शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

कार्यालय हलविल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:42 IST

नागभीड : गोसे खुर्द प्रकल्पाच्या भूसंपादन विभागाचे चंद्रपूर येथील कार्यालय गोंडपिपरी येथे हलविल्यामुळे नागभीड, ब्रम्हपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत चांगलीच ...

नागभीड : गोसे खुर्द प्रकल्पाच्या भूसंपादन विभागाचे चंद्रपूर येथील कार्यालय गोंडपिपरी येथे हलविल्यामुळे नागभीड, ब्रम्हपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन हे कार्यालय एक तर नागभीड किंवा ब्रम्हपुरी येथे स्थापित करावे नाही तर, चंद्रपूर येथेच या कार्यालयाची पुनर्स्थापना करावी, अशी या भागातील शेतकऱ्यांची मागणी आहे.

गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यातील मौशी, मेंढा, किरमिटी, कोर्धा, नवेगाव पांडव,तुकूम, पळसगाव, गिरगाव,सावरगाव येथून पुढे गेला आहे. संबंधित विभागाने या उपकालव्यासाठी या गावातील अनेक शेतकऱ्यांची जमीन १० वर्षांपूर्वी संपादित केली होती. त्यावेळी या शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला. पण शेकडो शेतकरी आजही मोबदल्यापासून वंचित आहेत. त्यावेळी मिंथूर, नवेगाव पांडव येथील जमीनीस ४८ हजार रूपये दर एकर याप्रमाणे मोबदला दिला होता. हा अल्प मोबदला काही शेतकऱ्यांनी स्वीकारला. तर काही शेतकऱ्यांनी स्विकारला नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान नुकतेच याच विभागाने मिंथूर, नवेगाव पांडव परिसरातील एका शेतकऱ्यांना ४ लाख ६७ हजार रूपये एकर याप्रमाणे मोबदला दिला. शेतकऱ्यांनी हा संदर्भ देऊन राज्य शासनाकडे वाढीव मोबदल्याची मागणी केली. या मागणीचे उत्तर या शेतकऱ्यांना नुकतेच देण्यात आले. दरम्यान या उत्तरानंतर शेतकऱ्यांनी चंद्रपूर येथील कार्यालयात चौकशी केली असता येथील अधिकाऱ्यांनी गोंडपिपरी येथे जाऊन चौकशी करण्याचा सल्ला दिला.

आता या शेतकऱ्यांनी पाठपुरावा करायचा म्हटले तर गोंडपिपरीलाच जावे लागणार आहे. वास्तविक हे कार्यालय पूर्वी चंद्रपूर येथे असल्याने मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांना चंद्रपूर येथे जाऊन पाठपुरावा करणे सोयीचे होते. मात्र हे कार्यालय आता गोंडपिपरी येथे हलविण्यात आल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. नागभीड ब्रम्हपुरी तालुक्याच्या दृष्टीने गोंडपिपरी हे ठिकाण गैरसोयीचे आहे. गोंडपिपरी येथे हलविण्यात आलेले कार्यालय शेतकऱ्यांचे आर्थिक व मानसिक छळ करणारे कार्यालय ठरत आहे, असा आरोप शेतकरी करीत आहेत.

कोट

गोंडपिपरी येथे हलविण्यात आलेले हे कार्यालय नागभीड तालुक्यासाठी गैरसोयीचेच नाही तर शेतकऱ्यांचे आर्थिक व मानसिक त्रास देणारे ठरत आहे.नागभीड किंवा ब्रम्हपुरी येथे या कार्यालयाची स्थापना करावी नाही तर चंद्रपूर येथेच या कार्यालयाची पुनर्स्थापना करावी.

-गोपाल शिवणकर , पिडित शेतकरी, मिंथूर.