शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

माणिकगडावरील भुयार उपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 23:45 IST

गेल्या अनेक वर्षापासून व पुरातन काळापासून बंद असलेला भुयारी रस्त्याचा शोध लावण्यात जिवती वनविभागाला यश मिळाले मात्र, भुयारी रस्त्याकडे पुरातत्त्व विभागाने लक्ष दिले नाही.

ठळक मुद्देपुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष : ऐतिहासिक वारशावर संशोधन करण्याची गरज

शंकर चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती: गेल्या अनेक वर्षापासून व पुरातन काळापासून बंद असलेला भुयारी रस्त्याचा शोध लावण्यात जिवती वनविभागाला यश मिळाले मात्र, भुयारी रस्त्याकडे पुरातत्त्व विभागाने लक्ष दिले नाही. त्यामुळे ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित राहिला आहे.माणिकगड किल्ल्यावर चढताना पहिल्या प्रवेशद्वारावरील हरिण गेटच्या मागच्या बाजूस भुयारी रस्ता बंद झाल्याची माहिती उजेडात आली. त्यामुळे वनविभागाने मोहीम राबवून भुयारी मार्ग शोधण्यात यश मिळविले. त्या भुयारी रस्त्याकडे पुरातत्त्व विभागाने लक्ष दिले नसल्याने ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित राहिला आहे. भुयारी रस्त्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणपतीचे चित्र कोरलेले असल्याचे आढळून आले. याबाबत वनविभागाने पुरातत्व विभागाला तातडीने कळविले व भुयारी मार्ग मोकळा करावा व हा भुयारी मार्ग नेमका कशासाठी तयार केले आणि कुठे जातो, यावर संशोधन करण्याची गरज आहे. या परिसरात अनेक ऐतिहासिक वास्तु आहेत. नव्या पिढीला याची माहिती मिळावी, म्हणून अभ्यासकांनी पुुढाकार घेतला पाहिजे. शिवाय, पुरातत्त्व विभागाने या भुयारी मार्गाचा अभ्यास करून ऐतिहासिक माहिती पुढे आणली पाहिजे. मात्र, संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे या भुयाराकडे कुणाचेही लक्ष नाही. वनविभागाच्या माध्यमातून या भुयाराची माहिती परिसरातील जनतेला मिळाली. त्यानंतर पुरातत्त्व विभागाने संशोधकांची चमू पाठवून अभ्यास करणे गरजेचे होते. परंतु, सद्य:स्थितीत याकडे कुणाचेही लक्ष नाही. परिणामी, इतिहास दुर्लक्षित राहिला आहे.घोडपार्क ढासळतोयपुरातन काळाची साक्ष देत असलेल्या, घोडपार्क आणि राणीमहलचे संरक्षण भिंत प्रवेशद्वार पूर्णत: जमिनदोस्त झाले. विद्यार्थ्यांना अभ्यास करायला आता अवशेष शिल्लक राहिले नाहीत. किल्ल्याकडे दुर्लक्ष होत राहिल्यास किल्ल्यावरील पुरातन वास्तू नष्ट होण्याचा धोका आहे.पायºयांचा मार्ग खडतरइतिहासाची साक्ष देणाºया माणिकगड किल्ल्यावरील वाढती वर्दळ पाहता येथील राणीमहल व पाताळ विहिरीकडे जाणाºया मार्गावर पायºयांचे काम पूर्ण करण्याची गरज आहे. मुख्य प्रवेशद्वारावरील पायव्याचे कामही अर्धवट असल्याने हा मार्ग पर्यटकांसाठी खडतर ठरत आहे.किल्ल्यावर बैठक व्यवस्थाच नाहीकिल्ल्याचा मार्ग किंवा पायºया चढताना पर्यटक व सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची दमछाक होते. किल्ल्याचा आनंद घेताना प्रत्येक ठिकाणी बसण्याची सोय हवी आहे. पण संबंधित विभागााचे लक्ष नाही. पर्यटकांना व सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.