शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पाण्यासाठी धरणाच्या पाण्यात आंदोलन

By admin | Updated: December 20, 2014 22:35 IST

रब्बी हंगामातील पिकांना त्वरित पाणी मिळावे व अंबुजा पाणी करार रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी आज शनिवारी संतप्त शेतकऱ्यांनी पकडीगड्डम धरणात उतरून जलआंदोलन केले.

पकडीगड्डम धरण : सहा तास शेतकरी उभे होते पाण्यातूनांदाफाटा : रब्बी हंगामातील पिकांना त्वरित पाणी मिळावे व अंबुजा पाणी करार रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी आज शनिवारी संतप्त शेतकऱ्यांनी पकडीगड्डम धरणात उतरून जलआंदोलन केले. यात पिपर्डा, सोनुर्ली, वनसडी, लोणी, नामा यासह १२ गावातील तब्बल ५०० शेतकरी सहभागी झाले होते. यापैकी ७० ते ८० शेतकऱ्यांनी सहा तास पाण्यात उभे राहून अंबुजा करार रद्द करा, शेतकऱ्यांना पाणी द्या, अशा घोषणा देत आंदोलन केले. सन १९९९ मध्ये अंबुजा सिमेंट कंपनीला पाणी देण्यासंबंधीचा करार करण्यात आला. यामध्ये प्रथम १२ गावातील शेतकऱ्यांच्या २९६८ हेक्टर शेतीला पाणी त्यानंतर पिण्याचे पाणी व सिमेंट कंपनीला उर्वरित पाणी, असा करार आहे. मात्र येत्या काही वर्षात शेतीला पाणी देण्याचे टाळून कंपनीमार्फत धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा केला जात आहे. त्यामुळे गावकऱ्यांचे शेतीचे पाणी पिण्याचे पाणी कंपनीच्या घशात जात आहे. तालुक्यात अमलनाला व पकडीगड्डम ही दोन मोठे धरणे आहेत. जवळपास ४५०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. यात काही जमिनीवर वर्धा व पैनगंगा नदीच्या पाण्याचा वापर केला जातो. तर बऱ्याच रोगात बोअरवेल विहिरीमार्फत सिंचन होत आहे. यातच अमलनाला व पकडीगड्डम धरणांतर्गत येणाऱ्या गावांना पाणी न देता सदर विभाग सिमेंट कंपन्यांचे अधिक लाड पुरविताना दिसत आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज थेट धरणाच्या पाण्यात उतरून आंदोलन केले.सकाळी ११ वाजतापासून सुरू झालेले आंदोलन सायंकाळी ५.३० पर्यंत कायम होते. मात्र एकही सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या आंदोलनाला उपस्थिती दाखविली नाही. त्यामुळे शेवटी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी स्वत: पाण्याचे वॉल्व सुरू करून आंदोलनाची समाप्ती केली. ठाणेदार काळे यांच्या उपस्थितीत पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला व परिस्थिती हाताळली. (वार्ताहर)मागणीकडे सातत्याने दुर्लक्षगेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचा सिंचनासाठी पाणी मिळावे, या मागणीसाठी संघर्ष सुरू आहे. यासाठी लोकप्रतिनिधी, सिंचन विभागाचे अधिकारी, मंत्री यांना वारंवार निवेदन देण्यात आले. नुकतेच कोरपना येथे तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. मात्र संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने शेवटी जलआंदोलनाची भूमिका शेतकऱ्यांना घ्यावी लागली. आताही संबंधित विभाग याकडे लक्ष देत नसेल तर काही दिवसातच तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला आहे.