सांगितले. याप्रसंगी प्रमुख अतिथी प्रा. डॉ. राजन जयस्वाल, चर्चासत्राध्यक्ष मराठी संशोधन केंद्राच्या समन्वयक डॉ. माहेश्वरी गावित, मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. राममोहन बोकारे, सचिव अ‍ॅड. अनिल वैरागडे यांनीही आदिवासी साहित्यावर प्रकाश टाकला. तर चर्चासत्राचे आयोजन करण्यामागचा हेतू प्रास्ताविकामधून प्राचार्य डॉ. अ. ह. वानखेडे यांनी सांगितला. संचालन प्रा. धनराज खानोरकर यांनी केले.दुसऱ्या सत्रामध्ये आदिवासी साहित्याच्या प्रेरणा, स्वरून आणि आव्हाने यावर परिसंवाद घेण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. माधव सरकुंडे, प्रमुख वक्ते म्हणून डॉ. सौरभ सुमन, प्रभू राजगडकर उपस्थित होते. तिसऱ्या सत्रातील आदिवासी साहित्यातील ललित वाङमय या परिसंवादाचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रमोद मुनघाटे, सुप्रसिद्ध कवयित्री कुसूम अलाम यांनी सविस्तर चर्चा घडवून आणली. संचालन प्रा. मोक्षदा मनोहर यांनी केले. समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. राममनोहन बोकारे, सचिव अ‍ॅड. अनिल वैरागडे होते. समारोपीय वृत्तांतामधून प्रा. डॉ. माहेश्वरी गावित यांनी उपस्थित प्रतिनिधींना उद्बोधित केले. संचालन प्रा. रमेश पारेलवार यांनी केले तर आभार मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. अनिता वाळके यांनी मानले. चर्चासत्राचे आयोजन यशस्वी करण्यासाठी प्रा. कऱ्हाडे, कापगते, प्रा. बनकर, प्रा. हांडेकर, प्रा. ताजणे, प्रा.मासीरकर, प्रा. राजूरकर, प्रा. डोंगरवार, प्रा. मोरे, प्रा. चुदरी, प्रा. बुरांडे, प्रा. पडोळे, प्रा. गायकवाड, यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)