शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

झाडे लावण्यासाठी त्यांच्यावर जीव लावणे गरजेचे

By admin | Updated: August 29, 2016 01:32 IST

१८२० मध्ये औद्योगिक क्रांती सुरू झाली. मात्र या १९५ वर्षांत ५० टक्के जंगल नष्ट झाले.

सुधीर मुनगंटीवार : राजुरा येथे एक हजार वृक्षांची लागवडचंद्रपूर : १८२० मध्ये औद्योगिक क्रांती सुरू झाली. मात्र या १९५ वर्षांत ५० टक्के जंगल नष्ट झाले. त्यामुळे ऋतूवर विपरित परिणाम झाला. त्याचे परिणाम आज आपल्याला भोगावे लागत आहे. आज पावसाळ्याच्या दिवसातसुध्दा गर्मीचा सामना करावा लागत आहे. ही वेळ आपणच आपल्यावर आणली आहे. वीरांगणा अमृतदेवी यांनी पर्यावरणासाठी जीव दिला. मात्र आज पर्यावरण रक्षणासाठी झाडे लावणे गरजेचे आहे व झाडे लावण्यासाठी त्यांच्यावर जीव लावणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील पवनी येथे भारतीय कोयला खदान मजदूर संघ वर्धा व्हॅली यांच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्य रविवारी आयोजित एक हजार रोपांची लागवड करण्याच्या कार्यक्रमात वनमंत्री मुनगंटीवार बोलत होते. यावेळी आ. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, साखरी येथील सरपंच भाऊ कोडापे, भारतीय कोयला खदान मजदूर संघ वर्धा व्हॅलीचे महामंत्री रमेश बल्लेवार, दिलीप सातपुते, अनिल बंडीवार आदी उपस्थित होते. ना. मुनगंटीवार म्हणाले की, भारतीय कोयला खदान मजदूर संघ वर्धा व्हॅली यांनी एक हजार रोपांची लागवड करण्याचा केलेला संकल्प अतिशय महत्त्वपूर्ण व अभिनंदनीय आहे. राज्यात दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प आपण पूर्ण केला असून राज्य शासनाने वृक्ष लागवडीसंदर्भात नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. येत्या तीन वर्षांत ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प आपण केला आहे. हे लोकसहभागाशिवाय निश्चितच शक्य नाही. जनतेने ठरविले तर काहीही अशक्य नाही. वन विभागाच्या माध्यमातून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय आम्ही घेतले आहेत. राजुरा विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने येणाऱ्या काळात आवश्यक तो निधी आपण उपलब्ध करून देऊ. राजूरा विधानसभा क्षेत्राचा चेहरा-मोहरा बदलविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही वनमंत्री मुनगंटीवार यांनी दिली. यावेळी आ. संजय धोटे, माजी आमदार सुभाष धोटे यांचीही समयोचित भाषणे झालीत. कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.(प्रतिनिधी)