शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
8
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
9
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
10
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
11
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
12
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
13
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
14
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
15
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
16
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
18
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
19
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
20
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
Daily Top 2Weekly Top 5

नहराला भगदाड, पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 22:38 IST

पिकांना मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा व्हावा व शेतकरी राजा सुखी समृद्ध व्हावा, या हेतूने शासनाने गोसेखुर्द प्रकल्पाची निर्मिती केली. गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत उजवा कालव्याद्वारे शेकडो हेक्टर शेतीला पाणी पुरवठा केला जाते. परंतु, कंत्राटदाराने उजव्या कालव्याद्वारे छोट्या कालव्यांना पाणी निचरा होणाऱ्या पाईपलाईनचे काम निकृष्ठ दर्जाचे केल्यामुळे कालव्याच्या पाळीला मोठे भगदाड पडून छोट्या कालव्याचा पाणी पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे पाण्याअभावी पिके करपत असलेले चित्र ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगाव खुर्द येथे बघायला मिळत आहे.

ठळक मुद्देपिके करपली : गोसेखुर्दच्या छोट्या कालव्यांची स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : पिकांना मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा व्हावा व शेतकरी राजा सुखी समृद्ध व्हावा, या हेतूने शासनाने गोसेखुर्द प्रकल्पाची निर्मिती केली. गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत उजवा कालव्याद्वारे शेकडो हेक्टर शेतीला पाणी पुरवठा केला जाते. परंतु, कंत्राटदाराने उजव्या कालव्याद्वारे छोट्या कालव्यांना पाणी निचरा होणाऱ्या पाईपलाईनचे काम निकृष्ठ दर्जाचे केल्यामुळे कालव्याच्या पाळीला मोठे भगदाड पडून छोट्या कालव्याचा पाणी पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे पाण्याअभावी पिके करपत असलेले चित्र ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगाव खुर्द येथे बघायला मिळत आहे.ब्रह्मपुरी तालुक्यात सद्या शेतीचा हंगाम जोमात सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतात धान पिकांची लागवड केली आहे. पिकासाठी पाणी सोडल्यामुळे शेतीला मुबलक प्रमाणात पाणी मिळेल, अशा आशेत बळीराजा होता. मात्र उजव्या कालव्याद्वारे छोट्या कालव्यांना पाणी निचरा होणाºया पाईपलाईनचे काम करताना कंत्राटदाराने सिमेंट काँक्रीटचा वापर न करता केवळ मुरूम टाकून काम पूर्णत्वास नेले. त्यामुळे पावसाच्या पाण्याने उजव्या कालव्याच्या नहराच्या पाळीवरील मुरुम खचल्याने पाळीला मोठे भगदाड पडले आहे.उजव्या कालव्याच्या नहराच्या पाळीवरील मुरुम पाईपलाईनमध्ये गेल्यामुळे शेतीला छोट्या कालव्यामार्फत होणाºया पाण्याचा प्रवाह पूर्णपणे बंद झाला आहे. परिणामी पिकांना पाणी मिळत नसल्यामुळे भात पीक करपत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या बी-बियाणांचा खर्च डोळ्या देखत वाया जात आहे. शेतकरी हवालदिल झाला असून कर्जाच्या खाईत जाणार असल्याचे चित्र सद्या स्थितीवरुन दिसत आहे.नहराच्या पाळीला मोठे भगदाड पडल्यामुळे जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे लक्ष देऊन छोट्या कालव्याद्वारे बंद झालेला पाणी पुरवठा त्वरीत सुरू करण्यात यावा अशी मागणी तोरगाव खुर्द येथील शेतकरी विनय पारधी, श्रीकृष्ण पारधी, नामदेव बुल्ले, जयघोष बुल्ले, मधुकर बुल्ले, गुलाब बनकर, आत्माराम बुल्ले, करबा सुखदेवे, गुरुदेव पारधी, प्रकाश बावनकुळे यांनी केली आहे.