शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भवाद्यांच्या आंदोलनाचा डाव उधळला

By admin | Updated: September 21, 2016 00:42 IST

विदर्भ राज्य आंदोलन समितीने ३ सप्टेंबरला मुंबई येथील प्रेस क्लबमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत...

कार्यकर्त्यांना अटक व सुटका : बाळा नांदगावकर यांचा करणार होते निषेधवरोरा : विदर्भ राज्य आंदोलन समितीने ३ सप्टेंबरला मुंबई येथील प्रेस क्लबमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मनसे कार्यकर्त्यांनी अखंड महाराष्ट्राच्या घोषणा देत गोंधळ घातला होता. त्याचे पडसाद विदर्भात पाहावयास मिळाले. ही घटना घडल्यानंतर मंगळवारी मनसे नेते बाळा नांदगावकर हे वणी येथील कार्यक्रमाकरिता वरोरा येथून जाणार असल्याची माहिती विदर्भवाद्यांना कळताच विदर्भवाद्यांचा ताफा रत्नमाला चौकात पोहोचला व काळे झेंडे दाखवून निषेध करण्याच्या तयारीत होते. मात्र पोलिसांनी विदर्भवाद्यांना अटक करून आंदोलनाचा डाव उधळला. स्वतंत्र विदर्भासाठी ३ व ४ आॅक्टोबरला प्रति विधानसभेचे आयोजन करणाऱ्या नागपूरच्या विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पत्रकार परिषदेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचे पडसाद १४ सप्टेंबरला वरोरा शहरातही दिसून आले. वरोरा येथील सद्भावना चौकात काळ्या फिती लावून मनसेचा झेंडा जाळून निदर्शने देत निषेध नोंदविण्यात आला होता. त्याच्या प्रतिउत्तरात मनसेचे तालुकाध्यक्ष मनीष जेठानी यांनी मनसेच्या झेंड्यावर अखंड महाराष्ट्र, असा लिहिलेल्या झेंडा डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात झेंडा फडकविला होता. मंगळवारी मनसेचे नेते माजी आमदार बाळा नांदगावकर हे वणी येथे आयोजित शेतकरी मार्गदर्शन शिबिर व कार्यकर्ता मेळाव्याला वरोरा येथून जात असल्याचे विदर्भवाद्यांना कळताच विदर्भ राज्य आंदोलन समितीचे कोर कमेटी सदस्य अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांच्या नेतृत्वात बाळा नांदगावकर यांना काळे झेंडे दाखवून मुंबई येथील घटनेचा निषेध करण्याची तयारी होती. पोलिसांना आंदोलनाची भनक लागताच वरोरा पोलिसांनी कोर कमेटी सदस्य अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे, युवा आघाडी जिल्हा सचिव आशिष घुमे, वरोरा तालुका अध्यक्ष सुधाकर जीवतोड यांना अटक करून काही वेळानंतर त्यांची सुटका केली. त्यामुळे विदर्भवाद्यांचे आंदोलन पूर्ण होऊ शकले नाही. (शहर प्रतिनिधी)विदर्भ राज्याला विरोध नाहीबाळा नांदगावकर यांनी मनसे वरोरा तालुका कार्यालयाला भेट दिली व वेगळ्या विदर्भाबाबत बोलताना, सामान्य जनतेला वेगळा विदर्भ पाहिजे असेल तर त्या विषयी आमचे काहीच म्हणणे नाही. मात्र मूठभर लोकांना जर वेगळा विदर्भ हवा असेल तर आमची अखंड महाराष्ट्राची भूमिका कायम राहणार आहे, अशी प्रतिक्रीया दिली.