शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

बल्लारपुरातील चौकांमध्ये गतिरोधकाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:26 IST

बल्लारपूर : शहरात झालेले प्रशस्त रोड, त्यावर सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांची वर्दळ आणि विविध चौकांत गतिरोधक नसल्यामुळे वाढलेले अपघात, ...

बल्लारपूर : शहरात झालेले प्रशस्त रोड, त्यावर सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांची वर्दळ आणि विविध चौकांत गतिरोधक नसल्यामुळे वाढलेले अपघात, याची धास्ती घेऊन बल्लारपूरच्या नागरिकांनी चौकाचौकांत गतिरोधक बनविण्याची मागणी बांधकाम विभागाकडे केली आहे.

शहरातून राष्ट्रीय मार्ग गेल्यामुळे वाहनांची वर्दळ वाढली आहे. पेपर मिल ते बामणीपर्यंत अनेक चौक येतात. परंतु, या चौकात गतिरोधक नसल्यामुळे अपघातात वाढ झाली आहे. सामाजिक कार्यकर्ता रॉकी कांबळे यांनी सांगितले की आधी अनेक ठिकाणी गतिरोधक होते. परंतु ते काढण्यात आले आहे, त्या ठिकाणी पुन्हा गतिरोधक बनविण्याची आवश्यकता आहे. पेपर मिल, कलामंदिर, मिल गेट समोर, बालाजी काॅम्प्लेक्स समोर, नवीन बसस्थानकजवळ, जुना बस स्टॅन्डसमोर, सरकारी डेपोजवळ, बीटीएस प्लॉट मार्गावर, दिलासाग्राम, शाळेसमोर वस्ती विभागात गांधी पुतळ्याजवळ गतिरोधक जरुरी आहे.

बांधकाम विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन गतिरोधक बनविण्याची मागणी विशाल रामटेके, शरद वानखेडे, कुणाल आवळे, प्रतीक खोब्रागडे, आनंद गोंगले, प्रेम नगराळे, धम्मदीप वाळके, सुरेश वेलेकर, अजय रंगारी, विजय भैसारे, प्रशांत गोरघाटे, प्रफुल नगराळे, गौतम डांगे, प्रेमजित, उपरे विनय चिवंडे यांनी केली आहे.