शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण कंपनीने जिल्ह्यातील वीज खंडित करणे थांबवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:29 IST

चिमूर : कोरोनाचा संकटकाळ सुरू असतानाच पीक हंगाम व शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे. मात्र, वीज वितरण कंपनीने चंद्रपूर ...

चिमूर : कोरोनाचा संकटकाळ सुरू असतानाच पीक हंगाम व शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे. मात्र, वीज वितरण कंपनीने चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा खंडित करण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. तेव्हा वीज विभागाने ग्रामीण भागातील ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या प्रकारास स्थगिती देण्याची मागणी आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

राज्यात सर्वांत जास्त वीजनिर्मिती करणारा चंद्रपूर जिल्हा असताना जिल्हावासीयांना वीजनिर्मितीच्या प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो, तर ग्रामीण भागात पाहिजे तसा रोजगार नसल्याने नागरिक अडचणीत आहेत. त्यामुळे अनेकांचे वीज बिल बाकी आहे. मात्र, विद्युत विभागाने कोरोनाकाळाचाही विचार न करता वीज खंडित करण्याचा सपाटा सुरू केलेला आहे.

चिमूर विधानसभा क्षेत्रातील जास्तीत जास्त क्षेत्र ग्रामीण भागात येत असून, या भागात औद्योगिक कारखान्यांचा अभाव असल्याने या परिसरातील नागरिकांचे अर्थचक्र शेती उत्पन्नावर अवलंबून आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी कर्जातच जगत आहे. चंद्रपूर जिल्हा हा वनव्याप्त व हिंसक जनावरांच्या छायेत असल्याने रात्रीला ग्रामपंचायतीच्या विद्युत खांबावरील वीजपुरवठा बंद झाल्यास बरीच हिंसक जनावरे स्थानिक नागरिकांवर हल्ले करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. राज्य शासनाने कोरोना काळात अत्यल्प उत्पन्नामुळे वीज बिल न भरणाऱ्यांची घरगुती वीज खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम थांबविण्याची भांगडिया यांची मागणी आहे.