शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
2
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
3
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
4
Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
5
H-1B व्हिसा आता 'मेरिट'वर! १ लाख डॉलर अतिरिक्त फी अन् पगाराची अट; पाहा काय आहे नवीन नियम
6
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
7
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
8
...म्हणून उद्धव आणि राज ठाकरेंनी जागावाटप, उमेदवार याबाबत काहीच घोषणा केली नाही; कारण सांगताच सगळे हसले
9
२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
10
Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
11
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
12
अतिश्रीमंतांचा 'आक्रमक' गुंतवणुकीवर भर! 'या' क्षेत्रात लावतात ७०% पैसे; सोन्याकडे मात्र पाठ
13
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
14
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
15
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
16
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
17
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
18
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
19
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
20
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मोफत देणार तुतीची रोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:25 IST

जिल्ह्यात १७ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान वनमहोत्सव साजरा होणार असून कालावधीत ३३ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी यंदा प्रथमच शेतकऱ्यांना तुतीची रोपे मोफत देण्याचा निर्णय वनविभागाने घेतला. या निर्णयामुळे जिल्ह्यात रेशीम व्यवसायाला चालणार मिळण्याची आशा निर्माण झाली आहेत.

ठळक मुद्देवृक्ष लागवड मोहीम : तुती लागवडीला मिळणार चालना, वनविभागाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कचंंद्रपूर : जिल्ह्यात १७ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान वनमहोत्सव साजरा होणार असून कालावधीत ३३ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी यंदा प्रथमच शेतकऱ्यांना तुतीची रोपे मोफत देण्याचा निर्णय वनविभागाने घेतला. या निर्णयामुळे जिल्ह्यात रेशीम व्यवसायाला चालणार मिळण्याची आशा निर्माण झाली आहेत.राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून राज्यात वनमहोत्सव राबविण्यात येत आहे. २०१७ पासून ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेण्यात आला. या कार्यक्रमंतर्गत सन २०१९ - २० या वर्षासाठी ३३ कोटी वृक्ष लागवडी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. खासगी मालकीचे पडिक क्षेत्र, शेतीचे बांध, रेल्वे दूतर्फा, कालवा, रस्ता, सामूहिक पडिक क्षेत्र व गायरान क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली. याशिवाय सर्वसामान्य शेतकरी व वृक्षप्रेमी नागरिकांना अल्पदरात रोपे उपलब्ध करून देण्यात आले होते. यंदा एक महिन्याच्या रोपाकरिता महोत्सवाच्या कालावधीत प्रति रोप ८ रूपये तर १८ महिन्यांच्या रोपाकरिता ४० रूपये दर आकारण्यात आला आहे. विशेष म्हणजे सामाजिक वनीकरण विभागातर्फे महात्मा राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तुतीची रोपे तयार करण्यात आली. ही रोपे रेशीम विभागाला मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे रेशीम विभागामार्फत या रोपांचा पुरवठा जिल्ह्यातील शेतकºयांना केला जाणार आहे. जिल्ह्यात तुती लागवडीचे क्षेत्र सद्यस्थितीत अतिशय अल्प आहे. या निर्णयामुळे लागवड क्षेत्र वाढू शकेल. याकरिता रेशीम विभाग, सामाजिक वनीकरण व वनविभाग संयुक्त प्रयत्न करीत आहे.जिल्ह्यातील रोपवाटिकेत मुबलक रोपेजिल्ह्यातील सामाजिक संस्था व वृक्ष प्रेमी नागरिकांना ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्यासाठी वनमहोत्सवाच्या कालावधीत वनविभागाकडून रोपांचा पुरवठा केला जाणार आहे. जिल्ह्यातील रोपवाटिकेमध्ये मुबलक प्रमाणात वृक्षांचे संवर्धन करण्यात आले. वनमहोत्सवादरम्यान नागरिकांना सवलतीच्या दरात रोपांचा पुरवठा करण्यात येणार आहे. रोपांचा तुटवडा पडल्यास सामाजिक वनीकरण विभागाकउूनही रोपे उपलब्ध होतील.