शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
3
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
4
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
5
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
6
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
7
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
8
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
9
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
10
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
11
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
12
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
13
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक
14
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
15
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
16
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
17
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
18
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
19
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
20
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?

रबीवर निसर्गाचा आघात

By admin | Updated: February 8, 2016 00:56 IST

शासन नेहमीच शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत आला आहे. आता निसर्गही शेतकऱ्यांवरच कोपू लागल्याचे दिसते.

थंडीच्या अभावाचा पिकांवर परिणामचंद्रपूर : शासन नेहमीच शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत आला आहे. आता निसर्गही शेतकऱ्यांवरच कोपू लागल्याचे दिसते. यंदा पावसाअभावी खरिपात शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सोसावे लागले. नैराश्यात असलेल्या अर्ध्या शेतकऱ्यांनी रबीकडे पाहिलेसुध्दा नाही. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा रबीचा पेरा निम्म्यावर आला. आता सिंचनाची सोय नाही आणि थंडीही पडली नाही. त्यामुळे उत्पादनातही ५० ते ६० टक्के घट येण्याची शक्यता आहे.यावर्षी खरीप हंगामावर शेतकऱ्यांच्या आशा होत्या. मात्र अत्यल्प पाऊस पडल्याने अनेकांना पेरणी करता आली नाही. तर ज्यांनी पेरणी केली त्यांची पिके पाण्याअभावी करपून गेली. धान पट्ट्यात अनेकांना रोवणी करता आली नाही. ज्यांनी केली त्यांची पिकेही शेवटच्या पाण्याअभावी करपली. त्यामुळे खरीप हंगामात यावर्षी ४० टक्के उत्पादन घटल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येते. असे असले तरी प्रत्यक्षात ५० ते ६० टक्के उत्पादन कमी झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. खरिप हंगामात जवळजवळ सर्वच शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. अनेकांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. बँका, सावकार व नातेवाईकांकडून घेतलेले कर्ज शेतकरी फेडू शकले नाही. कर्ज फेडले तर वर्षभर खाणार काय, हादेखील प्रश्न गंभीर. खरीपात बसलेला आघात अनेक शेतकरी सहन करू शकले नाही. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी रबी हंगामात पेरणी करायची हिंमतच दाखविली नाही. मात्र काहींनी आता रबी हंगामात पेरणी करून खरिपात झालेले नुकसान थोडेतरी भरून निघेल, या आशेपोटी रबी हंगाम करायची तयारी दर्शविली. रबी पीक पेरणीसाठी त्यांनी बियाण्यांची जुळवाजुळव केली. डोक्यावर कर्ज असतानाही आणखी दुसऱ्यांकडून हातउसणे पैसे घेत रबीची मशागत सुरू केली. हरभरा, ज्वारी, गहू, मका, लाखोळी आदी पिके रबी हंगामात घेतली जातात. मागील वर्षी जिल्ह्यात एक लाख १५ हजार हेक्टरवर रबीची पेरणी झाली होती. त्यावेळी शेतकऱ्यांना रबीतून उत्पादनही बऱ्यापैकी झाले होते. यावर्षीदेखील एक लाखांहून अधिक हेक्टरवर रबीचे कृषी विभागाने नियोजन केले होते. रबी हंगामात सर्वाधिक पेरणी वरोरा उपविभागात होणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज होता. वरोरा उपविभागात वरोरा, भद्रावती, चिमूर या तालुक्यांचा समावेश आहे. या उपविभागात ५२ हजार ६९० हेक्टर क्षेत्रावर रबी पीक पेरणीचे कृषी विभागाने नियोजन केले होते. मात्र कृषी विभागाचे हे नियोजन शेतकऱ्यांनी फोल ठरविले. यावर्षी रबीत मागील वर्षीच्या तुलने निम्म्यावरही पिकांची पेरणी झाली नाही. केवळ ६५ हजार हेक्टरवर रबीची पेरणी झाली आहे. यंदा पावसाळ्यात बऱ्यापैकी पाऊसच झाला नसल्याने सिंचनाचा प्रश्न निर्माण होणार याची आधीपासूनच भीती होती. ती खरीही ठरली. रबीत सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. शेतकऱ्यांना पीक जगविताना तारेवरची कसरत करावी लागली. तरीही पीक पाहिजे तसे शेतकऱ्यांना जगविता आले नाही. सद्यस्थितीत पिकांची स्थिती पाहिली की निसर्गाने रबी हंगामावर आघातच केल्याचे दिसून येते. यामुळे मोठ्या आशेने आणि हिंमतीने पिकांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना रबीतही जबर नुकसान सोसावे लागणार आहे.जमिनीत पाणी मुरलेच नाहीयंदा पाऊसच अत्यल्प पडल्याने जमिनीतही पाणी मुरु शकले नाही. नदी, तलाव, बोड्यात पाणी नाही. जिल्ह्यातील मोठ्या सिंचन प्रकल्पाचीही स्थिती नाजुक आहे. त्यामुळे रबीत पिकांना पाणी कुठून द्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला होता. कोरपना तालुक्यात पकडीगुड्डम व अंमलनाला धरणातून शेतकऱ्यांना पाणी देण्यात येते. मात्र यावेळी धरणातूनही कराराप्रमाणे पाणी देण्यात आले नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. यामुळे उत्पादन घटले आहे.