शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सेंद्रीय कर्बाअभावी ढासळली जमिनीची प्रकृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:01 IST

जिल्ह्यात दरवर्षी खरीप हंगामात भात, सोयाबीन, कापूस आणि तूर लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. रब्बी हंगामातही गहू, हरभरा रब्बी ज्वारी, लाखोळी आणि इतर पिके ९३ हजार ७७ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जातात. यंदाच्या खरीप हंगामात कापूस १ लाख ८० हजार हेक्टर, सोयाबीन ५५ हजार हेक्टर आणि तूर ४४ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्याचे नियोजन आहे.

ठळक मुद्देमृद सर्वेक्षण व चाचणीचा निष्कर्ष : खरीप कापूस उत्पादनावर अनिष्ट परिणामाचे संकेत

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात २०१८ पासून दरवर्षी कापूस आणि सोयाबीन लागवड क्षेत्रात वाढत असताना जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळेने २०१९-२० या वर्षात तपासलेल्या ३ हजार २४९ नमुन्यातून सेंद्रीय कर्बाअभावी शेतजमिनीची प्रकृती ढासळत असल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ रासायनिक खतांचा वारेमाप भडीमार न करता गांडूळ खत, शेण खत आणि कंपोस्ट आदी सेंद्रीय खत वापरून जमिनीतून अन्नद्र्रव्य उपलब्ध करून दिले नाही तर खरीप हंगामातील हेक्टरी उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात दरवर्षी खरीप हंगामात भात, सोयाबीन, कापूस आणि तूर लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. रब्बी हंगामातही गहू, हरभरा रब्बी ज्वारी, लाखोळी आणि इतर पिके ९३ हजार ७७ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जातात. यंदाच्या खरीप हंगामात कापूस १ लाख ८० हजार हेक्टर, सोयाबीन ५५ हजार हेक्टर आणि तूर ४४ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्याचे नियोजन आहे.खरीप हंगामासाठी राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळेन १५ तालुक्यातील प्रत्येकी १ गाव याप्रमाणे ३ हजार २४९ मातीचे नमुने पथदर्शी म्हणून तपासण्यात आले होते. विशेष म्हणजे, आदर्श गाव (मॉडेल व्हिलेज) म्हणून या गावातील नमुन्यांची निवड केली आहे. सदर जमिनीत सेंद्रीय कर्ब अत्यंत कमी असल्याचे आढळून आले. जिल्ह्यातील शेतीच्या जमिनीत नत्राचे प्रमाण कमी, स्फुरद मध्यम तर पालाश भरपूर आहे. सेंद्रीय कर्बासोबतच सूक्ष्म मूलद्रव्यांचीही कमतरता असून तांबे, मंगल पुरेसे तर जस्त व लोह कमी असल्याचे जिल्हा मृद सर्वेक्षण व चाचणी प्रयोगशाळेच्या तपासणीतून स्पष्ट झाले आहे.सोयाबीनसाठी जमिनीत गंधकाची कमतरतासोयाबीन पिकासाठी जमिनीत गंधकाची कमतरता असल्याचे मृद सर्वेक्षण व चाचणी अहवाल सांगतो. गंधकाअभावी सोयाबीन दाणे परिपक्व होत नाही. दाण्याला चकाकी येण्यासाठी गंधकाची गरज आहे. तीन वर्षांपासून गंधक हा घटक पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने उत्पादनावर अनिष्ट परिणाम झाला आहे. काही शेतकरी जमीन तपासणी न करताच वारेमाप रासायनिक खतांचा वापर करतात. त्यामुळे जमिनीचा पोत खराब होत आहे. यंदा कापूस व सोयाबीन लागवड क्षेत्र वाढणार असले तरी जमिनीतील अन्न घटकांकडे दुर्लक्ष केल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो.मृद निष्कर्षानूसार पिकांसाठी जमिनीत अन्नद्रव्यांची कमतरता आहे. त्यासाठी योग्य शिफारशीही केल्या आहेत. शेतकºयांनी कृषी अधिकारी व प्रयोगशाळेचा सल्ला घेऊनच खतांचा वापर करावा. अनावश्यक रासायनिक खतांचा वापर कटाक्षाने टाळावा.- अनिल चावरे, जिल्हा मृद सरंक्षण व चाचणी अधिकारी, चंद्रपूर

टॅग्स :agricultureशेती