शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
6
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
7
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
8
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
9
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
10
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
11
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
12
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
13
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
14
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
15
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
17
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

वेकोलि प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:04 IST

बल्लारपूर वेकोलि क्षेत्रातील पौनी २ व ३ कोळसा खाणीसाठी शेतकºयांच्या जमिनी ताब्यात घेऊनही मोबदला न मिळाल्याच्या निषेधार्थ शुक्रवारपासून आंदोलन सुरू आहे.

ठळक मुद्देआंदोलनाचा पाचवा दिवस : अधिकाºयांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारपूर वेकोलि क्षेत्रातील पौनी २ व ३ कोळसा खाणीसाठी शेतकºयांच्या जमिनी ताब्यात घेऊनही मोबदला न मिळाल्याच्या निषेधार्थ शुक्रवारपासून आंदोलन सुरू आहे. मात्र पाच दिवस होऊनही अधिकाºयांनी दखल घेतली नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.राजुरा तालुक्यातील साखरी येथील व परिसरातील वेकोलि प्रशासनाने जमिनी घेताना करारनामा करताना २०१२ च्या जमीन हस्तांतर कायद्याचा आधार घेण्यात आला. प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध होताच वेकोलि प्रशासनाने प्रकल्पग्रस्त ७०० वर शेतकºयांच्या फसवणुकीचे धोरण अवलंबिल्याने बल्लारपूर वेकोलि क्षेत्र विरोधात प्रकल्पग्रस्त शेतकºयांच्या आक्रोश उफाळून आला आहे. साखरी येथील हनुमान मंदीर परिसरातील पौनी-२ खाण येथे न्याय मागण्यासाठी लक्ष वेधण्यासाी २० आॅक्टोबरपासून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. यासाठी ऐन दिवाळीच्या सणातही प्रकल्पग्रस्तांनी बेमुदत उपोषण सोडले नाही. करारनाम्यानुसार प्रकल्पग्रस्त शेतकºयांना एकरी ८ ते १० लाख रुपये मोबदला मिळावा. सातबारा नमुन्यानुसार नोकरी द्यावी आदी अन्य मागण्याला धरून आंदोलन केले जात आहे.मात्र बल्लारपूर वेकोलिच्या अधिकाºयांची अद्यापही झोप उघडली नाही. मतांचा जोगवा मागणाºयांनीही ेआश्वासनाच्या पलीकडे काही केले नाही.आहे. भ्रष्टाचाराने बरबरटले वेकोलिच्या अधिकाºयांना प्रकल्पग्रस्तांच्या समस्येशी काहीच करणे नाही, अशी वृत्ती जोपासून आहेत. बल्लारपूर वेकोलिने पौनी २ व ३ कोळसा खाण सुरू करण्यासाठी तब्बल ७०२ शेतकºयांशी करार केला. करारनाम्यानुसार २०१६ पर्यंत जमिनीचा मोबदला एकरी ८ ते १० लाख रुपये व कुटुंबातील बेरोजगारांना नोकरी देण्याचे मान्य केले. पौनी-२ क्रमांकाची कोळसा खाण सुरू करताना काही शेतकºयांना मोबदला देण्यात आला. मात्र प्रकल्पग्रस्त शेतकºयांची दिशाभूल करून पौनी २ व ३ प्रकल्पातून कोळशाचे उत्खनन करूनही करारनुसार मोबदला व नोकरी देण्यास वेकोलिने टाळाटाळीचे धोरण स्वीकारले आहे.त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकºयात असंतोषाचा वणवा पेटला आहे. आंदोलनात साखरी येथील उत्तम बोबडे, अमोल घटे, यादव येरगुडे, शेषराव बोंडे, प्रमोद गाडगे, ज्ञानेश्वर येरगुडे, विजय बनसुले, लटारी भोयर, राकेश उरकुडे, शंकर उकीनकर, चंद्रकांत लेडांगे आदी प्रकल्पग्रस्तांसह शेकडो नागरीक सहभागी झाले आहेत.