शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

मोबदल्यासाठी पोवनी कोळसा खाणींच्या प्रकल्पग्रस्त शेतकºयांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 23:53 IST

राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत नव्याने सुरू झालेली पोवनी-२ कोळसा खाण प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता बंद पाडली.

ठळक मुद्देबेमुदत उपोषण सुरू : वेकोलिची पोवनी-२ कोळसा खाण पाडली बंद

लोकमत न्यूज नेटवर्कसास्ती : राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत नव्याने सुरू झालेली पोवनी-२ कोळसा खाण प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता बंद पाडली. आपल्या हक्काच्या मोबदल्यासाठी व इतर मागण्यांकरिता प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन सुरू केले असून खाणीसमोर मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत विविध नव्या कोळसा खाणीकरिता परिसरातील साखरी, पोवनी, वरोडासह इतर गावातील सुपिक जमिनीचे अधिग्रहण सुरू आहे. पोवनी २ व ३ या कोळसा खाणीकरिता पोवनी, साखरी, वरोडा येथील शेतकºयांना शेतजमिनी २७ नोव्हेबर २०१५ रोजी वेकोलि प्रशासनाने सेक्शन ११ लावून अधिग्रहीत करणे सुरू केले. आॅक्टोबर २०१६ पासून पोवनी-३ प्रकल्पग्रस्तांचे अ‍ॅग्रीमेंट सुरू केले. परंतु, अजूनही प्रकल्पग्रस्तांना मोबदला मिळालेला नाही. मात्र २४ सप्टेंबरला साखरी येथे वेकोलि प्रशासनाच्या अधिकाºयांनी पोवनी-३ च्या प्रकल्पग्रस्त शेतकºयांची बैठक घेऊन प्रकल्पग्रस्त शेतकºयांना २०१३ च्या नव्या कायद्यानुसार अधिग्रहणाचा दर कमी झाला असून तो २ ते ३ लाख रुपये प्रती एकरी दिला जाईल, अशी माहिती दिली. त्यावर प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी हा दर मान्य नसून आम्ही आमच्या जमिनी वेकोलिला देणार नाही, असा इशारा दिला. त्यानंतर प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी आंदोलनाचा इशाराही दिला. परंतु, वेकोलि प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले.दरम्यान, मंगळवारी प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी आंदोलन सुरू करून साखरी येथील हनुमान मंदिरातून रॅली काढून वेकोलिच्या पोवनी-२ ही खाण सकाळी ११ वाजताच्या सुमारास बंद पाडली. त्यानंतर खाणीसमोरील रस्त्यावर बेमुदत उपोषण सुरू केले. उपोषणस्थळी वेकोलिचे अधिकारी मनोज नवले, रमेशसिंग यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेत मुख्य महाप्रबंधकांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिलेया आंदोलनात सरपंच भाऊ कोडापे, अमोल घटे, धर्मराज उरकुडे, खुशाब पोडे, विजय काटवले, शेषराव बोंडे, उत्तम बोबडे, अरुण उरकुडे, मारोती उरकुडे, अविनाश देठे, विनोद गालफाडे, नरेश लांडे, संदिप बोढे, विनोद कावळे, शैलेश गंपावार, व्यंकन्ना, चंद्रकांत लेडांगे, जितू उमरे यांच्या सह शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकरी सहभागी होते.