शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांमुळे टळला अनर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 01:06 IST

नरसिंहा चट्टे याची हत्या झाल्यानंतर इराणी लोकांविरुद्ध घुमसत असलेला रोष एकाएकी उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली होती.

ठळक मुद्देकेरोसीन व टायर केले होते गोळा : पोलिसांनी दाखविली तत्परता, परिस्थिती नियंत्रणात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नरसिंहा चट्टे याची हत्या झाल्यानंतर इराणी लोकांविरुद्ध घुमसत असलेला रोष एकाएकी उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र रामनगर पोलिसांसह वरिष्ठ पोलिसांनी तत्परता दाखवून लगेच तगडा बंदोबस्त लावण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेपासून पोलिसांनी उपासमार सहन करीत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात यश मिळविले. अद्यापही २०० पोलिसांचा ताफा परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे.घटनेच्या एक दिवसापूर्वी नरसिंहा चट्टे याने अत्तू इराणी, सिराज उर्फ बबलू अली व शराफत अली यांच्याविरुद्ध खंडणीची तक्रार केल्यावरुन रामनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यानंतर तणाव निर्माण होऊ नये म्हणून ताबडतोब, सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले व पोलीस उपनिरीक्षक संजय भारती हे सुमारे पाच कर्मचाºयांसह पोलीस निरीक्षक गोटमारे यांनी जलनगरातील घटनास्थळी पाठविले. यानंतर गु्न्हे शोध पथकासह सहायक पोलीस निरीक्षक धनंजय सायरे असे १४ जण व तीन ंअधिकारी गस्तीवर होते. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक संजय भारती व त्यांचे पथक हे सुमीत कांबळे यांच्या घराजवळ पायी गस्त घालत होते. ही गस्त हत्येची घटना घडल्यानंतर रात्री ११ वाजतापर्यंत वाढविण्यात आली होती. तत्पूर्वी ८.३० वाजताच्या सुमारास तिथे त्यांना उडीया मोहल्ला येथे भांडण सुरू असल्याची माहिती मिळाली. यानंतर भारती यांचे पथक धावून गेले. त्यांनी भांडण सोडविले. नरसिंहा चट्टे हा खाली पडला होता. लगेच पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना बोलावून दुचाकीवरच नरसिंहाला घेऊन सामान्य रुग्णालय गाठले. मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलीस उपनिरीक्षक भारती यांनी परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन लगेच पोलिसांची अतिरिक्त कुमक मागविली. तोपर्यंत या घटनेने संतप्त झालेल्या लोकांनी रॉकेल आणि टायर गोळा केल्याची बाब पोलिसांच्या कानावर आली होती. परिस्थितीचे गांभिर्य ओळखून पोलीस उपनिरीक्षक भारती यांनी लगेच घटनास्थळावरून आरोपी अत्तु इराणी याला पकडून सरकारी वाहनाने तत्काळ रामनगर ठाण्यात नेले. यामुळे पुढचा अनर्थ टळला. या घटनेनंतर पोलिसांना जेवण करायलाही वेळ मिळाला नाही, जे मिळाले त्यावर त्यांनी समाधान मानले. १२ तासांच्या दोन पाळी तयार करून पोलीस प्रशासन परिस्थिती हाताळत आहे.या घटनाक्रमात खंडणी प्रकरणातील आरोपी सिराज उर्फ बबलू अली याला सहायक पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांनी घटनास्थळपरिसरातून अटक केली. या प्रकरणातील शराफत अली फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहे.