शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल २५ दिवसानंतर झाली आई-मुलाची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 05:01 IST

बोरचांदली येथील चौथीत शिकणाऱ्या संकेत रामटेके या बालकाच्या वडिलाचे १ एप्रिल रोजी निधन झाले. मात्र तेलंगणात मिरची तोडण्यासाठी गेलेली संकेतची आई लॉकडाऊनमुळे अंत्यसंस्कारासाठी घरी येऊ शकली नाही. अखेर आईच्या अनुपस्थितीत संकेतने वडिलाच्या चितेला भडाग्नी दिली. समाजमन हादरून सोडणाºया रामटेके कुटुंबाची माहिती पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख यांना मिळाली.

ठळक मुद्देसावली तालुक्यातील खेडी येथील घटना, पतीचे घेता आले नाही अंत्यदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कवढोली : मिरची तोडण्यासाठी तेलंगणा राज्यात गेलेली आई लॉकडाऊनमुळे अडकली होती. दरम्यान पतीचे अचानक निधन झाले. मात्र पत्नीला अखेरचे दर्शनही घेता आले नाही. मुलाची काळजी आणि पती गेल्याच्या दु:खाने अस्वस्थ झालेल्या आईची तब्बल २५ दिवसानंतर मुलाशी भेट झाली, वेदनादायी असलेल्या सावली तालुक्यातील खेडी येथील या घटनेचा शेवट भेटीने झाल्याने वातावरण भावूक झाले होते.बोरचांदली येथील चौथीत शिकणाऱ्या संकेत रामटेके या बालकाच्या वडिलाचे १ एप्रिल रोजी निधन झाले. मात्र तेलंगणात मिरची तोडण्यासाठी गेलेली संकेतची आई लॉकडाऊनमुळे अंत्यसंस्कारासाठी घरी येऊ शकली नाही. अखेर आईच्या अनुपस्थितीत संकेतने वडिलाच्या चितेला भडाग्नी दिली. समाजमन हादरून सोडणाऱ्या रामटेके कुटुंबाची माहिती पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख यांना मिळाली. गोंडपिपरीचे ठाणेदार संदीप धोबे यांना लगेच सूचना देऊन संकेतची आई कविता रामटेके यांना तेलंगणातून बोरचांदली येथे आणण्याचे कळविले. दरम्यान, राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे यांनीही प्रयत्न सुरू केले. पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख यांनी पोलीस आयुक्त कार्यालयातून सर्व कायदेशीर प्रक्रिया करून घेतल्या. त्यामुळे आई व मुलाची भेट होऊ शकली.गोंडपिपरी पोलिसांकडून माणुसकीचे दर्शनअखेर तेलंगणात अडकलेल्या कविताला आणण्यासाठी २३ एप्रिल रोजी परवानगी मिळाली. बोरचांदली येथून ६०० किलोमीटर दूर असलेल्या कविता रामटेके यांना आणण्यासाठी २४ एप्रिल रोजी तेलंगणात एक वाहन रवाना करण्यात आले. २४ तासांच्या प्रवासानंतर ती सावली तालुक्यातील खेडी येथे पोलिसांसह माहेरी पोहोचली. वडिलाचे निधन झाल्याने मुलगा संकेत हा खेडी येथे आजी आणि मामाकडे राहत होता. वडिलाची सावली हरवलेल्या संकेतला आई आल्याचे समजताच त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही.लॉकडाऊनमुळे तेलंगणात अडकल्याने अनेक कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे आई व मुलगा एकत्र आणण्याकरिता आयुक्त कार्यालयापर्यंत पाठपुरावा करावा लागला. पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य होऊ शकले.- संदीप धोबे, ठाणेदार, गोंडपिपरी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या