शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

बल्लारपुरात स्वच्छतेवर अधिक जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:01 IST

नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता आणली आणि आभियानानंतरही स्वच्छता कायम ठेवण्यात यशस्वी झालेत, त्याचा काही फायदा कोरोना संक्रमणात त्या शहराला, कोरोनापासून दूर राहण्याचा झाला आहे. बल्लारपूर तालुक्यातही यामुळे काही प्रमाणात फायदा झाला. बल्लारपूर शहरात उघड्यावर शौचाला बसण्याचे प्रमाण बरेच होते. त्यामुळे रस्त्यालगत घाण दिसत होती.

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर: कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरिता दक्षता घेण्यात स्वच्छतेला सर्वात अधिक महत्त्व आहे. या संदर्भात महत्वाची बाब अशी, स्वच्छ भारत अभियान देशभरात जोरात चालले. गाव हागणदारी मुक्त करण्यावर भर देण्यात आला. स्वच्छता अभियान ज्या ज्या गाव-शहरांनी चांगल्या प्रकारे आपल्या क्षेत्रात राबविले. नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता आणली आणि आभियानानंतरही स्वच्छता कायम ठेवण्यात यशस्वी झालेत, त्याचा काही फायदा कोरोना संक्रमणात त्या शहराला, कोरोनापासून दूर राहण्याचा झाला आहे. बल्लारपूर तालुक्यातही यामुळे काही प्रमाणात फायदा झाला.बल्लारपूर शहरात उघड्यावर शौचाला बसण्याचे प्रमाण बरेच होते. त्यामुळे रस्त्यालगत घाण दिसत होती. पावसाळ्यात तर अशा रस्त्याने जाणे कठीण झाले होते. स्वच्छता अभियान सुरू झाले, नगर पालिकेने त्याकडे विशेष लक्ष दिले. घर तेथे शौचालय असायालाच हवे, हा नियम केला. नागरिकांना त्याकरिता प्रेरित केले. वार्डामध्ये पुरेशा संख्येने सार्वजनिक शौचालय बांधले आणि उघड्यावर बसणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली. याकरिता नगरपालिका प्रशासनाला कडक व्हावे लागले. त्याचा चांगला परिणाम झाला. नागरिकांना स्वच्छतेची सवय लागली. लहान मुलही कुठे उघड्यावर बसल्याचे येथे आज दिसून येत नाही. यासोबतच, घर-परिसर स्वच्छ ठेवण्याकडे लक्ष केंद्रित केले. घरचा कचरा संकलित करण्याकरिता सर्व घरी कचराकुंडी दिल्या. या उपक्रमामुळे शहर स्वच्छ व सुंदर झाले. स्वच्छतेचे मोल नागरिकांच्या लक्षात आले. यामुळेच, कोरोना प्रसंगी नागरिकांना स्वच्छतेवर भर द्या,असे जबरीने सांगण्याची वेळ आली नाही. नागरिक सॅनिटायझरचा वापर स्वयंस्फूर्तीने करू लागले आहेत. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानाचा शहरात फायदा झाला आहे.पावसाळ्यापूर्वीची स्वच्छता सुरूपावसात अस्वच्छतेमुळे ताप, मलेरिया पोटांचे विकार विविध रोग पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे, पावसाचे दिवसात स्वच्छतेकडे लक्ष देणे, गाव स्वच्छ ठेवणे आवश्यक झाले आहे. बल्लारपूर नगर पालिकेने त्याची तयारी सुरू केली असून मोठया नाल्या व शहराअंतर्गत लहान लहान नाल्यांच्या सफाईचे काम सुरु केले आहे. तद्वतच, कोरोनामुळे शहरात निजंर्तुकरणावरही भर देण्यात येत असल्याचे बल्लारपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी विपीन मुगधा यांनी सांगितले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या