शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

बल्लारपूरचे ठाणे सर्वाधिक देखणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 23:09 IST

महाराष्ट्रातील सर्वाधिक देखणे पोलीस ठाणे असलेले शहर म्हणून बल्लारपूर ओळखले जाईल. या लौकिकाप्रमाणेच या शहरात पोलीस विभागाच्या सौजन्यशील वर्तनाचादेखील या इमारतीतून परिचय होईल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी रात्री केले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : बल्लारपुरात उपविभागीय पोलीस अधिकारीपद निर्मितीचे संकेत

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्रातील सर्वाधिक देखणे पोलीस ठाणे असलेले शहर म्हणून बल्लारपूर ओळखले जाईल. या लौकिकाप्रमाणेच या शहरात पोलीस विभागाच्या सौजन्यशील वर्तनाचादेखील या इमारतीतून परिचय होईल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी रात्री केले.बल्लारपूर येथे किल्ल्याच्या स्वरूपातील पोलीस स्टेशनच्या देखण्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.ब्रिटीश काळातील १९४४ च्या इमारतीमध्ये बल्लारपूर येथील पोलीस ठाण्याचे काम सुरू होते. आता या ठिकाणी प्राचीन गोंड राज्याची राजधानी असलेल्या बल्लारपूर शहराच्या इतिहासाला साजेसे किल्ल्याचे स्वरूप असलेले आधुनिक इमारतीचे लोकार्पण झाले. या लोकार्पण सोहळ्यात लवकरच बल्लारपूर येथे उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे पद निर्माण करण्याचे संकेत ना. मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.या इमारतीमध्ये पोलीस विभागासाठी अत्याधुनिक सुविधा करण्यात आल्या असून व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुविधादेखील आहे. या इमारतीसोबतच कर्मचाºयांच्या निवासस्थानांची इमारतही उभारण्यात आली असून त्याचेदेखील यावेळी लोकार्पण करण्यात आले.या कार्यक्रमाला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, गडचिरोलीचे खासदार अशोक नेते, आमदार नाना श्यामकुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जि.प. सभापती ब्रिजभूषण पाझारे आदींची उपस्थिती होती.यावेळी ना.सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूरच्या प्राचीन इतिहासाचा उल्लेख करताना गोंड राजा खांडक्या बल्लाळशाह यांची प्राचीन राजधानी ही बल्लारपूर होती. त्यानंतर ती चंद्रपूरला हलविण्यात आली. त्यामुळे या शहराच्या गतवैभवाला जोपासण्याचे दायित्व पार पाडणे गरजेचे असल्याचे सांगितले. नजीकच्या काळात बल्लारपूर शहराच्या विकासामध्ये तसेच लौकिकामध्ये भर टाकणाºया अनेक मोठ्या वास्तू व संस्था उभ्या राहत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या ठिकाणावरून जनतेने सातत्याने आपल्याला विधानसभेत पाठवत मोठे केले आहे. त्यामुळे बल्लारपूर सर्वात सुंदर शहर होईल, असे आश्वासन आपण गांधी चौकातल्या सभेत जनतेला दिले होते. बल्लारपूरचे रेल्वे स्थानक भारतातील सर्वात सुंदर रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जात आहे. बल्लारपूरजवळ महाराष्ट्रातली दुसरी शासकीय सैनिकी शाळा पुढील वर्षीपासून पहिल्या टप्प्यात सुरू होणार आहे. बल्लारपूरमध्ये निर्माणाधीन असलेले क्रीडा संकूल आॅलिम्पिकपटू तयार करण्याच्या दर्जाचे व्हावे, यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे. बल्लारपूर व परिसरातील जनतेला आता मुंबईच्या नेहरू तारांगणमध्ये जावे लागणार नाही. बंगलोरच्या धर्तीवर तयार होणाºया बॉटनिकल गार्डनमध्ये येथील जिज्ञासू विद्यार्थ्यांसाठी अटल प्लॅनेटोरियम उभारले जात आहे. बल्लारपूर शहरातील आवास योजने संदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा करताना बल्लारपुरातील नागरिकांना आवास योजनेतून तीन हजार अत्याधुनिक घरे उपलब्ध केली जातील, असे ना.मुनगंटीवार यांनी सांगितले.वैद्यकीय महाविद्यालयाचे उपकेंद्र बल्लारपुरातया शहरातील उद्योग व्यवसायाच्या वारस्याला जपत या ठिकाणी डायमंड कटींग सेंटर सुरू करण्यात आले आहे. हिºयांना पैलू पाडण्याच्या नकाशावर आता बल्लारपूर आले आहे. चंद्रपूर येथे निर्माण होणाºया वैद्यकीय महाविद्यालयाचे एक उपकेंद्र बल्लारपूरला सुरू करण्यात येणार आहे. बल्लारपूर शहर व मतदार संघातील सर्व जनतेला शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, यासाठी हा परिसर आरोयुक्त पाण्याच्या पुरवठ्याचा भाग करण्याचा आपला मानस आहे. याशिवाय शंभर टक्के गॅस वापरणारा तालुका म्हणूनही बल्लारपूरची ओळख निर्माण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.आवश्यक तेवढा निधी केंद्राकडून देऊ -अहीरबल्लारपूर येथे तयार झालेल्या नव्या इमारतीतून महाराष्ट्राच्या पोलीस व्यवस्थेतील दर्जेदार कार्याची अपेक्षा राहील, असे यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले. बल्लारपूर व परिसरासाठी केंद्र शासनाच्या विविध योजनातून आवश्यकता असेल तिथे निधी उपलब्ध करण्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आमदार नाना श्यामकुळे यांनी गेल्या सत्तर वर्षात मिळाला नसेल इतका निधी चंद्रपूर जिल्ह्याला ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकाळात मिळाला असल्याचे सांगितले.