शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

महानगरपालिकेत भाजपाने एकहाती सत्ता स्थापण्याचे ध्येय बाळगावे

By admin | Updated: January 1, 2017 01:12 IST

महानगरपालिकेवर एकहाती सत्ता प्रस्थापित करणे हे भाजपाचे लक्ष्य असून या ध्येयपूर्तीसाठी पक्षाच्या पदाधिकारी

हंसराज अहीर : चंद्रपुरात पार पडला कार्यकर्ता मेळावा चंद्रपूर : महानगरपालिकेवर एकहाती सत्ता प्रस्थापित करणे हे भाजपाचे लक्ष्य असून या ध्येयपूर्तीसाठी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वत:ला झोकून देत केंद्र व राज्य सरकारच्या लोकाभिमुख योजनांचा लाभ तळागाळातील लोकापर्यंत पोहचवावा. या दोन्ही सरकारच्या कार्यकाळातील तसेच भाजप नेतृत्वातील चंद्रपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून झालेला विकास जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी भाजप कार्यकर्ता मेळाव्यास संबोधित करताना केले. दाताळा मार्गावरील जिजाऊ लॉन येथे शुक्रवारी पार पडलेल्या या मेळाव्यास राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष तथा आमदार नाना श्यामकुळे, भाजपा नेते विजय राऊत, महापौर राखी कंचर्लावार, वनिता कानडे, अनिल फुलझेले, राजेश मून, तुषार सोम, राजेंद्र अडपेवार, रामपाल सिंह, धनंजय हुड, मोहन चौधरी, सुभाष कासनगोट्टूवार, संतोष वडपल्लीवार, ब्रिजभूषण पाझारे, राहूल पावडे, रमेश भूते, संदीप आगलावे, श्याम कनकम, विठ्ठल डुकरे, निलेश बेडेकर, सुनील डोंगरे, रवि जोगी, अंजली घोटेकर आदींची उपस्थिती होती. ना. हंसराज अहीर पुढे म्हणाले, आज केंद्र व राज्यात असलेले भाजप नेतृत्वातील सरकार हे कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचे व पक्षाच्या सामाजिक कार्याचे फलीत असल्याचे सांगत सरकारच्या लोकाभिमुख, विकासाभिमुख, जलद कार्यामुळे आज देशामध्ये प्रथम क्रमांकाचा राजकीय पक्ष म्हणून भाजप ताठ मानेने उभा आहे. गेल्या ५० वर्षात ज्या योजना विरोधकांना राबविता आल्या नाही व या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहचविण्यात विरोधक यशस्वी ठरले नाही. त्या योजना अवघ्या अडीच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू करून त्या सक्षमपणे राबविण्यात यश मिळविले आहे. समाजातील सामान्यातील सामान्य माणसापर्यंत योजनांचा लाभ पोहचविण्यात केंद्र व राज्य सरकार यशस्वी ठरले आहे. याप्रसंगी राज्याचे अर्थमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर महानगरपालिकेत पक्षाला स्पष्ट बहुमत मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी अविश्रांत परिश्रम घ्यावे, असे आवाहन करून या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीची डिपॉजिट जप्त होईल अशा पद्धतीने नियोजन करून कार्य करावे. भाजपच्या अडीच वर्षाच्या सत्ताकाळात महानगरातील विकास कामाच्या भरोशावर आपण स्पष्ट बहुमत संपादन करू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कार्यकर्ता मेळाव्यात महानगरातील पदाधिकारी, उपस्थित होते.(नगर प्रतिनिधी)