शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपुरात स्वच्छतेवर अधिक जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:01 IST

नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता आणली आणि आभियानानंतरही स्वच्छता कायम ठेवण्यात यशस्वी झालेत, त्याचा काही फायदा कोरोना संक्रमणात त्या शहराला, कोरोनापासून दूर राहण्याचा झाला आहे. बल्लारपूर तालुक्यातही यामुळे काही प्रमाणात फायदा झाला. बल्लारपूर शहरात उघड्यावर शौचाला बसण्याचे प्रमाण बरेच होते. त्यामुळे रस्त्यालगत घाण दिसत होती.

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर: कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरिता दक्षता घेण्यात स्वच्छतेला सर्वात अधिक महत्त्व आहे. या संदर्भात महत्वाची बाब अशी, स्वच्छ भारत अभियान देशभरात जोरात चालले. गाव हागणदारी मुक्त करण्यावर भर देण्यात आला. स्वच्छता अभियान ज्या ज्या गाव-शहरांनी चांगल्या प्रकारे आपल्या क्षेत्रात राबविले. नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता आणली आणि आभियानानंतरही स्वच्छता कायम ठेवण्यात यशस्वी झालेत, त्याचा काही फायदा कोरोना संक्रमणात त्या शहराला, कोरोनापासून दूर राहण्याचा झाला आहे. बल्लारपूर तालुक्यातही यामुळे काही प्रमाणात फायदा झाला.बल्लारपूर शहरात उघड्यावर शौचाला बसण्याचे प्रमाण बरेच होते. त्यामुळे रस्त्यालगत घाण दिसत होती. पावसाळ्यात तर अशा रस्त्याने जाणे कठीण झाले होते. स्वच्छता अभियान सुरू झाले, नगर पालिकेने त्याकडे विशेष लक्ष दिले. घर तेथे शौचालय असायालाच हवे, हा नियम केला. नागरिकांना त्याकरिता प्रेरित केले. वार्डामध्ये पुरेशा संख्येने सार्वजनिक शौचालय बांधले आणि उघड्यावर बसणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली. याकरिता नगरपालिका प्रशासनाला कडक व्हावे लागले. त्याचा चांगला परिणाम झाला. नागरिकांना स्वच्छतेची सवय लागली. लहान मुलही कुठे उघड्यावर बसल्याचे येथे आज दिसून येत नाही. यासोबतच, घर-परिसर स्वच्छ ठेवण्याकडे लक्ष केंद्रित केले. घरचा कचरा संकलित करण्याकरिता सर्व घरी कचराकुंडी दिल्या. या उपक्रमामुळे शहर स्वच्छ व सुंदर झाले. स्वच्छतेचे मोल नागरिकांच्या लक्षात आले. यामुळेच, कोरोना प्रसंगी नागरिकांना स्वच्छतेवर भर द्या,असे जबरीने सांगण्याची वेळ आली नाही. नागरिक सॅनिटायझरचा वापर स्वयंस्फूर्तीने करू लागले आहेत. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानाचा शहरात फायदा झाला आहे.पावसाळ्यापूर्वीची स्वच्छता सुरूपावसात अस्वच्छतेमुळे ताप, मलेरिया पोटांचे विकार विविध रोग पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे, पावसाचे दिवसात स्वच्छतेकडे लक्ष देणे, गाव स्वच्छ ठेवणे आवश्यक झाले आहे. बल्लारपूर नगर पालिकेने त्याची तयारी सुरू केली असून मोठया नाल्या व शहराअंतर्गत लहान लहान नाल्यांच्या सफाईचे काम सुरु केले आहे. तद्वतच, कोरोनामुळे शहरात निजंर्तुकरणावरही भर देण्यात येत असल्याचे बल्लारपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी विपीन मुगधा यांनी सांगितले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या