शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

जीवनदायिनी वर्धा नदीला डबक्याचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 23:51 IST

अनेक गावांची जीवनदायिनी असलेल्या वर्धा नदीचा नैसर्गिक प्रवाह बंद झाल्याने काही दिवसांपासून नदीला डबक्याचे स्वरूप आले आहे. यामुळे अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजनांवर परिणाम झाला आहे. भद्रावतीच्या इतिहासात पहिल्यांदाच भद्रावतीकरांना पाण्याच्या भीषण टंचाईचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देभीषण पाणीटंचाई : इतर गावांसह भद्रावतीचा पाणी पुरवठा प्रभावित

सचिन सरपटवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती (चंद्रपूर) : अनेक गावांची जीवनदायिनी असलेल्या वर्धा नदीचा नैसर्गिक प्रवाह बंद झाल्याने काही दिवसांपासून नदीला डबक्याचे स्वरूप आले आहे. यामुळे अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजनांवर परिणाम झाला आहे. भद्रावतीच्या इतिहासात पहिल्यांदाच भद्रावतीकरांना पाण्याच्या भीषण टंचाईचा सामना करावा लागत आहे. वर्धा नदीच्या पाण्याचा स्तर दररोज एक-एक फुट कमी होत आहे.नदीला लागूनच असलेल्या वेकोलिच्या मातीच्या ढिगाऱ्यांमुये नदीचे पात्र बुजले असून नदीचा प्रवाह बदलला आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी बेंबळा धरणातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी न. प. भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना केली असून येत्या दोन दिवसात सदर पाणी सुरू करण्याचे आश्वासनही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.भद्रावती न. प. क्षेत्रात एकूण सहा हजार ७०० नळधारक आहेत. भद्रावतीकरांना न. प. व्दारे दररोज ८ लाख लिटर पाणी पुरविण्यात येते. परंतु सध्या पाण्याची टंचाई लक्षात घेता सदर पाणीपुरवठ्याचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. भद्रावतीला यापूर्वी कधीच पाणी टंचाईला सामोरे जावे लागले नाही. मात्र आता वर्धा नदीलाच पाणी नसल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वेकोलिच्या एका खदानीमुळे पाणी अडवल्याने नदीची धार बंद झाल्याचे सांगण्यात येते. नदीचे पात्र कोरडे झाले असून ठिकठिकाणी पाण्याचे डबके निर्माण झाले आहे. नदीतील या डबक्यामधूनच न. प. व्दारे भद्रावतीकरांना पाणी पुरवठा केला जात आहे.मार्डा बॅरेजमधील पाणी सोडण्याचे निर्देशवर्धा नदीचा नैसर्गिक प्रवाह बंद होवून भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली असल्याने मार्डा बॅरेजमध्ये उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यातून २.०० दलघमी पाणी ११ मे ला वर्धा नदीमध्ये सोडण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मुख्यत: पिण्याच्या पाण्याची निकड लक्षात घेवून पाणी सोडण्याचे औद्योगिक संस्थांना पाटबंधारे विभागातर्फे कळविण्यात आले आहे.ओव्हरबर्डनमुळे पात्र बुजलेवर्धा नदीला अगदी लागूनच असलेल्या चारगा व नवीन कुनाडा कोळसा खदानीच्या ओव्हरबर्डनमुळे नदीचे पात्र बुजून गेले आहे. बºयाच ठिकाणी नदीचा प्रवाह बदलला आहे. ओव्हरबर्डनच्या मातीसोबत आलेले मोठ मोठे दगड आजही नदीच्या पात्रात दिसून येतात. वेकोलिव्दारे ओव्हरबर्डन सभोलताल गारलॅड नाली खोदणे आवश्यक आहे. ज्यामुळे माती नदीत जाणार नाही तर खोदलेल्या नालीत जमा होईल. त्यानंतर सदर नाल्या साफ करता येईल.नदीवरील बंधारा अडलावर्धा नदीमध्ये बंधारा बांधण्यासाठी न. प. भद्रावतीने पाटबंधारे विभागाकडे अर्ज केला. २५ लाख रूपये डिमांड भरण्यास सांगण्यात आले. पालिकेने रक्कमही भरली. परंतु त्यानंतर घोनाडा बॅरेज बंधाºयांच्या नावाखाली सदर बंधाºयांचा प्रस्ताव रद्द करण्यात आला. घोनाडा येथे बांधारा बांधण्यात येणार असून त्याचे बँक वॉटर तुमच्याकडे येईल, त्यामुळे तुम्हाला बंधारा बांधण्याचे कारण नसल्याचे पाटबंधारे विभागाकडून न. प. ला सांगण्यात आले. २५ लाखाची रक्कमही वापस करण्यात आली. पाटबंधारे विभागाकडून परवानगी न मिळाल्याने येथील बंधाºयांचे काम होऊ शकले नाही. या कामासाठी आलेली सात कोटीची रक्कम बँकेत जमा असून या सात कोटीमध्ये शहरासाठी २४ तास विजेसाठी एक्सप्रेस फिडर तसेच उर्वरित शहरासाठी पाईप लाईन मंजूर करण्यात यावी, अशी मागणी न. प.ने शासनाकडे आहे.वर्धा नदी आटल्याने पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. टंचाईमुळे काही दिवस मुबलक पाणी मिळणार नाही. पाणी वापराबाबत काटकसर करा. येत्या दोन दिवसात बेंबळा धरणाचे पाणी सोडण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.- अनिल धानोरकर, नगराध्यक्ष, भद्रावती

टॅग्स :Wardha Riverवर्धा नदी