शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

कोरपना तालुुक्यात पैनगंगा नदीवर बॅरेज बंधाऱ्याची गरज

By admin | Updated: November 18, 2014 22:53 IST

शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनासाठी वरदान ठरणाऱ्या ‘निम्म पैनगंगा प्रकल्पाचे काम मार्गी लागले आहे. महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा असलेला प्रकल्प आहे.

वनसडी : शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनासाठी वरदान ठरणाऱ्या ‘निम्म पैनगंगा प्रकल्पाचे काम मार्गी लागले आहे. महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा असलेला प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा हेतू साध्य ठरण्यासाठी कोरपना तालुक्यात पैनगंगा नदीवर बॅरेज बंधारे बांधण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. कोरपना तालुक्यातील परसोडा व चंद्रपूर तालुक्यातील वढा गावाजवळ बॅरेज बंधारे बांधण्यात आल्यास याचा उपयोग येथील शेतकऱ्यांना होणार आहे. दोन दिवसांपूर्वी तेलंगणातील जैनथ मंडलच्या ‘गिम्मा’ गावात तेथील प्रशासनाने बैठक घेऊन बॅरेज बंधाऱ्यासाठी शेतकऱ्यांची अनुमती मिळविली. तेथील शेतकरी यासाठी सकारात्मक आहे. हा भाग कोरपना तालुक्याला लागून आहे. पैनगंगा नदीदेखील तेथूनच वाहते. पुढे ती कोरपना तालुक्यात प्रवाहीत होते. पाण्याच्या नियोजनाच्या दृष्टिकोनातून या भागातही बॅरेज बंधारे बांधण्यात यावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून येथील शेतकऱ्यांकडून होत आहे. या भागात या दृष्टीने सर्व्हेक्षणही करण्यात आले आहे. मात्र या निर्मिती संदर्भात कोणत्याच सरकारकडून हालचाली होत नसल्याने काम रखडले आहे. या क्षेत्रातील कोरपना, राजुरा, वणी, चंद्रपूर, झरी तालुक्याअंतर्गत गावातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. तालुक्यातील ४० हजारापर्यंतचे धारणा क्षेत्र ओलीताखाली येऊ शकेल. याचा सर्वस्वी लाभ शेतकरी व नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा होईल. सध्या केंद्रात व राज्यात एकच शासन असल्याने मंजुरी मिळण्यास कुठलीच अडचण जाणार नाही. या दृष्टिकोनातून शासनस्तरावर गतीमान हालचाली होणे गरजेचे आहे. यासाठी सिंचन विभाग व लोकप्रतिनिधी यांच्या प्रचंड इच्छाशक्तीची गरज आहे. येथे त्वरित बॅरेज बंधाऱ्याविषयीच्या निर्मितीसाठी पाऊले उचलण्यात यावी, अशी मागणी आहे. (वार्ताहर)