शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

हजारो हेक्टर शेतीवर निसर्गाची वक्रदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 22:03 IST

शेतीला निसर्गाची साथ मिळत नसल्याने खरिपातील हजारो हेक्टर शेतीला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या १५-२० दिवसांपासून पाऊस अचानक गायब झाल्याने कृषीक्षेत्रावर अवकळा पसरली आहे. पावसाअभावी पिके करपायला लागली असून शेतकरी पुन्हा मोठ्या संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देपावसाअभावी पिके करपली : पाऊस झाला बेपत्ता

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : शेतीला निसर्गाची साथ मिळत नसल्याने खरिपातील हजारो हेक्टर शेतीला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या १५-२० दिवसांपासून पाऊस अचानक गायब झाल्याने कृषीक्षेत्रावर अवकळा पसरली आहे. पावसाअभावी पिके करपायला लागली असून शेतकरी पुन्हा मोठ्या संकटात सापडला आहे.खरीप हंगामाच्या सुरुवतीलाच पावसाने दमदार हजेरी लावल्याने यावर्षी चांगला पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज होता. पावसमाुळे उत्पादनात वाढ होईल, असे वाटत असतानाच ऐन वेळी पावसाने शेतकऱ्यांना हुलकावणी दिली आहे. सध्या पिकांच्या फळधारणेचा काळ आहे. परंतु गेल्या १५-२० दिवसांपासून पाऊस अचानक गायब झाल्याने पिकांना मोठा फटका बसला असून कापसाचे पीक करपायला लागले आहे. विदर्भ प्रांत कापूस पिकांसाठी प्रसिद्ध आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, जिवती, बल्लारपूर, भद्रावती, वरोरा तालुक्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कापूस शेतकºयांचे नगदी पीक आहे. यावर्षी उसनवारी व कर्ज काढून बहुतांश शेतकºयांनी शेती केली आहे. परंतु निसर्गाने ऐनवेळी खरिपाच्या पिकांना दगा दिला आहे. कपासीवर यावर्षी बोंडअळीचे सावट घोंगावत असताना अचानक पावसाने पाठ फिरविल्याने फळधारणेवर आलेली पिके करपायला लागली आहे. यावर्षी कपाशीला विविध रोगांनी ग्रासल्याने शेतकºयांनी पिकावर अतोनात खर्च केला आहे. मात्र परतीचा पाऊसही अचानक बेपत्ता झाल्याने खरिपातील पिकांचे आता कसे होणार, या विवंचनेत शेतकरी सापडले आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली आहे. जमिनीतील ओलावा आटून गेल्याने जमिनीला भेगा पडायला सुरुवात झाली आहे. आज उद्या पाऊस येईल, या आशेवर शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. परंतु पाऊस येण्याची कोणतीच चिन्हे दिसत नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. पाऊस आला नाही तर यावर्षी कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार असून त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. एकूणच शेतकऱ्यांवर मोठे संकट उभे ठाकले आहे.एका बॅगला तीन पोते सोयाबीनची उतारीसोयाबीनचा दाना भरण्यासाठी पावसाची गरज आहे. मात्र पाऊस आला नाही. त्यामुळे सोयाबीनचा दाना भरला नाही. पोकळ शेंगा लागल्या. शेतकºयांनी सोयाबीनवर खर्च केला. आता सोयाबीन काढणीला सुरुवात झाली असून एका बॅगला तीन पोते सोयाबीन उतारी मिळत असल्याने केलेला खर्च निघणार कसा, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.पावसाअभावी शेतातील पिके वाळायला लागली आहे. निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नसल्याने यावर्षी कापसाच्या उत्पादनात घट होणर असून शेतीवर केलेला खर्च भरुन निघेल की नाही, याची हमी शेतकऱ्यांजवळ नसल्याने शेतकरी आताच हतबल झाला आहे.-गणेश पाटील, शेतकरी भोयेगाव