शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

नक्षलवाद ही चळवळ नसून बंड

By admin | Updated: March 6, 2015 01:12 IST

नक्षलवाद ही चळवळ नसून ते देशविघातक बंड आहे. बंड शमविण्यासाठी सर्व भारतीयांनी सावधतेने लढणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन लोकमत नागपूर आवृत्तीचे संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी केले.

चंद्रपूर : नक्षलवाद ही चळवळ नसून ते देशविघातक बंड आहे. बंड शमविण्यासाठी सर्व भारतीयांनी सावधतेने लढणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन लोकमत नागपूर आवृत्तीचे संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी केले. सर्वोदय शिक्षण मंडळ द्वारा संचालित सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज आॅफ सोशल वर्क, पडोली व विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली पुरस्कृत ‘नक्षलवाद, आदिवासी विकास व शासकीय धोरण’ या विषयावर दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्र पार पडले. या चर्चासत्रात ते बोलत होते. चर्चासत्राचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनायक इरपाते यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री तथा सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शांताराम पोटदुखे होते. प्रमुख पाहुणे म्हणून लोकमतचे संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार, ज्येष्ठ पत्रकारदेवेंद्र गावंडे, आयोजक प्राचार्य डॉ. सुनिल साकुरे, चर्चासत्राचे समन्वयक प्रा. सुभाष गिरडे उपस्थित होते.प्रा. द्वादशीवार यांनी नक्षलवाद चळवळीचा इतिहास मांडून व घडामोडीचा आढावा सादर केला. त्यांनी सध्यास्थितीत घडलेल्या गोविंद पानसरे यांच्या हत्याकांडाविषयी चिंता व्यक्त केली. शांताराम पोटदुखे यांनी चंद्रपूर व गडचिरोली या दोन्ही जिल्ह्याने निसर्ग संपत्ती, जंगल, कोळसा खाणी इत्यादी धनसंपदा देशाला दिले आहे. या जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी शिक्षण, आरोग्य, दळणवळण, वीज या सुविधा शासनाने पुरविण्यास प्रयत्न केला. परंतु आदिवासी समाजाला रोजगार व आधुनिक तंत्रज्ञानाचा अभावामुळे समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे चर्चासत्रातून काही उपाययोजना आखता आल्यास चर्चासत्राचे फलीत होईल, असे सांगितले. संचालन प्रा. नरेंद्र टिकले यांनी केले. तर आभार प्रा. सुभाष गिरडे यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)