शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

वेकोलि प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:04 IST

बल्लारपूर वेकोलि क्षेत्रातील पौनी २ व ३ कोळसा खाणीसाठी शेतकºयांच्या जमिनी ताब्यात घेऊनही मोबदला न मिळाल्याच्या निषेधार्थ शुक्रवारपासून आंदोलन सुरू आहे.

ठळक मुद्देआंदोलनाचा पाचवा दिवस : अधिकाºयांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारपूर वेकोलि क्षेत्रातील पौनी २ व ३ कोळसा खाणीसाठी शेतकºयांच्या जमिनी ताब्यात घेऊनही मोबदला न मिळाल्याच्या निषेधार्थ शुक्रवारपासून आंदोलन सुरू आहे. मात्र पाच दिवस होऊनही अधिकाºयांनी दखल घेतली नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.राजुरा तालुक्यातील साखरी येथील व परिसरातील वेकोलि प्रशासनाने जमिनी घेताना करारनामा करताना २०१२ च्या जमीन हस्तांतर कायद्याचा आधार घेण्यात आला. प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध होताच वेकोलि प्रशासनाने प्रकल्पग्रस्त ७०० वर शेतकºयांच्या फसवणुकीचे धोरण अवलंबिल्याने बल्लारपूर वेकोलि क्षेत्र विरोधात प्रकल्पग्रस्त शेतकºयांच्या आक्रोश उफाळून आला आहे. साखरी येथील हनुमान मंदीर परिसरातील पौनी-२ खाण येथे न्याय मागण्यासाठी लक्ष वेधण्यासाी २० आॅक्टोबरपासून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. यासाठी ऐन दिवाळीच्या सणातही प्रकल्पग्रस्तांनी बेमुदत उपोषण सोडले नाही. करारनाम्यानुसार प्रकल्पग्रस्त शेतकºयांना एकरी ८ ते १० लाख रुपये मोबदला मिळावा. सातबारा नमुन्यानुसार नोकरी द्यावी आदी अन्य मागण्याला धरून आंदोलन केले जात आहे.मात्र बल्लारपूर वेकोलिच्या अधिकाºयांची अद्यापही झोप उघडली नाही. मतांचा जोगवा मागणाºयांनीही ेआश्वासनाच्या पलीकडे काही केले नाही.आहे. भ्रष्टाचाराने बरबरटले वेकोलिच्या अधिकाºयांना प्रकल्पग्रस्तांच्या समस्येशी काहीच करणे नाही, अशी वृत्ती जोपासून आहेत. बल्लारपूर वेकोलिने पौनी २ व ३ कोळसा खाण सुरू करण्यासाठी तब्बल ७०२ शेतकºयांशी करार केला. करारनाम्यानुसार २०१६ पर्यंत जमिनीचा मोबदला एकरी ८ ते १० लाख रुपये व कुटुंबातील बेरोजगारांना नोकरी देण्याचे मान्य केले. पौनी-२ क्रमांकाची कोळसा खाण सुरू करताना काही शेतकºयांना मोबदला देण्यात आला. मात्र प्रकल्पग्रस्त शेतकºयांची दिशाभूल करून पौनी २ व ३ प्रकल्पातून कोळशाचे उत्खनन करूनही करारनुसार मोबदला व नोकरी देण्यास वेकोलिने टाळाटाळीचे धोरण स्वीकारले आहे.त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकºयात असंतोषाचा वणवा पेटला आहे. आंदोलनात साखरी येथील उत्तम बोबडे, अमोल घटे, यादव येरगुडे, शेषराव बोंडे, प्रमोद गाडगे, ज्ञानेश्वर येरगुडे, विजय बनसुले, लटारी भोयर, राकेश उरकुडे, शंकर उकीनकर, चंद्रकांत लेडांगे आदी प्रकल्पग्रस्तांसह शेकडो नागरीक सहभागी झाले आहेत.