शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

हिरव्या बांबूसाठी कारागिरांचे आंदोलन

By admin | Updated: December 8, 2014 22:33 IST

जिल्ह्यात जवळपास ५ हजाराच्यावर बांबू कारागीर आहे. बांबूपासून टोपली, सुप अशा विविध वस्तू बनवून आपला उदरनिर्वाह चालवित आहे. मात्र त्यांना वनविभागाकडून हिरवे बांबू उपलब्ध करून दिल्या जात नाही.

चंद्रपूर : जिल्ह्यात जवळपास ५ हजाराच्यावर बांबू कारागीर आहे. बांबूपासून टोपली, सुप अशा विविध वस्तू बनवून आपला उदरनिर्वाह चालवित आहे. मात्र त्यांना वनविभागाकडून हिरवे बांबू उपलब्ध करून दिल्या जात नाही. बांबू उपलब्ध करून देण्यासाठी श्रमिक एल्गारच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.सिंदेवाही तालुक्यातील मोहाळी येथील कारागीर जंगलातून बाबू आणून कारागिरी करतात. या कारागिरांना वनविभागाचे अधिकाऱ्याकडून त्रास होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान श्रमिक एल्गारच्या संस्थापिका अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात बफरचे उपवनसंरक्षक नरवणे यांच्या कार्यालयात बांबूची मागणी व रोजगाराची मागणी करीत ठिय्या आंदोलन केले. आम्ही कारागीर असुन आमचे काम पहा असे म्हणत कार्यालयासमोरच बांबूपासून टोपली, सुप अशा विविध वस्तू कारागिरांनी बनविल्या. बनविलेल्या वस्तू डिएफओ नरवणे यांना भेट दिल्या. नरवणे यांनी मोहाळी हे गाव दत्तक घेणार असल्याचे सांगून येथील वस्तूसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. याचवेळी सावली वनपरीक्षेत्रातील बांबू कारागिरांचे एक वर्षापासून बांबू कार्ड न दिल्याने उपवनसंरक्षक पाटील यांचे कार्यालयातही कारागिरांनी गोंधळ झाला. मात्र डिएफओ पाटील हजर नसल्याने सहायक वनसंरक्षक पवार यांनी लवकरात लवकर कार्ड देण्याचे आश्वासन दिले.या आंदोलनात विजय सिध्दावार, विजय कोरेवार, शहनाज बेग, पुष्पा नेवारे, छाया सिडाम, सुलेमान बेग, नंदलाल मडावी, मिलींद मडावी, ब्रम्हानंद गेडाम, लिलाबाई मडावी, गिताबाई सिडाम, रेखा सिडाम, संगिता गेडाम, अनिल मडावी, प्रेमदास उईके आदी कार्यकर्ते, कारगीर सहभागी होते. (नगर प्रतिनिधी)