शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील दुकानांसमोर लावावा लागणार मराठीतून नामफलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2022 05:00 IST

कलम ३६ (क) (१) कलम ६ अन्वये नोंदीत प्रत्येक आस्थापनेत १० पेक्षा अधिक कामगार आहेत, अशा सर्व आस्थापनांचे नामफलक देवनागरी लिपीत मराठी भाषेत असेल. परंतु अशा आस्थापनेच्या नियोक्त्याकडील देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलक देखील असू शकतील.  मराठी भाषेतील अक्षर लेखन नामफलकावर सुरुवातीला लिहिणे अनिवार्य असेल मराठी भाषेतील अक्षराचा टंक आकार इतर भाषेतील अक्षराच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील प्रत्येक दुकान व आस्थापनांचे नामफलक आता मराठीतच ठेवणे अनिवार्य करण्याचा राज्य शासनाचा आदेश शुक्रवारी धडकला. या आदेशानुसार सहायक कामगार आयुक्तांनी यासंदर्भात नियमही जाहीर केले. दुकान व आस्थापना चालकांनी या नियमाचा भंग केल्यास कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. राज्यातील दुकान व आस्थापनांचे  नामफलक ठेवणे सक्तीचे केल्यानंतर महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम २०१७ मध्ये सुधारणा झाली. या अधिनियमाच्या कलम ७ अन्वये ज्या आस्थापनेत १० पेक्षा कमी कामगार आहेत. कलम ३६ (क) (१) कलम ६ अन्वये नोंदीत प्रत्येक आस्थापनेत १० पेक्षा अधिक कामगार आहेत, अशा सर्व आस्थापनांचे नामफलक देवनागरी लिपीत मराठी भाषेत असेल. परंतु अशा आस्थापनेच्या नियोक्त्याकडील देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलक देखील असू शकतील.  मराठी भाषेतील अक्षर लेखन नामफलकावर सुरुवातीला लिहिणे अनिवार्य असेल मराठी भाषेतील अक्षराचा टंक आकार इतर भाषेतील अक्षराच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही. 

अशा आहेत अटी - प्रत्येक दुकान किंवा आस्थापनेच्या नावाचा फलक मराठीत देवनागरी लिपीत आणि तीही अक्षरे सुरुवातीलाच असली पाहिजे. देवनागरी लिपीतला नावाचा फलक कमी उठावदार असणार नाही, याचीही दक्षता घ्यावी लागणार आहे.   

‘त्या‘ दोन उल्लेखांना प्रतिबंध- ज्या आस्थापनेतून मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते, अशा आस्थापना व नामफलकावर महान व्यक्तींची किंवा गडकिल्ल्यांची नावे लिहिता येणार नाही. असा बदल शासनाने १७ मार्च २०२२ रोजी या अधिनियमांतर्गत केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व आस्थापना मालकांनी तरतुदींचे  तंतोतंत पालन करावे. नियमाचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करू, अशी माहिती आवाहन सहायक कामगार आयुक्त श्रीमती भोईटे यांनी दिली.

सरकारचा निर्णय चांगला आहे. पण सक्ती करू नये, ती ऐच्छिक असावी. इंग्रजी वगळल्यास मराठी व हिंदी देवनागरी लिपीतच लिहिली जाते. नवीन नियमानुसार आता मराठी शब्द उठावदार राहील. आपण महाराष्ट्रात राहत असल्याने मराठीचा सन्मान झालाच पाहिजे. यातून एकतेची भावना वाढेल. -सदानंद खत्री, अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा व्यापारी महासंघ, चंद्रपूर

 

टॅग्स :marathiमराठी