शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

मनपा सफाई कामगारांचे आंदोलन न्यायपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 22:07 IST

चार दिवसांपासून सुरू असलेल्या स्वच्छता कामगारांच्या आंदोलनाकडे मनपा पदाधिकारी व अधिकारी डोळेझाक करीत आहेत. कामगारांचे आंदोलन न्यायपूर्ण असल्याने मागण्या मान्य करण्याची मागणी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केली. शनिवारी आंदोलनस्थळी भेट घेऊन कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. मनपाकडून कंत्राटदाराला ५८० रूपये दिले जाते. परंतु कामगारांना फक्त २५६ रूपये देण्यात येते, असा आरोपही त्यांनी केला.

ठळक मुद्देनरेश पुगलिया : सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चार दिवसांपासून सुरू असलेल्या स्वच्छता कामगारांच्या आंदोलनाकडे मनपा पदाधिकारी व अधिकारी डोळेझाक करीत आहेत. कामगारांचे आंदोलन न्यायपूर्ण असल्याने मागण्या मान्य करण्याची मागणी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केली. शनिवारी आंदोलनस्थळी भेट घेऊन कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. मनपाकडून कंत्राटदाराला ५८० रूपये दिले जाते. परंतु कामगारांना फक्त २५६ रूपये देण्यात येते, असा आरोपही त्यांनी केला.दुपारी ३ वाजता माजी खासदार पुगलिया यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. कामगारांच्या सर्व मागण्या कायद्याला अनुसरून असल्याने या आंदोलनाला सक्रीय पाठींबा देत असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. सोमवारी १२ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनकर्त्याचा धडक मोर्चा आयोजित करण्यात आला. जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांना आंदोलनकर्ते विविध मागण्यांचे निवेदन सादर करणार आहेत. यानंतरही आंदोलनकर्त्यांनी बेमुदत साखळी उपोषण सुरूच ठेवणार आहेत, याकडेही माजी खा. पुगलिया यांनी लक्ष वेधले. कामगारांनी तर मनपाच्या अन्यायाचाच पाढा वाचला.यावेळी चंद्रपूर शहर महानगरपालिकाचे काँँग्रेसचे गटनेता डॉ. सुरेश महाकुलकर, चंद्रपूर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष गजाननराव गावंडे, चंद्रपूर जिल्हा काँँग्रेसचे महासचिव अ‍ॅड. अविनाश ठावरी, इंटकचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पोडे, नगरसेवक प्रशांत दानव, अशोक नागापूरे, नगरसेवक प्रवीण पडवेकर, युवक काँंग्रेसचे पंकज गुप्ता व शेकडो कार्यकर्ते, कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.आंदोलनस्थळी कामगारांसह फराळ दिवाळीकिमान वेतनासह विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी महानगर पालिकेच्या सफाई कामगारांनी कामबंद आंदोलन पूकारले आहे. त्यांच्या आंदोलनाचा शनिवारी चौथा दिवस असला तरी मागण्यांची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे कामगारांची दिवाळी अंधारात गेली आहे. दरम्यान, किशोर जोरगेवार यांनी आज आंदोलनस्थळी भेट देऊन कामगारांसोबत फराळ करत दिवाळी साजरी केली. कामगारांची दिवाळी अंधारमय करत स्वत:ची दिवाळी उत्साहात साजरी करणाऱ्यांच्या जीवणात कधीच प्रकाश येणार नाही, असे वक्तव्यही यावेळी जोरगेवार यांनी केले. कामगारांच्या मागण्या तत्काळ सोडविण्याची मागणी केली. कामगारांच्या आंदोलनाने शहरात साचलेल्या घाणीमुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. याचा मोठा विपरीत परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यताही जोरगेवार यांनी वर्तविली. कामगार बेमुदत उपोषणावर पूर्णत: ठाम आहेत. यावेळी विनोद अंनतावार, सुनिल पाटील, वंदना हातगावकर, संतोषी चौव्हाण, सुजाता बल्ली, राजेश मंगळूरकर, संजय मेश्राम, पुण्यवर्धन मेश्राम आदी उपस्थित होते.