शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

निसर्गाचा लहरीपणा अन् शासनाची उदासीनता

By admin | Updated: September 11, 2015 01:20 IST

शेतकऱ्यांची शेती दिवसेंदिवस बेभरवशाची होत चालली आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही.

कष्टकऱ्यांना ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा : शेतकऱ्यांचा जीव टांगणीला गोवरी : शेतकऱ्यांची शेती दिवसेंदिवस बेभरवशाची होत चालली आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. मागील वर्षीच्या तुलनेतत यावर्षी चांगला पाऊस येईल, असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते. हंगामाच्या सुरवातीला दोन दिवस चांगला पाऊस आला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र त्यानंतर पाऊस गायब झाला. त्यामुळे निसर्गाची अवकृपा आणि शासनाची उदासिनता शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे.आज, उद्या पाऊस येईल, या आशेवर बळीराजा असताना ऐनवेळी पावसाने हुलकावणी दिली. जमिनीत टाकलेले महागडे बियाणे अंकुरण्यापूर्वीच जमिनीत करपूण गेले. पै पै जुळवून उभी केलेली तुटपूंजी मिळकत शेतीवर खर्च झाली. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच निसर्गाने दगा दिल्याने उसनवारी करुन आणलेल्या कर्जाचा डोंगर पुन्हा वाढला आहे. वर्षभराचे गणित चुकल्याने शेतकऱ्यांचा वार्षिक बजेट कोलमडला आहे. शेतीत दिवस-रात्र मेहनत करुन शेवटी हातात काहीच येत नाही. त्यामुळे शेतकरी मनातून पार खचून गेला आहे. मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च, वाढत जाणारा कर्जाचा डोंगर आणि संसाराचा भार पेलताना शेतकऱ्यांची शक्ती दु:ख सहन करण्यापलीकडची झाली आहे.शेतीला दिवसेंदिवस येत असलेली अवकळा कायम असल्याने उत्तम शेती म्हणायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पिकांच्या फळधारणेसाठी सध्या पावसाची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांनी पिकांच्या वाढीसाठी महागडे रासायनिक खते दिले. मात्र सप्टेंबर महिन्यातच पाऊस गायब झाल्याचे चित्र दिसत असल्याने पुन्हा दुष्काळाचे सावट घोंगावत आहे. पावसाअभावी जमिनीला भेगा जात असल्याने त्याचा फटका शेतपिकांना बसत आहे. बहुतांश शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय उपलब्ध नसल्यामुळे त्यांना निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून शेती करावी लागते. सध्या शेतपिकांच्या वाढीचा व फळधारणेचा काळ आहे. शेतपिकांवर अज्ञात रोगाने अतीक्रमण केले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेती जंगल परिसरात असल्याने उभ्या पिकांत जंगली जनावरांचा धुमाकूळ सुरु आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत भरदिवसा उभे पीक उपटून मोठ्या प्रमाणात शेतपिकांची नासधूस सुरु आहे. मात्र त्यावर आळा घालणारी यंत्रणा शेतकऱ्यांकडे नसल्याने शेतकऱ्यांना पिकांच्या संरक्षणासाठी जीव धोक्यात घालून जागल करावी लागत आहे. शेतकऱ्यांविषयी शासकीय यंत्रणाच पांगळी झाल्याने बळीराजा हतबल झाला आहे. शेती पिकवूनही घामाचे दाम मिळत नसेल तर वर्षभर होत असलेली ससेहोलपट काय कामाची, असे एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहेत. (वार्ताहर)