शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
4
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
5
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
6
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
7
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
8
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
9
दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
10
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
11
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
12
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
13
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
14
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
15
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
16
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
17
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
18
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
19
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
20
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ

नांदा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना नोटीस

By admin | Updated: November 18, 2014 22:52 IST

जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, इंग्रजी शाळांतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थी मागे पडू नये यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र काही

चंद्रपूर : जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, इंग्रजी शाळांतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थी मागे पडू नये यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र काही शाळांतील शिक्षक विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यांच्या उदासिन धोरणाचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. जिल्हा परिषद शाळा नांदा फाटा येथील शिक्षकांच्या अनियमिततेमुळे शिक्षणविभागाने कारणे दाखवा नोटीस बजावला आहे. एवढेच नाही तर विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांनाही खुलासा मागितला आहे.शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद शाळांतील गुणवत्ता वाढविण्याकडे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनीही तसे निर्देश दिले आहे. यामुळे शिक्षण विभाग सतर्क झाला असून शाळांना भेटी तसेच गुणवत्ता तपासणे सुरु केले आहे.जिल्हा परिषद शाळा नांदा फाटा येथे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रविकांत देशपांडे यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली असता अनेक त्रुट्या आढळून आल्या. यामध्ये सकाळी १० वाजता शिक्षकांना शाळेत उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र शिक्षक शाळेत उशिरा उपस्थित झाले. तर एक शिक्षक अनुपस्थित होते. परिपाठादरम्यान राष्ट्रगीत, प्रतिज्ञा घेण्यात आली. तेव्हा विद्यार्थ्यांना राष्ट्रगीत योग्य प्रकारे म्हणता येत नसल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. विद्यार्थी ‘सिंधु’ या शब्दाचा उच्चार ‘सिंध’ असा करतात. ‘उत्कल’ या शब्दाचा उच्चार ‘उच्छल’ असा करतात. ‘गुजरात’ या शब्दाचा उच्चार गुजराट असा करीत असून योग्य प्रकारे व अचुक लयबद्ध, एका सुरात म्हणत नसल्याचे पथकाने शिक्षकांना दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे, शिक्षकांनीही वार्षिक नियोजन केले असले तरी ते अचुक नाही. आॅगस्ट महिन्यात ४५ तासिका आहेत. परंतु घटक व उपघटकानुसार २९ तासिका नमूद केलेल्या आहे. काही शिक्षकांनी वार्षिक नियोजनसुद्धा दाखविले नाही. दैनिक पाठ टाचण काढलेले नाही. विशेष म्हणजे, शाळेची प्रतवारी ‘ड’ असून पथकाने खेद व्यक्त केला आहे. स्वच्छ भारत सुंदर विद्यालय, स्वच्छ भारत मिशन सप्ताह उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याचे दिसून आले नसल्याचेही म्हटले आहे.शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखांनाही दोषी ठरविण्यात आले असून त्यांना या प्रकरणी खुलासा मागविण्यात आला आहे. जिल्ह्यातील इतरही शाळांमध्ये पथकाच्या वतीने भेटी देण्यात येणार असून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक रविकांत देशपांडे यांनी म्हटले आहे.काही शिक्षकांच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम पडत आहे. त्यामुळे शिक्षकांनी आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडल्यास भविष्यात विद्यार्थ्यांची गुणवत्ता नक्कीच वाढतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (नगर प्रतिनिधी)