शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
2
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
3
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
4
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
5
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
6
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
7
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
8
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
9
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
10
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
11
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
12
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
13
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
14
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
15
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
16
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
17
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
18
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
19
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
20
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान

व्याघ्र संवर्धनासाठी महावितरणचे अधिकारी गस्तीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:38 IST

एकाच वर्षात विजेच्या स्पर्शाने सात वाघांचा मृत्यू झाल्याने व्याघ्र संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर आला.

ठळक मुद्देवाघांच्या मृत्यूची चिंता : कुंपणातून वीजप्रवाह सोडणाऱ्यांवर होणार कारवाई

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : एकाच वर्षात विजेच्या स्पर्शाने सात वाघांचा मृत्यू झाल्याने व्याघ्र संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे अशा घटनांना जबाबदार नागरिकांवर कारवाई करण्यासाठी महावितरण कंपनीचे अधिकारी आता वनक्षेत्रालगतच्या शिवारात गस्त घालणार असून दोषींवर कारवाई बडगा उगारणार आहेत.वाघ तसेच अन्य वन्यजीवांच्या मृत्यूमुळे राष्ट्रीय संपत्तीची कधीही न भरून निघणारी हाणी होत आहे. एकीकडे व्याघ्र संवर्धनासाठी प्रयत्न होत असताना वाघांचे मृत्य ंिचंतेचा विषय बनला आहे. अनेक शेतकरी शेतीचे वन्यप्राण्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतीच्या कुंपणात वीजप्रवाह सोडतात. यातून हरण, सांबर, रानडुक्कर, रानगवे, नीलगाई यासारखे तृणभक्षी प्राणी मृत्यू पावत आहेत. एकाच वर्षात ७ वाघांचा मृत्यू झाला आहे. तर गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील चुरमुरा येथील शेतकऱ्याचा रानडुकरांपासून पीक वाचविण्याच्या प्रयत्नात विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. चंद्रपूर जिल्ह्यात अशा घटनांत वाढ होण्याचा धोका निर्माण झाला आहे.अशा घटना टाळण्यासाठी आता वन विभागाच्या गस्ती पथकासोबत महावितरणच्या पथकांनीही गस्त सुरू केली आहे. तसेच शेतकºयांच्या शेतातील कुंपनांची तपासणी करून गावागावांत प्रबोधन केल्या जात आहे. मुल, पोंभूर्णा उपविभाग, राजुरा, वरोरा, चिमूर, चंद्रपूर उपविभाग आणि गडचिरोली उपविभागातील उपकार्यकारी अभिंयत्यांनी गस्त घालणे सुरू केले आहे. बेकायदशीरपणे विजेचा प्रवाह शेतीच्या कुंपनात सोडून फक्त वन्य प्राणीच नव्हे, तर शेतकºयांची शेती व जिवितहाणी होऊ नये, याची दक्षता घेतली जात आहे. कुणाचेही नुकसान होऊ नये, अशी शेतकऱ्याची भावना असते. पण स्वत: शेतकरी, शेतमजुर आणि अन्य पाळीवप्राणी गाय, म्हैस व बैलाचाही बेकायदेशीरपणे लावलेल्या वीज प्रवाहाने मृत्यू झाल्याच्या घटना सतत वाढत आहेत.अशा घटनांमधून सर्वांचे जीवन सुरक्षित राहावे, राष्ट्रीय संपत्तीचेही नुकसान टाळता यावे, यासाठी जागृती सुरू आहे. परंतु, नियमाचे उल्लंघन केल्यास वीजकायदा २००३ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येईल, असा इशाराही या गस्ती पथकाने दिला आहे. त्यामुळे शेतकºयांनी अशा कृत्यापासून दूर राहावे.