शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
2
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
3
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
4
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
5
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
6
सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार
7
Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
8
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
9
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
10
इतिहास विसरू नका... तुमचा जन्म आमच्यामुळे
11
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
12
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
13
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
14
नांदेडमधील चौघांच्या मृत्यूचे गूढ उकलले; आई-वडिलांना संपवून मुलांची आत्महत्या 
15
बाजार सुस्त, पण SIP मस्त! दरमहा १०,००० रुपयांच्या एसआयपीने व्हाल कोट्यधीश; वाचा सोपं गणित
16
दोन पत्नींच्या कचाट्यात सापडला बेरोजगार पती! स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; १९ दिवसांनी दिल्लीत जे घडलं...
17
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
18
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
19
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

गरज देशात, कोटींची घोषणा नेपाळात

By admin | Updated: August 4, 2014 23:38 IST

देशातील विकासासाठी निधीची गरज असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळमध्ये १० हजार कोटी रूपये देण्याची घोषणा करत आहेत. चंद्रपूर-गडचिरोलीसारख्या मागास भागात किंवा

अजित पवारांची मोदींवर टीका : चंद्रपुरातील राकाँचा मेळावाचंद्रपूर : देशातील विकासासाठी निधीची गरज असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळमध्ये १० हजार कोटी रूपये देण्याची घोषणा करत आहेत. चंद्रपूर-गडचिरोलीसारख्या मागास भागात किंवा जम्मू-काश्मिरात मदतीची गरज असताना ही मदत नेपाळमध्ये दिली जावी, हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी चंद्रपुरातील पक्षाच्या निर्धार मेळाव्यात उपस्थित केला.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे होते. गृहनिर्माण व पर्यावरण राज्यमंत्री सचिन अहीर प्रमुख्याने उपस्थित होते. यावेळी मोदींना टीकेचे लक्ष्य करून अजित पवार म्हणाले, देशाच्या संसदेचे सत्र सुरू असताना पंतप्रधान मात्र विदेश दौऱ्यावर आहेत. देशात अच्छे दिन आणू म्हणणाऱ्या त्यांच्या सरकारने अगदी महिनाभरात सर्वसामान्यांच्या रेल्वेचे भाडे वाढविले. महाराष्ट्रासारख्या राज्याचे बजेट ४५ हजार कोटींचे असताना एकट्या गुजरातसाठी त्यांनी आवश्यकता नसतानाही ६० हजार कोटींच्या बुलेट ट्रेनला मंजुरी दिली. ते पुढे म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जागावाटपावर काँग्रेससोबत चर्चा सुरू आहे. सन्मानजक जागावाटप झाले तर ठिक नाही तर मैदान आपलेच आहे. जागावाटप करताना स्थानिक स्वराज्य संस्थेतील संख्याबळाचा विचार व्हावा, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. लोकसभा निवडणुकीतील जागावाटपात काँग्रेसला २७ तर राष्ट्रवादीला २१ जागा मिळाल्या होत्या. त्यात त्यांनी दोन तर, आम्ही चार जिंकल्या. याचाही विचार व्हायला हवा. राज्य सरकारमधील सत्तापक्ष या नात्याने केलेल्या विकासाचा आणि सुरू केलेल्या योजनांचा उल्लेख त्यांनी केला. चंद्रपूर जिल्ह्यासाठी भरीव अर्थसहाय्य जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून ुदिल्याचा दावाही त्यांनी केला.राकाँचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनिल तटकरे यांनी गेल्या ३० वर्षातील राजकीय स्थितीचा आढावा भाषणातून घेतला. कृषी मंत्रीपदाच्या काळात शरद पवारांनी घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख केला. जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी काँग्रेससोबत गेल्या निवडणुकीत मैत्री केली होती. या वेळीही त्यासाठीच मैत्रीचा हात पुढे केला असला तरी आमचा स्वाभिमान कायम आहे. जागावाटपात अधिक जागा मिळाल्या पाहिजे, असे ते म्हणाले.ना. सचिन अहीर म्हणाले, राष्ट्रवादीने समाजातील सर्व घटाकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. लोकसभेत पराभव झाला असला तरी विधानसभेतील यशासाठी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. मुंबईतील मनपा चालविता येत नाही ते महाराष्ट्र कसा काय चालविणार, अशी कोपरखळीही त्यांनी शिवसेनेला मारली. महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा जोशी, जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब साळुंंखे यांचीही भाषणे झालीत. मंचावर अ‍ॅड. एकनाथराव साळवे, अ‍ॅड. बाबा वासाडे, मोरेश्वर टेमुर्डे, अ‍ॅड. गोंिवंद भेंडारकर, शोभाताई पोटदुखे, सुदर्शन निमकर, अमर बोडलावार आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)