शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

१२ हजार १५७ शेतकऱ्यांची नावे ‘एनआयसी’वर अपलोडच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 22:27 IST

ऐन निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार २६ शेतकरी पात्र ठरतात. आतापर्यंत १ लाख २९ हजार ८६९ शेतकऱ्यांची नावे ‘एनआयसी’ वर अपलोड करण्यात आली.

ठळक मुद्देशेतकरी सन्मान निधी योजनेची कुर्मगती : पहिल्या टप्प्यातील लाभ मिळण्यास विलंब

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ऐन निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार २६ शेतकरी पात्र ठरतात. आतापर्यंत १ लाख २९ हजार ८६९ शेतकऱ्यांची नावे ‘एनआयसी’ वर अपलोड करण्यात आली. उर्वरित १२ हजार १५७ शेतकऱ्यांची नावे अपलोडविना आहेत. यामुळे पहिल्या टप्प्यातील २ हजार रूपयांचा लाभ मिळण्यास विलंब होणार आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांची नावे अपलोड करण्यात नागपूर विभागात जिल्ह्याचा सहावा क्रमांक आहे.केंद्र सरकारने निवडणुकीला एक महिन्याचा कालावधी शिल्लक असताना शेतकरी सन्मान योजनेची घोषणा करून १ डिसेंबर २०१८ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याचे जाहीर केले. केंद्राकडून यासंदर्भात राज्य सरकारला आदेश धडकताच जिल्हा प्रशासकीय यंत्रणेने अन्य कामे बाजूला सारून शेतकरी सन्मान योजनेसाठी शेतकऱ्यांची यादी तयार करण्याला प्राधान्य दिले. यादी तयार करून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २ हजार रूपये टाकण्याची प्रक्रिया पूर्ण करताना प्रशासनाची प्रचंड दमछाक होत आहे. यामुळे योजनेची अंमलबजावणी करताना सरकारने नीट होमवर्क केलेच नाही, याचा प्रत्यय येत आहे. जिल्ह्यात ३ लाख ६१ हजार ७९९ शेतकरी आहेत. यातील २ लाख ६० हजार ४६२ शेतकरी अल्पभूधारक गटात येतात. शेतकरी सन्मान योजनेच्या लाभासाठी दोन एकरची मर्यादा लागू केली. अल्पभूधारक शेतकऱ्यांमधून निकषानुसार निवड करताना महसूल विभागातील अधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. शेतकरी सन्मान निधी तीन टप्प्यात देण्याचे सरकारने जाहीर केले. परंतु, पात्र शेतकऱ्यांची नावे एनआयसीवर अपलोड करण्यासाठी विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली. शेतकरी सन्मान योजनेचे जिल्ह्यात आतापर्यंत जिल्ह्यात ४९.८६ टक्के काम झाल्याचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे.पहिल्या टप्प्यातील लाभार्थी किती ?आतापर्यंत १ लाख २९ हजार ८६९ शेतकऱ्यांची नावे एनआयसीवर अपलोड करण्यात प्रशासनाला शक्य झाले. पण, बँक खात्यात रक्कम जमा झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या नेमकी किती, हे प्रशासनाने अद्याप अधिकृत जाहीर केले नाही. १२ हजार १५७ नावे अपलोड करण्याची कामे सुरू असतानाच रविवारी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेकडे अन्य कामे सोपविण्यात आली. शेतकऱ्यांची नावे अपलोड करण्यात नागपूर विभागात चंद्रपूर जिल्ह्याचा सहावा क्रमांक आहे.