शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
2
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
3
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
4
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
5
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
6
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
7
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
8
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
9
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
10
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
11
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
12
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
13
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
14
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
15
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
16
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
17
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
18
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
19
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
20
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
Daily Top 2Weekly Top 5

नादुरूस्त विद्युत, रेल्वे गेटच्या लपंडावाने राजुरावासी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2016 01:47 IST

शहरातील जीर्ण झालेली ब्रिटिशकालिन विद्युत प्रणाली आणि वारंवार बंद होणाऱ्या शिवाजी महाविद्यालयाजवळील...

डोकेदुखी : दिवसातून १५ वेळा बंद होते लाईट व गेट राजुरा : शहरातील जीर्ण झालेली ब्रिटिशकालिन विद्युत प्रणाली आणि वारंवार बंद होणाऱ्या शिवाजी महाविद्यालयाजवळील रेल्वेगेटमुळे राजुरा शहराचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिवसातून १५ वेळा विद्युत प्रवाह खंडित होत असतो. तीच स्थिती रेल्वेगेट बंद होण्याची आहे. १० हजार शाळकरी विद्यार्थी व नागरिकांना वेठीस धरणारा आणि सिमेंट कंपन्यांचे चोचले पुरविणाऱ्या या गेटपासून राजुरा शहरातील नागरिकांना कधी सुटका मिळेल, याची प्रतीक्षा सुरू आहे. राजुरातील विद्युत प्रणाली अत्यंत जीर्ण झाली असून रविवारला दुपारी १२ वाजेपासून १० लाख ग्राहकांचा विद्युत प्रवाह खंडित झाला. फक्त आभाळ येताना दिसले तरी विद्युत पुरवठा खंडित होतो. अनेक राजकीय नेत्यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली, मोर्चे काढले, सभा घेतल्या. परंतु मुळातच विद्युत यंत्रणाच योग्य नसल्यामुळे राजुरा शहरातील नागरिकासोबत ग्रामक्षेत्रातील नागरिक हैराण झाले आहेत. राजुरा गेटमुळे विद्यार्थी, पालक संतप्त झाले आहेत. गेटच्या बाहेर औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिवाजी महाविद्यालय, आदर्श मराठी प्राथमिक शाळा, न्यु एरा इंग्लिश स्कूल राजुरा, नगर परिषद प्राथमिक शाळा, एसटी डेपो राजुरा या गेटमधुन जवळपास दहा ते पंधरा हजार विद्यार्थी व नागरिक दररोज वाहतूक करतात. सिमेंटच्या गाड्या रात्रीला चालवून दिवसा गेट बंद ठेवता कामा नये. परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे सिमेंट कंपन्या ज्या स्थानिक नागरिकांना गेटवरूनच हाकलून लावतात. त्याचे चोचले पुरविण्याचे काम सुरू आहे. ज्यावेळी कंपन्या तयार झाल्या ज्या कंपन्या २०० कोटीच्यावर नफा कमावित आहे. त्यांनी ५० कोटी खर्च करून रेल्वे उड्डानपूल बांधून दिले पाहिजे, असे आंदोलन झाली पाहिजे. याकडे मात्र कुणाचे लक्ष नाही. आपल्याच भागाचा कच्चा माल, अधिकारी मात्र परप्रांताचे आहेत. राजकीय नेत्यामध्ये कंपणी त्रासाबाबत एकवाक्यता नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे. या गेटपासून सुटका करण्याची मागणी , तसेच विद्युत वाहिनी व वितरणाची पद्धत दुरुस्त करण्याचीही मागणी जनतेने केली आहे. (शहर प्रतिनिधी)