शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

मातंग समाजबांधवांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 23:46 IST

राज्यात मातंग समाजाच्या चार कुटुंबांवर जातीयवादी लोकांनी हल्ले केले. त्या हल्ल्याच्या निषेधार्थ जिवती तालुक्यामध्ये लहुजी ब्रिगेड, मुक्ताई ब्रिगेड व लोकस्वराज्य आंदोलनच्या वतीने निषेध मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देराज्यात मातंग समाजाच्या चार कुटुंबांवर जातीयवादी लोकांनी हल्ले केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : राज्यात मातंग समाजाच्या चार कुटुंबांवर जातीयवादी लोकांनी हल्ले केले. त्या हल्ल्याच्या निषेधार्थ जिवती तालुक्यामध्ये लहुजी ब्रिगेड, मुक्ताई ब्रिगेड व लोकस्वराज्य आंदोलनच्या वतीने निषेध मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.या मोर्चात तालुक्यातील सर्वच गावातून शाळकरी मुली व महिला या मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. आपल्या समाजबांधवावर हल्ला झाल्याने युवक व नागरिक गावागावातून पहिल्यांदाच हजारोंच्या संख्येने जिवती येथे या मोर्चाकरिता आल्याने सर्वच मार्ग काही वेळ बंद करण्यात आली होती. तहसिलदारांंच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.या मोर्चामध्ये शांता कसबे, विठ्ठल वाघ, गणेश वाघमारे यांच्या मारेकºयांना फाशी झाली पाहिजे व मळगे कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे तसेच दाभोलकर, कॉम्रेड पानसरे, डॉ.कलबुर्गी, कोपर्डी प्रकरण, पत्रकार गौरी लंकेश यांच्याही मारेकºयाला फाशी व्हावी, अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना लहुजी ब्रिगेड व मुक्ताई ब्रिगेड तसेच लोकस्वराज्य आंदोलनाचे पदाधिकारी डॉ.अंकुश गोतावळे, व्यंकटी जोगरे, रमाकांत जगापले, दोरे, भानूदास जाधव, देविदास कांबळे, दत्तात्रय गायकवाड, तानाजी कांबळे, विजय गोतावळे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.निषेध मोर्चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहापासून काढण्यात आला.यात हजारोंच्या संख्येनी समाजबांधव पहिल्यांदाच रस्त्यावर उतरल्याने मोर्चा चर्चेचा विषय ठरला. शिस्तीत व नियोजनबद्ध पद्धतीने काढण्यात आलेल्या मोर्चात आदिवासी संघटना, अल्पसंख्यांक संघटना, बंजारा संघटनेने पाठिंबा दर्शविल्याने व स्वत: हजर राहल्याने हा मोर्चा तालुक्यात पुढच्या काळात बदल करणारा असल्याचे दिसून आले. मोर्चाचे प्रास्ताविक दत्तराज गायकवाड यांनी तर गोदरन पाटील जुमनाके, जाधव, कांबळे, जयश्री गोतावळे, डॉ.अंकुश गोतावळे आदींनी निषेध मोर्चाला संबोधित केले. संचालन सुग्रीव गोतावळे तर आभार विजय गोतावळे यांनी मानले.अन्यथा तीव्र आंदोलनसमाजबांधवांवर सतत होणारा अत्याचार कधीही खपवून घेतला जाणार नाही. शासनाने मोर्चाची दखल घेत आरोपींवर कारवाई करून अटक न केल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समाजबांधवांनी दिला आहे. त्यामुळे शासनाने दखल घेण्याची मागणी आहे.