शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

१२ हजार १५७ शेतकऱ्यांची नावे ‘एनआयसी’वर अपलोडच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 22:27 IST

ऐन निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार २६ शेतकरी पात्र ठरतात. आतापर्यंत १ लाख २९ हजार ८६९ शेतकऱ्यांची नावे ‘एनआयसी’ वर अपलोड करण्यात आली.

ठळक मुद्देशेतकरी सन्मान निधी योजनेची कुर्मगती : पहिल्या टप्प्यातील लाभ मिळण्यास विलंब

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ऐन निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार २६ शेतकरी पात्र ठरतात. आतापर्यंत १ लाख २९ हजार ८६९ शेतकऱ्यांची नावे ‘एनआयसी’ वर अपलोड करण्यात आली. उर्वरित १२ हजार १५७ शेतकऱ्यांची नावे अपलोडविना आहेत. यामुळे पहिल्या टप्प्यातील २ हजार रूपयांचा लाभ मिळण्यास विलंब होणार आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांची नावे अपलोड करण्यात नागपूर विभागात जिल्ह्याचा सहावा क्रमांक आहे.केंद्र सरकारने निवडणुकीला एक महिन्याचा कालावधी शिल्लक असताना शेतकरी सन्मान योजनेची घोषणा करून १ डिसेंबर २०१८ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याचे जाहीर केले. केंद्राकडून यासंदर्भात राज्य सरकारला आदेश धडकताच जिल्हा प्रशासकीय यंत्रणेने अन्य कामे बाजूला सारून शेतकरी सन्मान योजनेसाठी शेतकऱ्यांची यादी तयार करण्याला प्राधान्य दिले. यादी तयार करून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २ हजार रूपये टाकण्याची प्रक्रिया पूर्ण करताना प्रशासनाची प्रचंड दमछाक होत आहे. यामुळे योजनेची अंमलबजावणी करताना सरकारने नीट होमवर्क केलेच नाही, याचा प्रत्यय येत आहे. जिल्ह्यात ३ लाख ६१ हजार ७९९ शेतकरी आहेत. यातील २ लाख ६० हजार ४६२ शेतकरी अल्पभूधारक गटात येतात. शेतकरी सन्मान योजनेच्या लाभासाठी दोन एकरची मर्यादा लागू केली. अल्पभूधारक शेतकऱ्यांमधून निकषानुसार निवड करताना महसूल विभागातील अधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. शेतकरी सन्मान निधी तीन टप्प्यात देण्याचे सरकारने जाहीर केले. परंतु, पात्र शेतकऱ्यांची नावे एनआयसीवर अपलोड करण्यासाठी विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली. शेतकरी सन्मान योजनेचे जिल्ह्यात आतापर्यंत जिल्ह्यात ४९.८६ टक्के काम झाल्याचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे.पहिल्या टप्प्यातील लाभार्थी किती ?आतापर्यंत १ लाख २९ हजार ८६९ शेतकऱ्यांची नावे एनआयसीवर अपलोड करण्यात प्रशासनाला शक्य झाले. पण, बँक खात्यात रक्कम जमा झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या नेमकी किती, हे प्रशासनाने अद्याप अधिकृत जाहीर केले नाही. १२ हजार १५७ नावे अपलोड करण्याची कामे सुरू असतानाच रविवारी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेकडे अन्य कामे सोपविण्यात आली. शेतकऱ्यांची नावे अपलोड करण्यात नागपूर विभागात चंद्रपूर जिल्ह्याचा सहावा क्रमांक आहे.