शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
4
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
5
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
6
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
7
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
8
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
9
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
10
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
11
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
12
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
13
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
14
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
15
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
16
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
17
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
18
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
19
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
20
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!

नगर पंचायतीचे पडघम वाजले

By admin | Updated: May 15, 2014 01:00 IST

राज्य शासनाने लोकसभा निवडणूकीपूर्वी २५ हजार लोकसंख्या असलेले गाव व तालुका मुख्यालय असलेल्या गावामध्ये नगर पंचायत स्थापण करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता.

तालुका मुख्यालयाचा दर्जा : नागरिकांकडून मागितले आक्षेपगडचिरोली : राज्य शासनाने लोकसभा निवडणूकीपूर्वी २५ हजार लोकसंख्या असलेले गाव व तालुका मुख्यालय असलेल्या गावामध्ये नगर पंचायत स्थापण करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता. या निर्णयानूसार गडचिरोली जिल्ह्यात १0 नगर पंचायत निर्माण होणार होत्या. याशिवाय चामोर्शी व आरमोरी येथे नगर परिषद स्थापन करण्याबाबतची मागणी विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी केली होती. मात्र या संदर्भात नगर पंचायत स्थापण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अहेरी, चामोर्शी व आरमोरी या ३ ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये या संदर्भात उद्घोषणा करण्यात आली असून प्रारूप अधिसूचनाही राज्य शासनाच्या उपसचिवाकडून जाहीर करण्यात आली आहे. अहेरी ग्रामपंचायतीला या संदर्भात ९ मे रोजी पत्र प्राप्त झाले असून ग्रामपंचायतीचे नगर पंचायतमध्ये रूपांतर करण्यासाठी नागरिकांकडून आक्षेप ३0 दिवसात मागविण्यात आले आहेत.जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे हे आक्षेप नोंदवावेत, असे आवाहन जनतेला करण्यात आले आहे.गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली व देसाईगंज या दोन नगर पालिका आहेत. आरमोरी व चामोर्शी हे दोन मोठे गाव असून या गावांची लोकसंख्या साधरणत: २५ ते ३५ हजाराच्या घरात आहे. या दोन तालुका मुख्यालयांना नगर पालिकेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे.आरमोरी येथील विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी आरमोरी ग्रामपंचायतीचे नगर पालिकेत रूपांतर करावे यासाठी नागपूर हिवाळी अधिवेशनात उपोषणही केले होते. तसेच या संदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेटही घेऊन त्यांच्याकडे मागणी केली होती. मात्र राज्य शासनाकडे सध्या आरमोरी येथे नगर पंचायतकरिता अधिसूचना जारी झाली आहे.त्यामुळे येथील नागरिकांनी याबाबत आक्षेप नोंदविला असून आरमोरीला आत्ताच नगर पालिका म्हणून घोषीत करावे, अशी त्यांची मागणी आहे.गडचिरोली जिल्ह्यात कोरची, कुरखेडा, धानोरा, मुलचेरा, एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, चामोर्शी, आरमोरी, अहेरी या तालुका मुख्यालयाच्या ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा मिळणार आहे. यातील आरमोरी व चामोर्शी या दोन गावांतील नागरिकांनी नगर पालिकेचा दर्जा मिळावा, अशी मागणी केली आहे.सध्या तरी शासनाने नगर पंचायतबाबत अधिसूचना जारी केली असून नागरिकांकडून आक्षेपही मागविले आहेत. त्यामुळे शासन नगर पालिका स्थापण्याबाबत काही निर्णय करते काय विषयी जिल्ह्यातील नागरिकांमध्ये अद्याप चर्चाच आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

अहेरी ग्रामपंचायतीचे नगर पंचायतमध्ये रूपांतर करण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याबाबत कुणाचेही आक्षेप असल्यास त्यांनी राजपत्रात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ३0 दिवसाच्या आत जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे नोंदवावी.- ए.व्ही.उंदिरवाडे, ग्रामविकास अधिकारी, अहेरी