शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

मातंग समाजबांधवांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 23:46 IST

राज्यात मातंग समाजाच्या चार कुटुंबांवर जातीयवादी लोकांनी हल्ले केले. त्या हल्ल्याच्या निषेधार्थ जिवती तालुक्यामध्ये लहुजी ब्रिगेड, मुक्ताई ब्रिगेड व लोकस्वराज्य आंदोलनच्या वतीने निषेध मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देराज्यात मातंग समाजाच्या चार कुटुंबांवर जातीयवादी लोकांनी हल्ले केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : राज्यात मातंग समाजाच्या चार कुटुंबांवर जातीयवादी लोकांनी हल्ले केले. त्या हल्ल्याच्या निषेधार्थ जिवती तालुक्यामध्ये लहुजी ब्रिगेड, मुक्ताई ब्रिगेड व लोकस्वराज्य आंदोलनच्या वतीने निषेध मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.या मोर्चात तालुक्यातील सर्वच गावातून शाळकरी मुली व महिला या मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. आपल्या समाजबांधवावर हल्ला झाल्याने युवक व नागरिक गावागावातून पहिल्यांदाच हजारोंच्या संख्येने जिवती येथे या मोर्चाकरिता आल्याने सर्वच मार्ग काही वेळ बंद करण्यात आली होती. तहसिलदारांंच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.या मोर्चामध्ये शांता कसबे, विठ्ठल वाघ, गणेश वाघमारे यांच्या मारेकºयांना फाशी झाली पाहिजे व मळगे कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे तसेच दाभोलकर, कॉम्रेड पानसरे, डॉ.कलबुर्गी, कोपर्डी प्रकरण, पत्रकार गौरी लंकेश यांच्याही मारेकºयाला फाशी व्हावी, अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना लहुजी ब्रिगेड व मुक्ताई ब्रिगेड तसेच लोकस्वराज्य आंदोलनाचे पदाधिकारी डॉ.अंकुश गोतावळे, व्यंकटी जोगरे, रमाकांत जगापले, दोरे, भानूदास जाधव, देविदास कांबळे, दत्तात्रय गायकवाड, तानाजी कांबळे, विजय गोतावळे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.निषेध मोर्चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहापासून काढण्यात आला.यात हजारोंच्या संख्येनी समाजबांधव पहिल्यांदाच रस्त्यावर उतरल्याने मोर्चा चर्चेचा विषय ठरला. शिस्तीत व नियोजनबद्ध पद्धतीने काढण्यात आलेल्या मोर्चात आदिवासी संघटना, अल्पसंख्यांक संघटना, बंजारा संघटनेने पाठिंबा दर्शविल्याने व स्वत: हजर राहल्याने हा मोर्चा तालुक्यात पुढच्या काळात बदल करणारा असल्याचे दिसून आले. मोर्चाचे प्रास्ताविक दत्तराज गायकवाड यांनी तर गोदरन पाटील जुमनाके, जाधव, कांबळे, जयश्री गोतावळे, डॉ.अंकुश गोतावळे आदींनी निषेध मोर्चाला संबोधित केले. संचालन सुग्रीव गोतावळे तर आभार विजय गोतावळे यांनी मानले.अन्यथा तीव्र आंदोलनसमाजबांधवांवर सतत होणारा अत्याचार कधीही खपवून घेतला जाणार नाही. शासनाने मोर्चाची दखल घेत आरोपींवर कारवाई करून अटक न केल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समाजबांधवांनी दिला आहे. त्यामुळे शासनाने दखल घेण्याची मागणी आहे.