शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गाचा लहरीपणा अन् शासनाची उदासीनता

By admin | Updated: September 11, 2015 01:20 IST

शेतकऱ्यांची शेती दिवसेंदिवस बेभरवशाची होत चालली आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही.

कष्टकऱ्यांना ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा : शेतकऱ्यांचा जीव टांगणीला गोवरी : शेतकऱ्यांची शेती दिवसेंदिवस बेभरवशाची होत चालली आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. मागील वर्षीच्या तुलनेतत यावर्षी चांगला पाऊस येईल, असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते. हंगामाच्या सुरवातीला दोन दिवस चांगला पाऊस आला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र त्यानंतर पाऊस गायब झाला. त्यामुळे निसर्गाची अवकृपा आणि शासनाची उदासिनता शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे.आज, उद्या पाऊस येईल, या आशेवर बळीराजा असताना ऐनवेळी पावसाने हुलकावणी दिली. जमिनीत टाकलेले महागडे बियाणे अंकुरण्यापूर्वीच जमिनीत करपूण गेले. पै पै जुळवून उभी केलेली तुटपूंजी मिळकत शेतीवर खर्च झाली. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच निसर्गाने दगा दिल्याने उसनवारी करुन आणलेल्या कर्जाचा डोंगर पुन्हा वाढला आहे. वर्षभराचे गणित चुकल्याने शेतकऱ्यांचा वार्षिक बजेट कोलमडला आहे. शेतीत दिवस-रात्र मेहनत करुन शेवटी हातात काहीच येत नाही. त्यामुळे शेतकरी मनातून पार खचून गेला आहे. मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च, वाढत जाणारा कर्जाचा डोंगर आणि संसाराचा भार पेलताना शेतकऱ्यांची शक्ती दु:ख सहन करण्यापलीकडची झाली आहे.शेतीला दिवसेंदिवस येत असलेली अवकळा कायम असल्याने उत्तम शेती म्हणायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पिकांच्या फळधारणेसाठी सध्या पावसाची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांनी पिकांच्या वाढीसाठी महागडे रासायनिक खते दिले. मात्र सप्टेंबर महिन्यातच पाऊस गायब झाल्याचे चित्र दिसत असल्याने पुन्हा दुष्काळाचे सावट घोंगावत आहे. पावसाअभावी जमिनीला भेगा जात असल्याने त्याचा फटका शेतपिकांना बसत आहे. बहुतांश शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय उपलब्ध नसल्यामुळे त्यांना निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून शेती करावी लागते. सध्या शेतपिकांच्या वाढीचा व फळधारणेचा काळ आहे. शेतपिकांवर अज्ञात रोगाने अतीक्रमण केले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेती जंगल परिसरात असल्याने उभ्या पिकांत जंगली जनावरांचा धुमाकूळ सुरु आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत भरदिवसा उभे पीक उपटून मोठ्या प्रमाणात शेतपिकांची नासधूस सुरु आहे. मात्र त्यावर आळा घालणारी यंत्रणा शेतकऱ्यांकडे नसल्याने शेतकऱ्यांना पिकांच्या संरक्षणासाठी जीव धोक्यात घालून जागल करावी लागत आहे. शेतकऱ्यांविषयी शासकीय यंत्रणाच पांगळी झाल्याने बळीराजा हतबल झाला आहे. शेती पिकवूनही घामाचे दाम मिळत नसेल तर वर्षभर होत असलेली ससेहोलपट काय कामाची, असे एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहेत. (वार्ताहर)