शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

माणिकगडावरील भुयार उपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 23:45 IST

गेल्या अनेक वर्षापासून व पुरातन काळापासून बंद असलेला भुयारी रस्त्याचा शोध लावण्यात जिवती वनविभागाला यश मिळाले मात्र, भुयारी रस्त्याकडे पुरातत्त्व विभागाने लक्ष दिले नाही.

ठळक मुद्देपुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष : ऐतिहासिक वारशावर संशोधन करण्याची गरज

शंकर चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती: गेल्या अनेक वर्षापासून व पुरातन काळापासून बंद असलेला भुयारी रस्त्याचा शोध लावण्यात जिवती वनविभागाला यश मिळाले मात्र, भुयारी रस्त्याकडे पुरातत्त्व विभागाने लक्ष दिले नाही. त्यामुळे ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित राहिला आहे.माणिकगड किल्ल्यावर चढताना पहिल्या प्रवेशद्वारावरील हरिण गेटच्या मागच्या बाजूस भुयारी रस्ता बंद झाल्याची माहिती उजेडात आली. त्यामुळे वनविभागाने मोहीम राबवून भुयारी मार्ग शोधण्यात यश मिळविले. त्या भुयारी रस्त्याकडे पुरातत्त्व विभागाने लक्ष दिले नसल्याने ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित राहिला आहे. भुयारी रस्त्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणपतीचे चित्र कोरलेले असल्याचे आढळून आले. याबाबत वनविभागाने पुरातत्व विभागाला तातडीने कळविले व भुयारी मार्ग मोकळा करावा व हा भुयारी मार्ग नेमका कशासाठी तयार केले आणि कुठे जातो, यावर संशोधन करण्याची गरज आहे. या परिसरात अनेक ऐतिहासिक वास्तु आहेत. नव्या पिढीला याची माहिती मिळावी, म्हणून अभ्यासकांनी पुुढाकार घेतला पाहिजे. शिवाय, पुरातत्त्व विभागाने या भुयारी मार्गाचा अभ्यास करून ऐतिहासिक माहिती पुढे आणली पाहिजे. मात्र, संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे या भुयाराकडे कुणाचेही लक्ष नाही. वनविभागाच्या माध्यमातून या भुयाराची माहिती परिसरातील जनतेला मिळाली. त्यानंतर पुरातत्त्व विभागाने संशोधकांची चमू पाठवून अभ्यास करणे गरजेचे होते. परंतु, सद्य:स्थितीत याकडे कुणाचेही लक्ष नाही. परिणामी, इतिहास दुर्लक्षित राहिला आहे.घोडपार्क ढासळतोयपुरातन काळाची साक्ष देत असलेल्या, घोडपार्क आणि राणीमहलचे संरक्षण भिंत प्रवेशद्वार पूर्णत: जमिनदोस्त झाले. विद्यार्थ्यांना अभ्यास करायला आता अवशेष शिल्लक राहिले नाहीत. किल्ल्याकडे दुर्लक्ष होत राहिल्यास किल्ल्यावरील पुरातन वास्तू नष्ट होण्याचा धोका आहे.पायºयांचा मार्ग खडतरइतिहासाची साक्ष देणाºया माणिकगड किल्ल्यावरील वाढती वर्दळ पाहता येथील राणीमहल व पाताळ विहिरीकडे जाणाºया मार्गावर पायºयांचे काम पूर्ण करण्याची गरज आहे. मुख्य प्रवेशद्वारावरील पायव्याचे कामही अर्धवट असल्याने हा मार्ग पर्यटकांसाठी खडतर ठरत आहे.किल्ल्यावर बैठक व्यवस्थाच नाहीकिल्ल्याचा मार्ग किंवा पायºया चढताना पर्यटक व सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची दमछाक होते. किल्ल्याचा आनंद घेताना प्रत्येक ठिकाणी बसण्याची सोय हवी आहे. पण संबंधित विभागााचे लक्ष नाही. पर्यटकांना व सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.