शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

महावितरण कंपनीने जिल्ह्यातील वीज खंडित करणे थांबवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:29 IST

चिमूर : कोरोनाचा संकटकाळ सुरू असतानाच पीक हंगाम व शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे. मात्र, वीज वितरण कंपनीने चंद्रपूर ...

चिमूर : कोरोनाचा संकटकाळ सुरू असतानाच पीक हंगाम व शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे. मात्र, वीज वितरण कंपनीने चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा खंडित करण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. तेव्हा वीज विभागाने ग्रामीण भागातील ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या प्रकारास स्थगिती देण्याची मागणी आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

राज्यात सर्वांत जास्त वीजनिर्मिती करणारा चंद्रपूर जिल्हा असताना जिल्हावासीयांना वीजनिर्मितीच्या प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो, तर ग्रामीण भागात पाहिजे तसा रोजगार नसल्याने नागरिक अडचणीत आहेत. त्यामुळे अनेकांचे वीज बिल बाकी आहे. मात्र, विद्युत विभागाने कोरोनाकाळाचाही विचार न करता वीज खंडित करण्याचा सपाटा सुरू केलेला आहे.

चिमूर विधानसभा क्षेत्रातील जास्तीत जास्त क्षेत्र ग्रामीण भागात येत असून, या भागात औद्योगिक कारखान्यांचा अभाव असल्याने या परिसरातील नागरिकांचे अर्थचक्र शेती उत्पन्नावर अवलंबून आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी कर्जातच जगत आहे. चंद्रपूर जिल्हा हा वनव्याप्त व हिंसक जनावरांच्या छायेत असल्याने रात्रीला ग्रामपंचायतीच्या विद्युत खांबावरील वीजपुरवठा बंद झाल्यास बरीच हिंसक जनावरे स्थानिक नागरिकांवर हल्ले करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. राज्य शासनाने कोरोना काळात अत्यल्प उत्पन्नामुळे वीज बिल न भरणाऱ्यांची घरगुती वीज खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम थांबविण्याची भांगडिया यांची मागणी आहे.