शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

जिल्ह्यात अंदाजे सरासरी ७० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2017 00:50 IST

जिल्हा परिषदेच्या ५६ व १५ पंचायत समित्यांच्या ११२ जागांकरिता गुरूवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली.

२३ फेब्रुवारीला निकाल : ८३३ उमेदवारांचे भाग्य इव्हीएममध्ये मशीनबंदचंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या ५६ व १५ पंचायत समित्यांच्या ११२ जागांकरिता गुरूवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळ ५.३० वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ७० टक्के मतदान झाले. त्याद्वारे जिल्हा परिषदेच्या ३१५ आणि १५ पंचायत समित्यांच्या ५१८ उमेदवारांचे भाग्य इव्हीएम मशिनमध्ये बंद झाले. एक-दोन अपवाद वगळता जिल्ह्यात शांततेत मतदान करण्यात आले. आता २३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तोपर्यंत विविध तर्कवितर्क व्यक्त केले जाणार आहेत.जिल्ह्यात दुपारी १२.३० वाजतापर्यंत सरासरी २३ टक्के मतदान, १.३० वाजतापर्यंत ३९.३३ टक्के आणि ३.३० वाजतापर्यंत ५४.७५ टक्के झाले होते. त्यानंतर दुपारी १२.३० वाजेपर्यंत सर्वाधिक २८.५८ टक्के मतदान ब्रह्मपुरी तालुक्यात झाले होते. तर सर्वात कमी चंद्रपूर तालुक्यात १४.११ टक्के होते. दुपारी २.३० वाजतापर्यंत सर्वाधिक ४७.७३ टक्के मतदान पोंभुर्णा तालुक्यात आणि सर्वात कमी २३.७१ टक्के चंद्रपूर तालुक्यात झाले होते. तर दुपारी ३.३० वाजतापर्यंत सर्वाधिक नोंद ६३.७१ टक्के पोंभुर्णा तालुक्यात, त्या खालोखाल ६२.८९ टक्के सावली तालुक्यात आणि सर्वात कमी मतदान चंद्रपूर तालुक्यात ३७.३० टक्के झाले होते. मतदानानंतर पोलिंग पार्ट्या रात्री उशिरापर्यंत तालुका निवडणूक कार्यालयात पोहोचल्या नव्हत्या. दुर्गम भागातील मतदान पथके उशिरा आली. त्यामुळे मतदानाची अंतिम आकडेवारी मिळू शकलेली नाही. जिल्हा सहायक निवडणूक अधिकाऱ्यांनी अंदाजे ७० टक्के मतदान झाल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)