शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
3
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
4
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
5
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
6
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
7
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
8
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
10
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
11
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
12
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
13
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
14
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
15
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
16
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
18
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
19
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
20
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार

माणिकगडावरील भुयार उपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 23:45 IST

गेल्या अनेक वर्षापासून व पुरातन काळापासून बंद असलेला भुयारी रस्त्याचा शोध लावण्यात जिवती वनविभागाला यश मिळाले मात्र, भुयारी रस्त्याकडे पुरातत्त्व विभागाने लक्ष दिले नाही.

ठळक मुद्देपुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष : ऐतिहासिक वारशावर संशोधन करण्याची गरज

शंकर चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती: गेल्या अनेक वर्षापासून व पुरातन काळापासून बंद असलेला भुयारी रस्त्याचा शोध लावण्यात जिवती वनविभागाला यश मिळाले मात्र, भुयारी रस्त्याकडे पुरातत्त्व विभागाने लक्ष दिले नाही. त्यामुळे ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित राहिला आहे.माणिकगड किल्ल्यावर चढताना पहिल्या प्रवेशद्वारावरील हरिण गेटच्या मागच्या बाजूस भुयारी रस्ता बंद झाल्याची माहिती उजेडात आली. त्यामुळे वनविभागाने मोहीम राबवून भुयारी मार्ग शोधण्यात यश मिळविले. त्या भुयारी रस्त्याकडे पुरातत्त्व विभागाने लक्ष दिले नसल्याने ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित राहिला आहे. भुयारी रस्त्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणपतीचे चित्र कोरलेले असल्याचे आढळून आले. याबाबत वनविभागाने पुरातत्व विभागाला तातडीने कळविले व भुयारी मार्ग मोकळा करावा व हा भुयारी मार्ग नेमका कशासाठी तयार केले आणि कुठे जातो, यावर संशोधन करण्याची गरज आहे. या परिसरात अनेक ऐतिहासिक वास्तु आहेत. नव्या पिढीला याची माहिती मिळावी, म्हणून अभ्यासकांनी पुुढाकार घेतला पाहिजे. शिवाय, पुरातत्त्व विभागाने या भुयारी मार्गाचा अभ्यास करून ऐतिहासिक माहिती पुढे आणली पाहिजे. मात्र, संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे या भुयाराकडे कुणाचेही लक्ष नाही. वनविभागाच्या माध्यमातून या भुयाराची माहिती परिसरातील जनतेला मिळाली. त्यानंतर पुरातत्त्व विभागाने संशोधकांची चमू पाठवून अभ्यास करणे गरजेचे होते. परंतु, सद्य:स्थितीत याकडे कुणाचेही लक्ष नाही. परिणामी, इतिहास दुर्लक्षित राहिला आहे.घोडपार्क ढासळतोयपुरातन काळाची साक्ष देत असलेल्या, घोडपार्क आणि राणीमहलचे संरक्षण भिंत प्रवेशद्वार पूर्णत: जमिनदोस्त झाले. विद्यार्थ्यांना अभ्यास करायला आता अवशेष शिल्लक राहिले नाहीत. किल्ल्याकडे दुर्लक्ष होत राहिल्यास किल्ल्यावरील पुरातन वास्तू नष्ट होण्याचा धोका आहे.पायºयांचा मार्ग खडतरइतिहासाची साक्ष देणाºया माणिकगड किल्ल्यावरील वाढती वर्दळ पाहता येथील राणीमहल व पाताळ विहिरीकडे जाणाºया मार्गावर पायºयांचे काम पूर्ण करण्याची गरज आहे. मुख्य प्रवेशद्वारावरील पायव्याचे कामही अर्धवट असल्याने हा मार्ग पर्यटकांसाठी खडतर ठरत आहे.किल्ल्यावर बैठक व्यवस्थाच नाहीकिल्ल्याचा मार्ग किंवा पायºया चढताना पर्यटक व सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची दमछाक होते. किल्ल्याचा आनंद घेताना प्रत्येक ठिकाणी बसण्याची सोय हवी आहे. पण संबंधित विभागााचे लक्ष नाही. पर्यटकांना व सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.