शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

डास प्रतिबंध फ‌वारणी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:20 IST

रस्त्याची दुरुस्ती करावी चंद्रपूर: जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम ...

रस्त्याची दुरुस्ती करावी

चंद्रपूर: जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामीण भागातील रस्त्याचे सर्वेक्षण करून तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे. औद्योगिक शहर म्हणून चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. त्यामुळे येथे परिसरातून मोठ्या संख्येने वाहनधारक येतात. मात्र खड्ड्यांमुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

वीज पुरवठा सुरळीत करावा

चंद्रपूर : तालुक्यातील काही गावात विजेचा सतत लपंडाव सुरू असून व्यावसायिकांचेही मोठे नुकसान होत आहे. याकडे वीज वितरणने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

इंटरनेटअभावी शेकडो ग्राहक त्रस्त

चंद्रपूर : तालुक्यात दूरसंचार विभागाची इंटरनेटसेवा ढीम्म असल्याने नागरिकांना व्यवहार करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. काही बँकांमध्येही हीच समस्या असल्यामुळे ग्राहकांना ताटकळत राहावे लागते. इंटरनेटसेवा सुरळीत करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.

कर्ज प्रस्ताव मंजूर करावे

चंद्रपूर : शासनातील विविध विभागांमध्ये नोकर भरतीवर बंदी असल्याने युवक स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करीत आहेत़ मात्र, कर्ज मिळत नसल्याने व्यवसाय कसा उभारावा, हा प्रश्न निर्माण झाला़ त्यामुळे तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांची अडचण वाढली आहे.

अन्नपदार्थांची उघड्यावर विक्री

चंद्रपूर : पावसाळा सुरू झाला असून अस्वच्छतेच्या वातावरणात अन्नपदार्थांची विक्री केल्यास नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. शहरातील मुख्य मार्गावर अनेक ठिकाणी खाद्यपदार्थ्यांची दुकाने लावली जात आहेत. त्यामुळे मनपा तसेच अन्न, औषध प्रशासनाने कारवाई सुरू करून उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

पावसाचा बांधकामाला फटका

चंद्रपूर : शहरात अनेक ठिकाणी रस्ते खोदून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू केले. त्यानंतर कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्याने काम बंद होते. मागील काही दिवसापूर्वी शिथिलता दिल्यानंतर काम सुरु करण्यात आले. मात्र आता पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने खोदकाम केल्यानंतर रस्त्यावर पडलेल्या मातीने रस्ते चिखलमय झाले आहेत. या चिखलामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

रस्त्यावरील फांद्या जीवघेण्या

चंद्रपूर : जिल्ह्यातील काही रस्त्यावरील झाडांच्या फांद्या जीवघेण्या ठरत आहेत. त्यामुळे या फांद्याची छाटणी करावी, अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात आली.

कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

चंद्रपूर : शहरात कुत्र्यांची संख्या वाढली असून त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रात्री-बेरात्री ही कुत्री अंगावर धावून येत असल्याने रात्रपाळीमध्ये कामाला जाणाऱ्यांची मोठी फजिती होत आहे. त्यामुळे कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.