शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

मानवशास्त्रीय सर्वेक्षण न थांबविल्यास आंदोलन

By admin | Updated: October 25, 2015 00:57 IST

आदिवासींच्या ४७ जमातीपैकी १७ जमातीचा मानवशास्त्रीय दृष्टिकोनातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारा नियोजित अभ्यास करण्याच्या दृष्टीने ...

आरोप : आदिवासींमध्ये वाद लावण्याचा प्रयत्नचंद्रपूर : आदिवासींच्या ४७ जमातीपैकी १७ जमातीचा मानवशास्त्रीय दृष्टिकोनातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारा नियोजित अभ्यास करण्याच्या दृष्टीने शासनाने १७ जमातीच्या मानवशास्त्रीय दृष्टिकोनातून सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. ते सर्वेक्षण म्हणजे आदिवासीची मूळ जमात असलेली परधान जमात ही आदिवासी जमातीतून वगळण्याचे षड्यंत्र आहे. त्यामुळे हे मानवशास्त्रीय सर्वेक्षण तात्काळ थांबवावे व आदिवासींमध्ये भांडण लावण्याचा प्रकार थांबवावा अन्यथा आदिवासी समाज त्याविरूद्ध आंदोलन छेडेल. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला शासन जबाबदार राहील, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते डी.पी. आत्राम यांच्या नेतृत्वातील सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट आॅफ इंडीजिनस एमप्लॉइज मल्टीपरपज असोसिएशन या सामाजिक संघटनेने दिला आहे.आदिवासीच्या विकासाच्या दृष्टीने आढावा घेण्याकरीता बेंचमार्क सर्वे होत असताना आदिवासीची मुळ जमात असलेली परधान जमात ही मानवशास्त्रीय दृष्टिकोनातून सरकारला व प्रशासनाला सर्वे करण्याची आताच कशी काय बुद्धी सुचली, असा प्रश्न त्यांनी शासनाला विचारला आहे.भारतीय घटना निर्मितीच्यावेळी आरक्षण देण्याचा संबंधाने संविधान सभेत मोठी चर्चा झाली आणि आदिवासींच्या जमातीचा अभ्यास करून एकुण ४७ जमाती आदिवासी जमातीमध्ये समाविष्ट करण्यात आले व त्यांना सर्वांगिन आरक्षण देण्यात आले. तो भारतीय राज्यघटनेने दिलेला हा आमचा घटनादत्त अधिकार आहे.घटना समितीने व त्या समितीच्या सदस्याने देशभर दौरे करून अभ्यास करून आरक्षण दिले असता, आता आरक्षणाच्या संबंधाने सर्वेक्षण करणे मानवशास्त्रीय सर्वेक्षणाच्या नावावर आदिवासींच्या सुधारित जमातीचा सर्वे करून परधान जमात ही आदिवासी मधील सुधारित जमात आहे आणि या जमातीला आदिवासींच्या ४७ जमाती मधुन वगळण्याची शिफारस देखील ही समिती करू शकते. त्यामुळे आदिवासी समाजाने एक होवून हा कुटील डाव हाणून पाडावा, अशी आदिवासी समाजाला विनंतीदेखील सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट आॅफ इंडीजिनस एमप्लॉइज मल्टीपरपज असोसिएशन या संघटनेचे महासचिव डी.पी. आत्राम यांनी केली आहे.१७ आदिवासी जमातीचे सर्वेक्षण करून म्हणजेच आदिवासीतील गोंड विरूद्ध परधान असा वाद लावण्याचा प्रकार असल्याचे आत्राम यांनी म्हटले आहे. हा आदिवासी आरक्षण विरोधी लोकांचे षड्यंत्र आहे. हे आदिवासी समाजाने समजून घेतले पाहिजे व आरक्षण विरोधीत लोकांच्या कुटील डावाला बळी पडून आपले व आदिवासीतील ४७ जमातीचे नुकसान करून घेऊ नये म्हणून हे सर्वेक्षण आदिवासीतील ४७ जमातीतील एकजुटीने विरोध करून हा डाव हानुन पाडण्याचे आवाहन देखील डी.पी. आत्राम यांनी केले आहे.या मानवशास्त्रीय अभ्यास समितीचा सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट आॅफ इंडीजिनस एमप्लॉइज मल्टीपरपज असोसिएशन या संघटनेच्यावतीने निषेध करून हे सर्वेक्षण तत्काळ थांबवावे अन्यथा दलित आदिवासी शोषित पीडित जनता हे कदापीही सहन करणार नाही. आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास या परिस्थितीस सर्वस्वी सरकार जबाबदार राहील, असा इशारा एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट आॅफ इंडीजिनस एमप्लॉईज मल्टीपरपज असोसिएशन या संघटनेने दिला आहे. (प्रतिनिधी)