शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

मनपाची दोन कोटींची तरतूद कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 22:33 IST

शहरातील आर्थिकदृष्ट्या मागास समाजघटकांच्या विकासासाठी विविध योजना राबविण्याच्या हेतूने दोन कोटींची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली. परंतु योजनांचा आराखडा तयार करून निधी खर्च करण्याच्या कार्यवाहीला अद्याप गती मिळाली नाही. त्यामुळे दुर्बल घटकांमध्ये नाराजी पसरली आहे.

ठळक मुद्देदुर्बल समाज घटकांमध्ये नाराजी : अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार विकासकामे करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील आर्थिकदृष्ट्या मागास समाजघटकांच्या विकासासाठी विविध योजना राबविण्याच्या हेतूने दोन कोटींची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली. परंतु योजनांचा आराखडा तयार करून निधी खर्च करण्याच्या कार्यवाहीला अद्याप गती मिळाली नाही. त्यामुळे दुर्बल घटकांमध्ये नाराजी पसरली आहे.शहरातील अनेक प्रभागामध्ये आर्थिक मागासवर्गीय समाजाची संख्या बरीच आहे. या प्रभागात रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता आणि सामाजिक न्याय विकासाच्या विविध योजना राबविण्यासाठी मनपाने आर्थिक तरतूद करणे नियमानुसार बंधनकारक आहे. त्यानुसार २०१८-१९ च्या अंदाजपत्रकात दोन कोटींची तरतूद करण्यात आली. या निधीतून विविध विकासकामे पूर्ण करण्याचे नियोजन मनपाने केले होते. बाबूपेठ, तुकूम, बंगाली कॅम्प, जलनगर आदींसह अन्य वॉर्डांमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबाची संख्या सर्वात मोठी आहे. त्यामुळे विकासाची कामे प्राधान्याने सुरू करण्याची ग्वाही मनपातील सत्ताधाऱ्यांनी दिली होती. परंतु, अर्थसंकल्पातील प्रस्तावित कामे सुरू झाली नाही, असा आरोप आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिक करीत आहेत. सामाजिक न्यायाच्या विविध योजनांनाही चालना मिळाली नसल्याचे गरजू लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. शहरातील महिला व बालकांच्या कल्याणाची जबाबदारी पूर्ण करण्याचे आश्वासने मनपाने दिले होते. त्यानुसार २०१८-१९ वर्षाकरिता महिला व बालकांच्या विश्रामगृहासाठी ९० लाख, बालोद्यानासाठी ९० लाख व इतर सुविधांसाठी दोन कोटी असे एकूण तीन कोटी ९३ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. पण ही कामे पूर्णत्वास आली नाहीत. दिव्यांग कल्याण योजनांसंदर्भातही हाच प्रकार घडल्याचा आरोप दिव्यांग संघटनेने केला. दिव्यांग कल्याणासाठी तयार केलेल्या धोरणानुसार मनपाने दोन कोटींची तरतूद केली आहे.हेही महत्त्वाचे...मनपाने शहरातील अनेक प्रभागात रस्ते व नाल्यांचे बांधकाम वेगाने करीत आहे. ही मोठी उपलब्धी असली तरी सामाजिक न्यायाच्या योजनांनाही विशेष प्राधान्य द्यावे, अशी मागणी गरजुंनी केली.शहरातील मूलभूत कामे पूर्ण करा- राहुल पावडेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील दोन आठवड्यांपासून सतत पाऊस सुरू असल्याने शहरातील रस्ते, सांडपाणी वाहून नेणाºया नाल्या, पूल व पथदिव्यांची दुरवस्था झाली आहे. नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मूलभूत स्वरूपाची कामे तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे यांनी दिले. स्थायी समिती सभागृहात शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते.मुसळधार पावसामुळे शहरातील विविध प्रभागात निर्माण झालेल्या समस्यांचा आढावा घेण्यात आला. नागरिकांना त्रास होवू नये, यासाठी अधिकाºयांनी कंत्राटदारांना कामाला लावावे. अनेक रस्त्यांवर खड्डे पडले. काही ठिकाणी पाणी साचले. नाल्या चोकअप झाल्या. पथदिवेही बंद आहेत. अशा ठिकाणी साहित्याचा पुरवठा करून समस्या मार्गी लावावे. यासाठी जास्तीचा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही सभापती पावडे यांनी दिली.अमृत योजनेअंतर्गत रस्त्याच्या कडेला गट्टू लावून स्वच्छता करावी. झोन क्र. १, २ व ३ मध्ये कोणतीही अडचण येणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश त्यांनी सभेत दिले. यावेळी नगरसेवक, अतिरिक्त आयुक्त बेहरे, उपायुक्त गोस्वामी, बोकडे व देवळीकर, नगर सचिव अ.फैज काझी उपस्थित होते.