शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
11
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
12
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
13
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
14
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
15
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
16
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
17
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
18
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
19
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
20
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."

भाविकांच्या पायाखाली महापालिकेचे निखारे

By admin | Updated: March 30, 2015 00:41 IST

चैत्राची सुरूवात झाली की, महाकाली मातेच्या भक्तांची हजारो पावलं चंद्रपुरच्या दिशेने निघतात.

रूपेश कोकावार बाबुपेठ (चंद्रपूर)चैत्राची सुरूवात झाली की, महाकाली मातेच्या भक्तांची हजारो पावलं चंद्रपुरच्या दिशेने निघतात. निरामय भक्तीची ओढच त्यांना ईथवर घेऊन येते. कुणी वाहनाने, तर कुणी दूरवरून पायदळ चालत येऊन मातेच्या चरणी श्रद्धेनं आपला माथा टेकतात. पण तोवर त्यांना अनेक दिव्यातून जावे लागते. चंद्रपुरातील खडतर वाटांवरून चालताना भाविकांना अक्षरश: रक्तबंंबाळ व्हावे लागत आहे. दरवर्षी येथे भरणाऱ्या यात्रेसाठी शेकडो मैलांचा प्रवास करून हजारो भाविक येथे येतात. यंदाच्या गुढीपाडव्यापासून माता महाकाली यात्रेला प्रारंभ झाला. भाविकांचे जत्थेच्या जत्थे माता महाकालीच्या दर्शनासाठी चंद्रपुरात दाखल होत आहेत. सध्या चंद्रपुरातील अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू आहेत. महाकाली मंदिराकडून बैलबाजाराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम महानगरपालिकेने हाती घेतले. परंतु गेल्या काही दिवसांपासून हा रस्ता अर्धवट अवस्थेत आहे. कंत्राटदाराने रस्त्याचे काम अर्ध्यावरच थांबविले आहे. विशेष म्हणजे यात्रेसाठी येणारे भाविक याच रस्त्याने पुढे जाऊन बैलबाजार परिसरात आपला ठिय्या देतात. मात्र या रस्त्यावर गिट्टी पसरली आहे. ती तुडवतच भाविकांना पुढे जावे लागत आहे. माता महाकालीच्या भक्तीने भारावलेला भक्त अनवाणी असतो. त्यामुळे या रस्त्यावरून चालताना भाविकांना वेदना सहन करीत पुढे जावे लागत आहे. त्यात अनेकांचे पाय जखमी होऊन रक्ताळत आहेत. लहान-लहान मुलेही ठेचकाळून जखमी होत आहेत. या मार्गावर पसरलेली गिट्टी बाजुला करावी, अशी मागणी आहे.