शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
2
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
3
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर सुविधा, कडेकोड सुरक्षा; प्रशासन सज्ज
4
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
5
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
6
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
7
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
8
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
9
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
10
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
11
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
12
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
13
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
14
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
15
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
16
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
17
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
18
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
19
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!

नक्षलवाद ही चळवळ नसून बंड

By admin | Updated: March 6, 2015 01:12 IST

नक्षलवाद ही चळवळ नसून ते देशविघातक बंड आहे. बंड शमविण्यासाठी सर्व भारतीयांनी सावधतेने लढणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन लोकमत नागपूर आवृत्तीचे संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी केले.

चंद्रपूर : नक्षलवाद ही चळवळ नसून ते देशविघातक बंड आहे. बंड शमविण्यासाठी सर्व भारतीयांनी सावधतेने लढणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन लोकमत नागपूर आवृत्तीचे संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी केले. सर्वोदय शिक्षण मंडळ द्वारा संचालित सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज आॅफ सोशल वर्क, पडोली व विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली पुरस्कृत ‘नक्षलवाद, आदिवासी विकास व शासकीय धोरण’ या विषयावर दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्र पार पडले. या चर्चासत्रात ते बोलत होते. चर्चासत्राचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनायक इरपाते यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री तथा सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शांताराम पोटदुखे होते. प्रमुख पाहुणे म्हणून लोकमतचे संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार, ज्येष्ठ पत्रकारदेवेंद्र गावंडे, आयोजक प्राचार्य डॉ. सुनिल साकुरे, चर्चासत्राचे समन्वयक प्रा. सुभाष गिरडे उपस्थित होते.प्रा. द्वादशीवार यांनी नक्षलवाद चळवळीचा इतिहास मांडून व घडामोडीचा आढावा सादर केला. त्यांनी सध्यास्थितीत घडलेल्या गोविंद पानसरे यांच्या हत्याकांडाविषयी चिंता व्यक्त केली. शांताराम पोटदुखे यांनी चंद्रपूर व गडचिरोली या दोन्ही जिल्ह्याने निसर्ग संपत्ती, जंगल, कोळसा खाणी इत्यादी धनसंपदा देशाला दिले आहे. या जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी शिक्षण, आरोग्य, दळणवळण, वीज या सुविधा शासनाने पुरविण्यास प्रयत्न केला. परंतु आदिवासी समाजाला रोजगार व आधुनिक तंत्रज्ञानाचा अभावामुळे समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे चर्चासत्रातून काही उपाययोजना आखता आल्यास चर्चासत्राचे फलीत होईल, असे सांगितले. संचालन प्रा. नरेंद्र टिकले यांनी केले. तर आभार प्रा. सुभाष गिरडे यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)