शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
5
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
6
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
7
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
8
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
9
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
10
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
11
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
12
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
13
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
14
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
15
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
16
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
17
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
18
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
19
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
20
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?

व्याघ्र संवर्धनासाठी महावितरणचे अधिकारी गस्तीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:38 IST

एकाच वर्षात विजेच्या स्पर्शाने सात वाघांचा मृत्यू झाल्याने व्याघ्र संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर आला.

ठळक मुद्देवाघांच्या मृत्यूची चिंता : कुंपणातून वीजप्रवाह सोडणाऱ्यांवर होणार कारवाई

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : एकाच वर्षात विजेच्या स्पर्शाने सात वाघांचा मृत्यू झाल्याने व्याघ्र संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे अशा घटनांना जबाबदार नागरिकांवर कारवाई करण्यासाठी महावितरण कंपनीचे अधिकारी आता वनक्षेत्रालगतच्या शिवारात गस्त घालणार असून दोषींवर कारवाई बडगा उगारणार आहेत.वाघ तसेच अन्य वन्यजीवांच्या मृत्यूमुळे राष्ट्रीय संपत्तीची कधीही न भरून निघणारी हाणी होत आहे. एकीकडे व्याघ्र संवर्धनासाठी प्रयत्न होत असताना वाघांचे मृत्य ंिचंतेचा विषय बनला आहे. अनेक शेतकरी शेतीचे वन्यप्राण्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतीच्या कुंपणात वीजप्रवाह सोडतात. यातून हरण, सांबर, रानडुक्कर, रानगवे, नीलगाई यासारखे तृणभक्षी प्राणी मृत्यू पावत आहेत. एकाच वर्षात ७ वाघांचा मृत्यू झाला आहे. तर गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील चुरमुरा येथील शेतकऱ्याचा रानडुकरांपासून पीक वाचविण्याच्या प्रयत्नात विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. चंद्रपूर जिल्ह्यात अशा घटनांत वाढ होण्याचा धोका निर्माण झाला आहे.अशा घटना टाळण्यासाठी आता वन विभागाच्या गस्ती पथकासोबत महावितरणच्या पथकांनीही गस्त सुरू केली आहे. तसेच शेतकºयांच्या शेतातील कुंपनांची तपासणी करून गावागावांत प्रबोधन केल्या जात आहे. मुल, पोंभूर्णा उपविभाग, राजुरा, वरोरा, चिमूर, चंद्रपूर उपविभाग आणि गडचिरोली उपविभागातील उपकार्यकारी अभिंयत्यांनी गस्त घालणे सुरू केले आहे. बेकायदशीरपणे विजेचा प्रवाह शेतीच्या कुंपनात सोडून फक्त वन्य प्राणीच नव्हे, तर शेतकºयांची शेती व जिवितहाणी होऊ नये, याची दक्षता घेतली जात आहे. कुणाचेही नुकसान होऊ नये, अशी शेतकऱ्याची भावना असते. पण स्वत: शेतकरी, शेतमजुर आणि अन्य पाळीवप्राणी गाय, म्हैस व बैलाचाही बेकायदेशीरपणे लावलेल्या वीज प्रवाहाने मृत्यू झाल्याच्या घटना सतत वाढत आहेत.अशा घटनांमधून सर्वांचे जीवन सुरक्षित राहावे, राष्ट्रीय संपत्तीचेही नुकसान टाळता यावे, यासाठी जागृती सुरू आहे. परंतु, नियमाचे उल्लंघन केल्यास वीजकायदा २००३ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येईल, असा इशाराही या गस्ती पथकाने दिला आहे. त्यामुळे शेतकºयांनी अशा कृत्यापासून दूर राहावे.