शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

नगर पंचायतीचे पडघम वाजले

By admin | Updated: May 15, 2014 01:00 IST

राज्य शासनाने लोकसभा निवडणूकीपूर्वी २५ हजार लोकसंख्या असलेले गाव व तालुका मुख्यालय असलेल्या गावामध्ये नगर पंचायत स्थापण करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता.

तालुका मुख्यालयाचा दर्जा : नागरिकांकडून मागितले आक्षेपगडचिरोली : राज्य शासनाने लोकसभा निवडणूकीपूर्वी २५ हजार लोकसंख्या असलेले गाव व तालुका मुख्यालय असलेल्या गावामध्ये नगर पंचायत स्थापण करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता. या निर्णयानूसार गडचिरोली जिल्ह्यात १0 नगर पंचायत निर्माण होणार होत्या. याशिवाय चामोर्शी व आरमोरी येथे नगर परिषद स्थापन करण्याबाबतची मागणी विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी केली होती. मात्र या संदर्भात नगर पंचायत स्थापण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अहेरी, चामोर्शी व आरमोरी या ३ ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये या संदर्भात उद्घोषणा करण्यात आली असून प्रारूप अधिसूचनाही राज्य शासनाच्या उपसचिवाकडून जाहीर करण्यात आली आहे. अहेरी ग्रामपंचायतीला या संदर्भात ९ मे रोजी पत्र प्राप्त झाले असून ग्रामपंचायतीचे नगर पंचायतमध्ये रूपांतर करण्यासाठी नागरिकांकडून आक्षेप ३0 दिवसात मागविण्यात आले आहेत.जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे हे आक्षेप नोंदवावेत, असे आवाहन जनतेला करण्यात आले आहे.गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली व देसाईगंज या दोन नगर पालिका आहेत. आरमोरी व चामोर्शी हे दोन मोठे गाव असून या गावांची लोकसंख्या साधरणत: २५ ते ३५ हजाराच्या घरात आहे. या दोन तालुका मुख्यालयांना नगर पालिकेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे.आरमोरी येथील विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी आरमोरी ग्रामपंचायतीचे नगर पालिकेत रूपांतर करावे यासाठी नागपूर हिवाळी अधिवेशनात उपोषणही केले होते. तसेच या संदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेटही घेऊन त्यांच्याकडे मागणी केली होती. मात्र राज्य शासनाकडे सध्या आरमोरी येथे नगर पंचायतकरिता अधिसूचना जारी झाली आहे.त्यामुळे येथील नागरिकांनी याबाबत आक्षेप नोंदविला असून आरमोरीला आत्ताच नगर पालिका म्हणून घोषीत करावे, अशी त्यांची मागणी आहे.गडचिरोली जिल्ह्यात कोरची, कुरखेडा, धानोरा, मुलचेरा, एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, चामोर्शी, आरमोरी, अहेरी या तालुका मुख्यालयाच्या ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा मिळणार आहे. यातील आरमोरी व चामोर्शी या दोन गावांतील नागरिकांनी नगर पालिकेचा दर्जा मिळावा, अशी मागणी केली आहे.सध्या तरी शासनाने नगर पंचायतबाबत अधिसूचना जारी केली असून नागरिकांकडून आक्षेपही मागविले आहेत. त्यामुळे शासन नगर पालिका स्थापण्याबाबत काही निर्णय करते काय विषयी जिल्ह्यातील नागरिकांमध्ये अद्याप चर्चाच आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

अहेरी ग्रामपंचायतीचे नगर पंचायतमध्ये रूपांतर करण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याबाबत कुणाचेही आक्षेप असल्यास त्यांनी राजपत्रात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ३0 दिवसाच्या आत जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे नोंदवावी.- ए.व्ही.उंदिरवाडे, ग्रामविकास अधिकारी, अहेरी