शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
5
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
6
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
7
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
8
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
9
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
10
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
11
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
12
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
13
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
14
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
15
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
16
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
17
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
18
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
19
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
20
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले

पेपर मिलवरील अरिष्ट दूर करण्यासाठी पुगलियांच्या पुढाकारात नवचंडी यज्ञ

By admin | Updated: January 12, 2017 00:34 IST

बल्लारपूर पेपर मिल शहराची आर्थिक वाहिनी आहे. ५० वर्षांच्या कालावधीत पहिल्यांदाच या जागतिक स्तरावरच्या उद्योगावर अरिष्ट ओढवले.

बल्लारपूर पेपर मिल : शेकडो कामगारांची उपस्थितीअनेकश्वर मेश्राम बल्लारपूरबल्लारपूर पेपर मिल शहराची आर्थिक वाहिनी आहे. ५० वर्षांच्या कालावधीत पहिल्यांदाच या जागतिक स्तरावरच्या उद्योगावर अरिष्ट ओढवले. कच्च्या मालाअभावी हा उद्योग कधी चालू तर कधी बंद अवस्थेतून वाटचाल करीत आहे. परिणामी १० हजारावर कामगारावर उपासमारीचे संकट आले आहे. सरकारच्या न्याय दरबारातही निर्णय लागला नाही, अशातच नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधानांनी जाहीर करून ‘कॅशलेस’ व्यवहाराचे घोडे पुढे दामटले आहे. यामुळे कागद उद्योग आणखीच अडचणीत आला आहे. यावर सरकारला सद्बुध्दी यावी व बल्लारपूर पेपर मिलवर ओढावलेले अरिष्ट दूर करण्यासाठी नवचंडी हवन करून उद्योग शांतीसाठी यज्ञ करून साकडे घालण्यात आले.मागील दोन वर्षांपासून पेपर मिलच्या चालढकल धोरणामुळे कामगारासह त्यांचे कुटुंबिय हवालदिल झाले आहेत. संकटाचे निवारण करण्यासाठी पेपर मिल द्वारा समोरील श्री गणेश मंदिरासमोर मंगळवार व बुधवारी नवचंडी हवन करून यज्ञाच्या माध्यमातून उद्योगाला शांतीप्रदान करण्यासाठी देवाकडे साकडे घालण्यात आले. बुधवारच्या यज्ञ समारंभात बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेचे अध्यक्ष व माजी खासदार नरेश पुगलिया, बिल्ट ग्रॉफीक पेपर प्रा.लि.चे व्यवस्थापक व्यकंटश्वरलू, टी. पद्माराव, पेपर मिलचे अधिकारी रमेश यादव, आष्टीचे पेपर मिलचे कामगार प्रतिनिधी बॅनर्जी, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष गजानन गावंडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व कामगार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थितीत होते.बल्लारपूर पेपर मिल सुरळीत चालावी म्हणून कच्चा माल सरकारने उपलब्ध करून द्यावा म्हणून माजी खासदार नरेश पुगलिया यांनी शहरात तब्बल १४ दिवस धरणे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कामगारांनी या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहिले नाही. कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमुळे पेपर मिल अडचणीत आल्याची काही कामगारांची धारणा होती. वेतनात विलंब त्यांच्यामुळेच होत असल्याचा आरोपही काहींनी केला होता. मात्र प्रकरण वेगळेच होते. सरकारची भूमिका सहानुभूतीची व सहकार्य करण्याची असताना अंग काढून घेतल्याची होती. परिणामी जिल्ह्यातील पेपर मिल उद्योगासह अनेक उद्योग डबघाईस आले आहेत. याचा परिणाम कार्यरत कामगारावर झाला आहे. याकडे राज्य शासन आता तरी लक्ष देईल का, अशी चर्चा सुरू आहे. शहरात यज्ञाचीच चर्चा येथे कार्यरत १० हजारावर कामगारावरचे संकट दूर करण्यासाठी चक्क पेपर मिल परिसरात यज्ञ करण्यात आले. सगळे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर मानवी स्वभाव देवाकडे धावा करतो. याची प्रचिती बल्लारपूर पेपर मिलमधील यज्ञातून येते. बुधवारी दोन दिवसांच्या यज्ञाची सांगता झाली असून कामगारासह हजारो भाविकांनी येथील महाप्रसादाचा लाभ घेतला.