शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
3
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
4
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
5
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
6
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
7
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
8
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
9
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
10
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
11
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
12
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
13
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
14
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
15
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
16
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
17
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
18
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
20
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा

कोरपना, जिवती तालुक्यातील ‘त्या’ स्थळांना विकासाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2022 05:00 IST

कोरपना तालुक्यात पकडीगुड्डम धरण, घाटराई देवस्थान, सावलहिरा येथील भिमलकुंड धबधबा, भस्म नागाची खोरी व धबधबे,  जांभूळधरा येथे सात धबधबे, उमरहिरा येथे दोन धबधबे, मेहंदी येथे बोदबोदी धबधबा, जेवरा येथे खडक्या धबधबा, टांगळा धबधबा, घाटराई धबधबा आदी तर जिवती तालुक्यात माणिकगड किल्ला, सिंगारपठार धबधबा, चिखली धबधबा, नदप्पा धबधबा आदी पर्यटन स्थळे आहे. यातील मानिकगड किल्ला, पकडीगुद्दम धरण यांना पर्यटन स्थळाचा दर्जाही मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : निसर्ग संपन्न असलेल्या कोरपना व जिवती तालुक्यातील अनेक स्थळे पर्यटनदृष्ट्या विकासापासून अद्यापही वंचितच आहे. त्यामुळे दोन्ही तालुके पर्यटन तालुके म्हणून घोषित करून पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यात यावे, अशी अपेक्षा पर्यटकांकडून व्यक्त केली जात आहे.एकीकडे माणिकगडचे उंच उंच पहाड तर दुसरीकडे वैनगंगा, वर्धा नदीचे निर्मल सान्निध्य लाभलेल्या या परिसरात पावसाळी पर्यटनासाठी सर्वदूर परिचित आहे. कोरपना तालुक्यात पकडीगुड्डम धरण, घाटराई देवस्थान, सावलहिरा येथील भिमलकुंड धबधबा, भस्म नागाची खोरी व धबधबे,  जांभूळधरा येथे सात धबधबे, उमरहिरा येथे दोन धबधबे, मेहंदी येथे बोदबोदी धबधबा, जेवरा येथे खडक्या धबधबा, टांगळा धबधबा, घाटराई धबधबा आदी तर जिवती तालुक्यात माणिकगड किल्ला, सिंगारपठार धबधबा, चिखली धबधबा, नदप्पा धबधबा आदी पर्यटन स्थळे आहे. यातील मानिकगड किल्ला, पकडीगुद्दम धरण यांना पर्यटन स्थळाचा दर्जाही मिळाला आहे. मात्र, माणिकगड किल्ला वगळता एकाही स्थळाचा पर्यटनदृष्ट्या विकास झाला नाही.यामध्ये वनसडी, पारडी येथील निजाम कालीन इन्स्पेक्शन बंगले, कोळशी बु. येथील निजामकालीन नाका, शेरज बु. येथील पोलीस ठाण्याची वास्तू, रूपापेठ, दुर्गाडी, चनई येथील गोंडकालीन गढी, कारवाही येथील गुफा, शंकरलोधी येथील गुफा आदी स्थळेही पर्यटनासाठी चांगली आहेत.  

स्थानिकांना रोजगार तर वनविभागाला मिळणार उत्पन्नत्यामुळे ही स्थळे अनेक सोयी-सुविधापासून वंचित आहे. यातील बरचशी स्थळे वन क्षेत्रात आहे. त्यामुळे या स्थानी इको टुरिझमला वाव आहे. या माध्यमातून स्थानिकांना रोजगार व वन विभागाला आर्थिक उत्पन्नाचे स्रोत निर्माण होईल. या दृष्टीने येथे विकास करणे गरजेचे आहे. परंतु यासंदर्भात कुठलीच पावले उचलली जात नाही. दोन्ही तालुक्यांत अनेक पुरातन वास्तू व वारसे आहे. त्याच्याही जतन करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. काहींची तर साधी पुरातत्त्व विभागाच्या दप्तरी नोंदसुद्धा नाही. आता याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

 

टॅग्स :tourismपर्यटन