शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
4
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
5
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
6
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
7
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
8
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
9
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
10
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
11
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
12
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
13
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
14
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
15
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
16
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
17
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
19
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
20
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार

नगर पंचायतीचे पडघम वाजले

By admin | Updated: May 15, 2014 01:00 IST

राज्य शासनाने लोकसभा निवडणूकीपूर्वी २५ हजार लोकसंख्या असलेले गाव व तालुका मुख्यालय असलेल्या गावामध्ये नगर पंचायत स्थापण करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता.

तालुका मुख्यालयाचा दर्जा : नागरिकांकडून मागितले आक्षेपगडचिरोली : राज्य शासनाने लोकसभा निवडणूकीपूर्वी २५ हजार लोकसंख्या असलेले गाव व तालुका मुख्यालय असलेल्या गावामध्ये नगर पंचायत स्थापण करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता. या निर्णयानूसार गडचिरोली जिल्ह्यात १0 नगर पंचायत निर्माण होणार होत्या. याशिवाय चामोर्शी व आरमोरी येथे नगर परिषद स्थापन करण्याबाबतची मागणी विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी केली होती. मात्र या संदर्भात नगर पंचायत स्थापण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अहेरी, चामोर्शी व आरमोरी या ३ ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये या संदर्भात उद्घोषणा करण्यात आली असून प्रारूप अधिसूचनाही राज्य शासनाच्या उपसचिवाकडून जाहीर करण्यात आली आहे. अहेरी ग्रामपंचायतीला या संदर्भात ९ मे रोजी पत्र प्राप्त झाले असून ग्रामपंचायतीचे नगर पंचायतमध्ये रूपांतर करण्यासाठी नागरिकांकडून आक्षेप ३0 दिवसात मागविण्यात आले आहेत.जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे हे आक्षेप नोंदवावेत, असे आवाहन जनतेला करण्यात आले आहे.गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली व देसाईगंज या दोन नगर पालिका आहेत. आरमोरी व चामोर्शी हे दोन मोठे गाव असून या गावांची लोकसंख्या साधरणत: २५ ते ३५ हजाराच्या घरात आहे. या दोन तालुका मुख्यालयांना नगर पालिकेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे.आरमोरी येथील विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी आरमोरी ग्रामपंचायतीचे नगर पालिकेत रूपांतर करावे यासाठी नागपूर हिवाळी अधिवेशनात उपोषणही केले होते. तसेच या संदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेटही घेऊन त्यांच्याकडे मागणी केली होती. मात्र राज्य शासनाकडे सध्या आरमोरी येथे नगर पंचायतकरिता अधिसूचना जारी झाली आहे.त्यामुळे येथील नागरिकांनी याबाबत आक्षेप नोंदविला असून आरमोरीला आत्ताच नगर पालिका म्हणून घोषीत करावे, अशी त्यांची मागणी आहे.गडचिरोली जिल्ह्यात कोरची, कुरखेडा, धानोरा, मुलचेरा, एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, चामोर्शी, आरमोरी, अहेरी या तालुका मुख्यालयाच्या ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा मिळणार आहे. यातील आरमोरी व चामोर्शी या दोन गावांतील नागरिकांनी नगर पालिकेचा दर्जा मिळावा, अशी मागणी केली आहे.सध्या तरी शासनाने नगर पंचायतबाबत अधिसूचना जारी केली असून नागरिकांकडून आक्षेपही मागविले आहेत. त्यामुळे शासन नगर पालिका स्थापण्याबाबत काही निर्णय करते काय विषयी जिल्ह्यातील नागरिकांमध्ये अद्याप चर्चाच आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

अहेरी ग्रामपंचायतीचे नगर पंचायतमध्ये रूपांतर करण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याबाबत कुणाचेही आक्षेप असल्यास त्यांनी राजपत्रात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ३0 दिवसाच्या आत जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे नोंदवावी.- ए.व्ही.उंदिरवाडे, ग्रामविकास अधिकारी, अहेरी