शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं
2
काँग्रेसने सर्वात आधी GST सुधारणांची मागणी केली; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
3
GST मधील कपातीमुळे शैक्षणिक फीसुद्धा कमी होणार?; शालेय साहित्य स्वस्त दरात मिळणार
4
'WhatsApp' वर मोठा धोका! केंद्र सरकारने दिला इशारा, अपडेट करण्याचा दिला सल्ला
5
GST Rate Cut: कार आणि बाईक झाल्या स्वस्त; पण Anand Mahindra यांनी केली आणखी एक मागणी...
6
Anant Chaturdashi 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी अनंत चतुर्दशीपासून २१ दिवस म्हणा 'हे' पॉवरफुल स्तोत्र!
7
Duleep Trophy 2025 Semi Final : यशस्वीचा अयशस्वी डाव; ऋतुराजच्या भात्यातून दिलासा देणारी 'फिफ्टी'
8
Video: पैज लागली, 500 रुपयांसाठी तरुणाची यमुनेच्या पुरात उडी; नंतर बघा काय घडलं?
9
मराठवाड्यातील ८५५० पैकी १५१६ गावांतच सापडल्या ‘कुणबी’च्या नोंदी
10
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षाची सुरुवात आणि शेवट ग्रहणाने; श्राद्धविधिवर होणार परिणाम?
11
Yamuna Flood: यमुनेचा रौद्रवतार, दिल्लीच्या नाकातोंडात पाणी! घरं पाण्याखाली, रस्तेही बंद; थरकाप उडवणारी दृश्ये
12
GSTच्या नव्या बदलांमुळे IPL 2026ची तिकीटे महागणार; पाहा किती जास्तीचे पैसे मोजावे लागणार?
13
कोकणात भाजप-शिंदेसेनेत फोडाफोडी? कुडाळमध्ये नगराध्यक्षासह ६ नगरसेवकांचं भाजपामधून निलंबन 
14
"तुझ्या चरणी येऊ न शकलेल्या...", भूषण प्रधानने 'लालबागचा राजा'कडे काय मागितलं? होतंय कौतुक
15
अटीतटीचा सामना, मैदानात वातावरण तापलं, हाणामारीपर्यंत गेलं, मग भज्जीने असं केलं होतं शोएब अख्तरचं गर्वहरण
16
GST On Cars: दिवाळीत कार खरेदी करणाऱ्यांना गिफ्ट; GST कपातीमुळे कोणती कार घेणं ठरणार फायदेशीर?
17
GST परिषदेच्या निर्णयानंतर सोने-चांदीच्या दरामध्ये घसरण! तुमच्या शहरतील आजचे ताजे भाव काय?
18
Hyundai ने लॉन्च केले Creta Electric चे नवीन व्हेरिएंट; 510 KM रेंज अन् किंमत फक्त इतकी...
19
Ajit Pawar: मराठा आरक्षणाच्या आंदोलनात राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न; अजितदादांची विरोधकांवर टीका
20
घर खरेदीदारांसाठी मोठी भेट! 'या' वस्तूवरील जीएसटीमध्ये मोठी कपात; घर बांधणेही होणार स्वस्त

कार्यालय हलविल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 05:00 IST

गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यातील मौशी, मेंढा, किरमिटी, कोर्धा, नवेगाव पांडव,तुकूम, पळसगाव, गिरगाव,सावरगाव येथून पुढे गेला आहे. संबंधित विभागाने या उपकालव्यासाठी या गावातील अनेक शेतकऱ्यांची जमीन १० वर्षांपूर्वी संपादित केली होती. त्यावेळी या शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला. पण शेकडो शेतकरी आजही मोबदल्यापासून वंचित आहेत. त्यावेळी मिंथूर, नवेगाव पांडव येथील जमिनीला ४८ हजार रूपये दर एकर याप्रमाणे मोबदला दिला होता.

ठळक मुद्देगोंडपिपरीतील कार्यालयाची पूनर्स्थापना हाच पर्याय

  घनश्याम नवघडे    लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : गोसेखुर्द प्रकल्पाच्या भूसंपादन विभागाचे चंद्रपूर येथील कार्यालय गोंडपिपरी येथे हलविल्यामुळे नागभीड, ब्रम्हपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन हे कार्यालय एक तर नागभीड किंवा ब्रम्हपुरी येथे स्थापित करावे नाही तर, चंद्रपूर येथेच या कार्यालयाची पुनर्स्थापना करावी, अशी या भागातील शेतकऱ्यांची मागणी आहे. गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यातील मौशी, मेंढा, किरमिटी, कोर्धा, नवेगाव पांडव,तुकूम, पळसगाव, गिरगाव,सावरगाव येथून पुढे गेला आहे. संबंधित विभागाने या उपकालव्यासाठी या गावातील अनेक शेतकऱ्यांची जमीन १० वर्षांपूर्वी संपादित केली होती. त्यावेळी या शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला. पण शेकडो शेतकरी आजही मोबदल्यापासून वंचित आहेत. त्यावेळी मिंथूर, नवेगाव पांडव येथील जमिनीला ४८ हजार रूपये दर एकर याप्रमाणे मोबदला दिला होता. हा अल्प मोबदला काही शेतकऱ्यांनी स्वीकारला. तर काही शेतकऱ्यांनी स्विकारला नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान नुकतेच याच विभागाने मिंथूर, नवेगाव पांडव परिसरातील एका शेतकऱ्यांना ४ लाख ६७ हजार रूपये एकर याप्रमाणे मोबदला दिला. शेतकऱ्यांनी हा संदर्भ देऊन राज्य शासनाकडे वाढीव मोबदल्याची मागणी केली. या मागणीचे उत्तर या शेतकऱ्यांना नुकतेच देण्यात आले. दरम्यान या उत्तरानंतर शेतकऱ्यांनी चंद्रपूर येथील कार्यालयात चौकशी केली असता येथील अधिकाऱ्यांनी गोंडपिपरी येथे जाऊन चौकशी करण्याचा सल्ला दिला. आता या शेतकऱ्यांनी पाठपुरावा करायचा म्हटले तर गोंडपिपरीलाच जावे लागणार आहे. वास्तविक हे कार्यालय पूर्वी चंद्रपूर येथे असल्याने मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांना चंद्रपूर येथे जाऊन पाठपुरावा करणे सोयीचे होते. मात्र हे कार्यालय आता गोंडपिपरी येथे हलविण्यात आल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. नागभीड ब्रम्हपुरी तालुक्याच्या दृष्टीने गोंडपिपरी हे ठिकाण गैरसोयीचे आहे. गोंडपिपरी येथे हलविण्यात आलेले कार्यालय शेतकऱ्यांचे आर्थिक व मानसिक छळ करणारे कार्यालय ठरत आहे, असा आरोप शेतकरी करीत आहेत.   

 गोंडपिपरी येथे हलविण्यात आलेले हे कार्यालय नागभीड तालुक्यासाठी गैरसोयीचेच नाही तर शेतकऱ्यांचे आर्थिक व मानसिक त्रास देणारे ठरत आहे.नागभीड किंवा ब्रम्हपुरी येथे या कार्यालयाची स्थापना करावी नाही तर  चंद्रपूर येथेच या कार्यालयाची पुनर्स्थापना करणे काळाची गरज  झाली आहे.-गोपाल शिवणकर , पीडित शेतकरी, मिंथूर.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प