शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

शेतकऱ्यांना मोफत देणार तुतीची रोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:25 IST

जिल्ह्यात १७ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान वनमहोत्सव साजरा होणार असून कालावधीत ३३ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी यंदा प्रथमच शेतकऱ्यांना तुतीची रोपे मोफत देण्याचा निर्णय वनविभागाने घेतला. या निर्णयामुळे जिल्ह्यात रेशीम व्यवसायाला चालणार मिळण्याची आशा निर्माण झाली आहेत.

ठळक मुद्देवृक्ष लागवड मोहीम : तुती लागवडीला मिळणार चालना, वनविभागाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कचंंद्रपूर : जिल्ह्यात १७ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान वनमहोत्सव साजरा होणार असून कालावधीत ३३ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी यंदा प्रथमच शेतकऱ्यांना तुतीची रोपे मोफत देण्याचा निर्णय वनविभागाने घेतला. या निर्णयामुळे जिल्ह्यात रेशीम व्यवसायाला चालणार मिळण्याची आशा निर्माण झाली आहेत.राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून राज्यात वनमहोत्सव राबविण्यात येत आहे. २०१७ पासून ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेण्यात आला. या कार्यक्रमंतर्गत सन २०१९ - २० या वर्षासाठी ३३ कोटी वृक्ष लागवडी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. खासगी मालकीचे पडिक क्षेत्र, शेतीचे बांध, रेल्वे दूतर्फा, कालवा, रस्ता, सामूहिक पडिक क्षेत्र व गायरान क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली. याशिवाय सर्वसामान्य शेतकरी व वृक्षप्रेमी नागरिकांना अल्पदरात रोपे उपलब्ध करून देण्यात आले होते. यंदा एक महिन्याच्या रोपाकरिता महोत्सवाच्या कालावधीत प्रति रोप ८ रूपये तर १८ महिन्यांच्या रोपाकरिता ४० रूपये दर आकारण्यात आला आहे. विशेष म्हणजे सामाजिक वनीकरण विभागातर्फे महात्मा राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तुतीची रोपे तयार करण्यात आली. ही रोपे रेशीम विभागाला मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे रेशीम विभागामार्फत या रोपांचा पुरवठा जिल्ह्यातील शेतकºयांना केला जाणार आहे. जिल्ह्यात तुती लागवडीचे क्षेत्र सद्यस्थितीत अतिशय अल्प आहे. या निर्णयामुळे लागवड क्षेत्र वाढू शकेल. याकरिता रेशीम विभाग, सामाजिक वनीकरण व वनविभाग संयुक्त प्रयत्न करीत आहे.जिल्ह्यातील रोपवाटिकेत मुबलक रोपेजिल्ह्यातील सामाजिक संस्था व वृक्ष प्रेमी नागरिकांना ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्यासाठी वनमहोत्सवाच्या कालावधीत वनविभागाकडून रोपांचा पुरवठा केला जाणार आहे. जिल्ह्यातील रोपवाटिकेमध्ये मुबलक प्रमाणात वृक्षांचे संवर्धन करण्यात आले. वनमहोत्सवादरम्यान नागरिकांना सवलतीच्या दरात रोपांचा पुरवठा करण्यात येणार आहे. रोपांचा तुटवडा पडल्यास सामाजिक वनीकरण विभागाकउूनही रोपे उपलब्ध होतील.