शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

त्या अपघातामुळे आवळगाववर शोककळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:16 IST

आवळगाव : गावात कामधंदा नाही, रोजगार नाही म्हणून कामगार आपल्या व परिवाराची पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडून ऊस ...

आवळगाव : गावात कामधंदा नाही, रोजगार नाही म्हणून कामगार आपल्या व परिवाराची पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडून ऊस तोडणी, धान लावणी, कापूस वेचणी, मिरची तोडणे अशी मिळेल ती कामे करण्यासाठी बाहेरगावी जात असतात. बाहेरगावावरून आणलेल्या कमाईतून आपल्या संसाराचा गाडा चालवत असतात. पोटाची खळगी भरण्यासाठी सुरू असलेली भटकंती कामगारांच्या जीवावर बेतली. असेच कामासाठी बाहेर गेलेले आणि होळीसाठी घरी परत येणाऱ्या चार कामगारांचा गडचिरोली जिल्ह्यातील अपघातात मृत्यू झाला. यातील दोन कामगार आवळगाव व एक कामगार कुडेसावलीचा आहे.

आवळगाव, हळदा, बोडदा, कुडे सावली येथील रहिवासी असलेले शेतमजूर, मजूर वर्ग तेलंगणा राज्यात मिरची तोडण्यासाठी गेले होते. मिरची तोडणीचे काम आटोपून ते पिकअप वाहन भाड्याने घेऊन होळीच्या सणानिमित्त स्वगावी परत येत होते. परत येत असता चौडमपल्लीजवळ चंदनखेडी फाट्यालगत आष्टी- आलापल्ली मार्गावर अहेरी आगाराची शिवशाही बस व पिकअप वाहन यांची समोरासमोर धडक होऊन घटनास्थळी वाहन चालकासह तीन कामगार ठार झाले तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मृतांमध्ये आवळगाव येथील नयना प्रभाकर निकुरे व देवाजी खोकले

तर कुडेसावली येथील एकाचा समावेश आहे. यात शुभम प्रभाकर निकुरे, पुष्पा देवाजी खोकले, निराशा जुमनाके, सत्यम जुमनाके सर्व रा. आवळगाव, तानाबाई आवारी, अर्चना आवारी रा. हळदा हे जखमी झाले. अपघातामुळे ऐन होळीच्या दिवशी आवळगाव व कुडेसावली गावात शोककळा पसरली आहे.