शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

महावितरण कंपनीने जिल्ह्यातील वीज खंडित करणे थांबवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:29 IST

चिमूर : कोरोनाचा संकटकाळ सुरू असतानाच पीक हंगाम व शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे. मात्र, वीज वितरण कंपनीने चंद्रपूर ...

चिमूर : कोरोनाचा संकटकाळ सुरू असतानाच पीक हंगाम व शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे. मात्र, वीज वितरण कंपनीने चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा खंडित करण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. तेव्हा वीज विभागाने ग्रामीण भागातील ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या प्रकारास स्थगिती देण्याची मागणी आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

राज्यात सर्वांत जास्त वीजनिर्मिती करणारा चंद्रपूर जिल्हा असताना जिल्हावासीयांना वीजनिर्मितीच्या प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो, तर ग्रामीण भागात पाहिजे तसा रोजगार नसल्याने नागरिक अडचणीत आहेत. त्यामुळे अनेकांचे वीज बिल बाकी आहे. मात्र, विद्युत विभागाने कोरोनाकाळाचाही विचार न करता वीज खंडित करण्याचा सपाटा सुरू केलेला आहे.

चिमूर विधानसभा क्षेत्रातील जास्तीत जास्त क्षेत्र ग्रामीण भागात येत असून, या भागात औद्योगिक कारखान्यांचा अभाव असल्याने या परिसरातील नागरिकांचे अर्थचक्र शेती उत्पन्नावर अवलंबून आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी कर्जातच जगत आहे. चंद्रपूर जिल्हा हा वनव्याप्त व हिंसक जनावरांच्या छायेत असल्याने रात्रीला ग्रामपंचायतीच्या विद्युत खांबावरील वीजपुरवठा बंद झाल्यास बरीच हिंसक जनावरे स्थानिक नागरिकांवर हल्ले करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. राज्य शासनाने कोरोना काळात अत्यल्प उत्पन्नामुळे वीज बिल न भरणाऱ्यांची घरगुती वीज खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम थांबविण्याची भांगडिया यांची मागणी आहे.