शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

झाडे लावण्यासाठी त्यांच्यावर जीव लावणे गरजेचे

By admin | Updated: August 29, 2016 01:32 IST

१८२० मध्ये औद्योगिक क्रांती सुरू झाली. मात्र या १९५ वर्षांत ५० टक्के जंगल नष्ट झाले.

सुधीर मुनगंटीवार : राजुरा येथे एक हजार वृक्षांची लागवडचंद्रपूर : १८२० मध्ये औद्योगिक क्रांती सुरू झाली. मात्र या १९५ वर्षांत ५० टक्के जंगल नष्ट झाले. त्यामुळे ऋतूवर विपरित परिणाम झाला. त्याचे परिणाम आज आपल्याला भोगावे लागत आहे. आज पावसाळ्याच्या दिवसातसुध्दा गर्मीचा सामना करावा लागत आहे. ही वेळ आपणच आपल्यावर आणली आहे. वीरांगणा अमृतदेवी यांनी पर्यावरणासाठी जीव दिला. मात्र आज पर्यावरण रक्षणासाठी झाडे लावणे गरजेचे आहे व झाडे लावण्यासाठी त्यांच्यावर जीव लावणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील पवनी येथे भारतीय कोयला खदान मजदूर संघ वर्धा व्हॅली यांच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्य रविवारी आयोजित एक हजार रोपांची लागवड करण्याच्या कार्यक्रमात वनमंत्री मुनगंटीवार बोलत होते. यावेळी आ. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, साखरी येथील सरपंच भाऊ कोडापे, भारतीय कोयला खदान मजदूर संघ वर्धा व्हॅलीचे महामंत्री रमेश बल्लेवार, दिलीप सातपुते, अनिल बंडीवार आदी उपस्थित होते. ना. मुनगंटीवार म्हणाले की, भारतीय कोयला खदान मजदूर संघ वर्धा व्हॅली यांनी एक हजार रोपांची लागवड करण्याचा केलेला संकल्प अतिशय महत्त्वपूर्ण व अभिनंदनीय आहे. राज्यात दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प आपण पूर्ण केला असून राज्य शासनाने वृक्ष लागवडीसंदर्भात नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. येत्या तीन वर्षांत ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प आपण केला आहे. हे लोकसहभागाशिवाय निश्चितच शक्य नाही. जनतेने ठरविले तर काहीही अशक्य नाही. वन विभागाच्या माध्यमातून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय आम्ही घेतले आहेत. राजुरा विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने येणाऱ्या काळात आवश्यक तो निधी आपण उपलब्ध करून देऊ. राजूरा विधानसभा क्षेत्राचा चेहरा-मोहरा बदलविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही वनमंत्री मुनगंटीवार यांनी दिली. यावेळी आ. संजय धोटे, माजी आमदार सुभाष धोटे यांचीही समयोचित भाषणे झालीत. कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.(प्रतिनिधी)