शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

सेंद्रीय कर्बाअभावी ढासळली जमिनीची प्रकृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:01 IST

जिल्ह्यात दरवर्षी खरीप हंगामात भात, सोयाबीन, कापूस आणि तूर लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. रब्बी हंगामातही गहू, हरभरा रब्बी ज्वारी, लाखोळी आणि इतर पिके ९३ हजार ७७ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जातात. यंदाच्या खरीप हंगामात कापूस १ लाख ८० हजार हेक्टर, सोयाबीन ५५ हजार हेक्टर आणि तूर ४४ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्याचे नियोजन आहे.

ठळक मुद्देमृद सर्वेक्षण व चाचणीचा निष्कर्ष : खरीप कापूस उत्पादनावर अनिष्ट परिणामाचे संकेत

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात २०१८ पासून दरवर्षी कापूस आणि सोयाबीन लागवड क्षेत्रात वाढत असताना जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळेने २०१९-२० या वर्षात तपासलेल्या ३ हजार २४९ नमुन्यातून सेंद्रीय कर्बाअभावी शेतजमिनीची प्रकृती ढासळत असल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ रासायनिक खतांचा वारेमाप भडीमार न करता गांडूळ खत, शेण खत आणि कंपोस्ट आदी सेंद्रीय खत वापरून जमिनीतून अन्नद्र्रव्य उपलब्ध करून दिले नाही तर खरीप हंगामातील हेक्टरी उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात दरवर्षी खरीप हंगामात भात, सोयाबीन, कापूस आणि तूर लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. रब्बी हंगामातही गहू, हरभरा रब्बी ज्वारी, लाखोळी आणि इतर पिके ९३ हजार ७७ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जातात. यंदाच्या खरीप हंगामात कापूस १ लाख ८० हजार हेक्टर, सोयाबीन ५५ हजार हेक्टर आणि तूर ४४ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्याचे नियोजन आहे.खरीप हंगामासाठी राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळेन १५ तालुक्यातील प्रत्येकी १ गाव याप्रमाणे ३ हजार २४९ मातीचे नमुने पथदर्शी म्हणून तपासण्यात आले होते. विशेष म्हणजे, आदर्श गाव (मॉडेल व्हिलेज) म्हणून या गावातील नमुन्यांची निवड केली आहे. सदर जमिनीत सेंद्रीय कर्ब अत्यंत कमी असल्याचे आढळून आले. जिल्ह्यातील शेतीच्या जमिनीत नत्राचे प्रमाण कमी, स्फुरद मध्यम तर पालाश भरपूर आहे. सेंद्रीय कर्बासोबतच सूक्ष्म मूलद्रव्यांचीही कमतरता असून तांबे, मंगल पुरेसे तर जस्त व लोह कमी असल्याचे जिल्हा मृद सर्वेक्षण व चाचणी प्रयोगशाळेच्या तपासणीतून स्पष्ट झाले आहे.सोयाबीनसाठी जमिनीत गंधकाची कमतरतासोयाबीन पिकासाठी जमिनीत गंधकाची कमतरता असल्याचे मृद सर्वेक्षण व चाचणी अहवाल सांगतो. गंधकाअभावी सोयाबीन दाणे परिपक्व होत नाही. दाण्याला चकाकी येण्यासाठी गंधकाची गरज आहे. तीन वर्षांपासून गंधक हा घटक पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने उत्पादनावर अनिष्ट परिणाम झाला आहे. काही शेतकरी जमीन तपासणी न करताच वारेमाप रासायनिक खतांचा वापर करतात. त्यामुळे जमिनीचा पोत खराब होत आहे. यंदा कापूस व सोयाबीन लागवड क्षेत्र वाढणार असले तरी जमिनीतील अन्न घटकांकडे दुर्लक्ष केल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो.मृद निष्कर्षानूसार पिकांसाठी जमिनीत अन्नद्रव्यांची कमतरता आहे. त्यासाठी योग्य शिफारशीही केल्या आहेत. शेतकºयांनी कृषी अधिकारी व प्रयोगशाळेचा सल्ला घेऊनच खतांचा वापर करावा. अनावश्यक रासायनिक खतांचा वापर कटाक्षाने टाळावा.- अनिल चावरे, जिल्हा मृद सरंक्षण व चाचणी अधिकारी, चंद्रपूर

टॅग्स :agricultureशेती