शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

मानवशास्त्रीय सर्वेक्षण न थांबविल्यास आंदोलन

By admin | Updated: October 25, 2015 00:57 IST

आदिवासींच्या ४७ जमातीपैकी १७ जमातीचा मानवशास्त्रीय दृष्टिकोनातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारा नियोजित अभ्यास करण्याच्या दृष्टीने ...

आरोप : आदिवासींमध्ये वाद लावण्याचा प्रयत्नचंद्रपूर : आदिवासींच्या ४७ जमातीपैकी १७ जमातीचा मानवशास्त्रीय दृष्टिकोनातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारा नियोजित अभ्यास करण्याच्या दृष्टीने शासनाने १७ जमातीच्या मानवशास्त्रीय दृष्टिकोनातून सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. ते सर्वेक्षण म्हणजे आदिवासीची मूळ जमात असलेली परधान जमात ही आदिवासी जमातीतून वगळण्याचे षड्यंत्र आहे. त्यामुळे हे मानवशास्त्रीय सर्वेक्षण तात्काळ थांबवावे व आदिवासींमध्ये भांडण लावण्याचा प्रकार थांबवावा अन्यथा आदिवासी समाज त्याविरूद्ध आंदोलन छेडेल. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला शासन जबाबदार राहील, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते डी.पी. आत्राम यांच्या नेतृत्वातील सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट आॅफ इंडीजिनस एमप्लॉइज मल्टीपरपज असोसिएशन या सामाजिक संघटनेने दिला आहे.आदिवासीच्या विकासाच्या दृष्टीने आढावा घेण्याकरीता बेंचमार्क सर्वे होत असताना आदिवासीची मुळ जमात असलेली परधान जमात ही मानवशास्त्रीय दृष्टिकोनातून सरकारला व प्रशासनाला सर्वे करण्याची आताच कशी काय बुद्धी सुचली, असा प्रश्न त्यांनी शासनाला विचारला आहे.भारतीय घटना निर्मितीच्यावेळी आरक्षण देण्याचा संबंधाने संविधान सभेत मोठी चर्चा झाली आणि आदिवासींच्या जमातीचा अभ्यास करून एकुण ४७ जमाती आदिवासी जमातीमध्ये समाविष्ट करण्यात आले व त्यांना सर्वांगिन आरक्षण देण्यात आले. तो भारतीय राज्यघटनेने दिलेला हा आमचा घटनादत्त अधिकार आहे.घटना समितीने व त्या समितीच्या सदस्याने देशभर दौरे करून अभ्यास करून आरक्षण दिले असता, आता आरक्षणाच्या संबंधाने सर्वेक्षण करणे मानवशास्त्रीय सर्वेक्षणाच्या नावावर आदिवासींच्या सुधारित जमातीचा सर्वे करून परधान जमात ही आदिवासी मधील सुधारित जमात आहे आणि या जमातीला आदिवासींच्या ४७ जमाती मधुन वगळण्याची शिफारस देखील ही समिती करू शकते. त्यामुळे आदिवासी समाजाने एक होवून हा कुटील डाव हाणून पाडावा, अशी आदिवासी समाजाला विनंतीदेखील सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट आॅफ इंडीजिनस एमप्लॉइज मल्टीपरपज असोसिएशन या संघटनेचे महासचिव डी.पी. आत्राम यांनी केली आहे.१७ आदिवासी जमातीचे सर्वेक्षण करून म्हणजेच आदिवासीतील गोंड विरूद्ध परधान असा वाद लावण्याचा प्रकार असल्याचे आत्राम यांनी म्हटले आहे. हा आदिवासी आरक्षण विरोधी लोकांचे षड्यंत्र आहे. हे आदिवासी समाजाने समजून घेतले पाहिजे व आरक्षण विरोधीत लोकांच्या कुटील डावाला बळी पडून आपले व आदिवासीतील ४७ जमातीचे नुकसान करून घेऊ नये म्हणून हे सर्वेक्षण आदिवासीतील ४७ जमातीतील एकजुटीने विरोध करून हा डाव हानुन पाडण्याचे आवाहन देखील डी.पी. आत्राम यांनी केले आहे.या मानवशास्त्रीय अभ्यास समितीचा सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट आॅफ इंडीजिनस एमप्लॉइज मल्टीपरपज असोसिएशन या संघटनेच्यावतीने निषेध करून हे सर्वेक्षण तत्काळ थांबवावे अन्यथा दलित आदिवासी शोषित पीडित जनता हे कदापीही सहन करणार नाही. आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास या परिस्थितीस सर्वस्वी सरकार जबाबदार राहील, असा इशारा एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट आॅफ इंडीजिनस एमप्लॉईज मल्टीपरपज असोसिएशन या संघटनेने दिला आहे. (प्रतिनिधी)