शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

१२ हजार १५७ शेतकऱ्यांची नावे ‘एनआयसी’वर अपलोडच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 22:27 IST

ऐन निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार २६ शेतकरी पात्र ठरतात. आतापर्यंत १ लाख २९ हजार ८६९ शेतकऱ्यांची नावे ‘एनआयसी’ वर अपलोड करण्यात आली.

ठळक मुद्देशेतकरी सन्मान निधी योजनेची कुर्मगती : पहिल्या टप्प्यातील लाभ मिळण्यास विलंब

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ऐन निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार २६ शेतकरी पात्र ठरतात. आतापर्यंत १ लाख २९ हजार ८६९ शेतकऱ्यांची नावे ‘एनआयसी’ वर अपलोड करण्यात आली. उर्वरित १२ हजार १५७ शेतकऱ्यांची नावे अपलोडविना आहेत. यामुळे पहिल्या टप्प्यातील २ हजार रूपयांचा लाभ मिळण्यास विलंब होणार आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांची नावे अपलोड करण्यात नागपूर विभागात जिल्ह्याचा सहावा क्रमांक आहे.केंद्र सरकारने निवडणुकीला एक महिन्याचा कालावधी शिल्लक असताना शेतकरी सन्मान योजनेची घोषणा करून १ डिसेंबर २०१८ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याचे जाहीर केले. केंद्राकडून यासंदर्भात राज्य सरकारला आदेश धडकताच जिल्हा प्रशासकीय यंत्रणेने अन्य कामे बाजूला सारून शेतकरी सन्मान योजनेसाठी शेतकऱ्यांची यादी तयार करण्याला प्राधान्य दिले. यादी तयार करून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २ हजार रूपये टाकण्याची प्रक्रिया पूर्ण करताना प्रशासनाची प्रचंड दमछाक होत आहे. यामुळे योजनेची अंमलबजावणी करताना सरकारने नीट होमवर्क केलेच नाही, याचा प्रत्यय येत आहे. जिल्ह्यात ३ लाख ६१ हजार ७९९ शेतकरी आहेत. यातील २ लाख ६० हजार ४६२ शेतकरी अल्पभूधारक गटात येतात. शेतकरी सन्मान योजनेच्या लाभासाठी दोन एकरची मर्यादा लागू केली. अल्पभूधारक शेतकऱ्यांमधून निकषानुसार निवड करताना महसूल विभागातील अधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. शेतकरी सन्मान निधी तीन टप्प्यात देण्याचे सरकारने जाहीर केले. परंतु, पात्र शेतकऱ्यांची नावे एनआयसीवर अपलोड करण्यासाठी विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली. शेतकरी सन्मान योजनेचे जिल्ह्यात आतापर्यंत जिल्ह्यात ४९.८६ टक्के काम झाल्याचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे.पहिल्या टप्प्यातील लाभार्थी किती ?आतापर्यंत १ लाख २९ हजार ८६९ शेतकऱ्यांची नावे एनआयसीवर अपलोड करण्यात प्रशासनाला शक्य झाले. पण, बँक खात्यात रक्कम जमा झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या नेमकी किती, हे प्रशासनाने अद्याप अधिकृत जाहीर केले नाही. १२ हजार १५७ नावे अपलोड करण्याची कामे सुरू असतानाच रविवारी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेकडे अन्य कामे सोपविण्यात आली. शेतकऱ्यांची नावे अपलोड करण्यात नागपूर विभागात चंद्रपूर जिल्ह्याचा सहावा क्रमांक आहे.