शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव स्पर्धेतून बाहेर!
2
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
3
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
4
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
5
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
6
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
7
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
8
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
9
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
10
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
11
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
12
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
13
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
14
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
15
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
16
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
17
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
18
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
19
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
20
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत

हजारो हेक्टर शेतीवर निसर्गाची वक्रदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 22:03 IST

शेतीला निसर्गाची साथ मिळत नसल्याने खरिपातील हजारो हेक्टर शेतीला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या १५-२० दिवसांपासून पाऊस अचानक गायब झाल्याने कृषीक्षेत्रावर अवकळा पसरली आहे. पावसाअभावी पिके करपायला लागली असून शेतकरी पुन्हा मोठ्या संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देपावसाअभावी पिके करपली : पाऊस झाला बेपत्ता

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : शेतीला निसर्गाची साथ मिळत नसल्याने खरिपातील हजारो हेक्टर शेतीला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या १५-२० दिवसांपासून पाऊस अचानक गायब झाल्याने कृषीक्षेत्रावर अवकळा पसरली आहे. पावसाअभावी पिके करपायला लागली असून शेतकरी पुन्हा मोठ्या संकटात सापडला आहे.खरीप हंगामाच्या सुरुवतीलाच पावसाने दमदार हजेरी लावल्याने यावर्षी चांगला पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज होता. पावसमाुळे उत्पादनात वाढ होईल, असे वाटत असतानाच ऐन वेळी पावसाने शेतकऱ्यांना हुलकावणी दिली आहे. सध्या पिकांच्या फळधारणेचा काळ आहे. परंतु गेल्या १५-२० दिवसांपासून पाऊस अचानक गायब झाल्याने पिकांना मोठा फटका बसला असून कापसाचे पीक करपायला लागले आहे. विदर्भ प्रांत कापूस पिकांसाठी प्रसिद्ध आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, जिवती, बल्लारपूर, भद्रावती, वरोरा तालुक्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कापूस शेतकºयांचे नगदी पीक आहे. यावर्षी उसनवारी व कर्ज काढून बहुतांश शेतकºयांनी शेती केली आहे. परंतु निसर्गाने ऐनवेळी खरिपाच्या पिकांना दगा दिला आहे. कपासीवर यावर्षी बोंडअळीचे सावट घोंगावत असताना अचानक पावसाने पाठ फिरविल्याने फळधारणेवर आलेली पिके करपायला लागली आहे. यावर्षी कपाशीला विविध रोगांनी ग्रासल्याने शेतकºयांनी पिकावर अतोनात खर्च केला आहे. मात्र परतीचा पाऊसही अचानक बेपत्ता झाल्याने खरिपातील पिकांचे आता कसे होणार, या विवंचनेत शेतकरी सापडले आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली आहे. जमिनीतील ओलावा आटून गेल्याने जमिनीला भेगा पडायला सुरुवात झाली आहे. आज उद्या पाऊस येईल, या आशेवर शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. परंतु पाऊस येण्याची कोणतीच चिन्हे दिसत नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. पाऊस आला नाही तर यावर्षी कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार असून त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. एकूणच शेतकऱ्यांवर मोठे संकट उभे ठाकले आहे.एका बॅगला तीन पोते सोयाबीनची उतारीसोयाबीनचा दाना भरण्यासाठी पावसाची गरज आहे. मात्र पाऊस आला नाही. त्यामुळे सोयाबीनचा दाना भरला नाही. पोकळ शेंगा लागल्या. शेतकºयांनी सोयाबीनवर खर्च केला. आता सोयाबीन काढणीला सुरुवात झाली असून एका बॅगला तीन पोते सोयाबीन उतारी मिळत असल्याने केलेला खर्च निघणार कसा, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.पावसाअभावी शेतातील पिके वाळायला लागली आहे. निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नसल्याने यावर्षी कापसाच्या उत्पादनात घट होणर असून शेतीवर केलेला खर्च भरुन निघेल की नाही, याची हमी शेतकऱ्यांजवळ नसल्याने शेतकरी आताच हतबल झाला आहे.-गणेश पाटील, शेतकरी भोयेगाव