शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

जिल्ह्यातील दुकानांसमोर लावावा लागणार मराठीतून नामफलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2022 05:00 IST

कलम ३६ (क) (१) कलम ६ अन्वये नोंदीत प्रत्येक आस्थापनेत १० पेक्षा अधिक कामगार आहेत, अशा सर्व आस्थापनांचे नामफलक देवनागरी लिपीत मराठी भाषेत असेल. परंतु अशा आस्थापनेच्या नियोक्त्याकडील देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलक देखील असू शकतील.  मराठी भाषेतील अक्षर लेखन नामफलकावर सुरुवातीला लिहिणे अनिवार्य असेल मराठी भाषेतील अक्षराचा टंक आकार इतर भाषेतील अक्षराच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील प्रत्येक दुकान व आस्थापनांचे नामफलक आता मराठीतच ठेवणे अनिवार्य करण्याचा राज्य शासनाचा आदेश शुक्रवारी धडकला. या आदेशानुसार सहायक कामगार आयुक्तांनी यासंदर्भात नियमही जाहीर केले. दुकान व आस्थापना चालकांनी या नियमाचा भंग केल्यास कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. राज्यातील दुकान व आस्थापनांचे  नामफलक ठेवणे सक्तीचे केल्यानंतर महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम २०१७ मध्ये सुधारणा झाली. या अधिनियमाच्या कलम ७ अन्वये ज्या आस्थापनेत १० पेक्षा कमी कामगार आहेत. कलम ३६ (क) (१) कलम ६ अन्वये नोंदीत प्रत्येक आस्थापनेत १० पेक्षा अधिक कामगार आहेत, अशा सर्व आस्थापनांचे नामफलक देवनागरी लिपीत मराठी भाषेत असेल. परंतु अशा आस्थापनेच्या नियोक्त्याकडील देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलक देखील असू शकतील.  मराठी भाषेतील अक्षर लेखन नामफलकावर सुरुवातीला लिहिणे अनिवार्य असेल मराठी भाषेतील अक्षराचा टंक आकार इतर भाषेतील अक्षराच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही. 

अशा आहेत अटी - प्रत्येक दुकान किंवा आस्थापनेच्या नावाचा फलक मराठीत देवनागरी लिपीत आणि तीही अक्षरे सुरुवातीलाच असली पाहिजे. देवनागरी लिपीतला नावाचा फलक कमी उठावदार असणार नाही, याचीही दक्षता घ्यावी लागणार आहे.   

‘त्या‘ दोन उल्लेखांना प्रतिबंध- ज्या आस्थापनेतून मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते, अशा आस्थापना व नामफलकावर महान व्यक्तींची किंवा गडकिल्ल्यांची नावे लिहिता येणार नाही. असा बदल शासनाने १७ मार्च २०२२ रोजी या अधिनियमांतर्गत केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व आस्थापना मालकांनी तरतुदींचे  तंतोतंत पालन करावे. नियमाचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करू, अशी माहिती आवाहन सहायक कामगार आयुक्त श्रीमती भोईटे यांनी दिली.

सरकारचा निर्णय चांगला आहे. पण सक्ती करू नये, ती ऐच्छिक असावी. इंग्रजी वगळल्यास मराठी व हिंदी देवनागरी लिपीतच लिहिली जाते. नवीन नियमानुसार आता मराठी शब्द उठावदार राहील. आपण महाराष्ट्रात राहत असल्याने मराठीचा सन्मान झालाच पाहिजे. यातून एकतेची भावना वाढेल. -सदानंद खत्री, अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा व्यापारी महासंघ, चंद्रपूर

 

टॅग्स :marathiमराठी