शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

वरोऱ्याच्या महावितरण कार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: June 14, 2016 00:32 IST

भद्रावती व वरोरा तालुक्यातील वीज ग्राहकांना मागील काही महिन्यांपासून विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

बाळू धानोरकर यांचे नेतृत्व : सात दिवसांचा अल्टीमेटम वरोरा : भद्रावती व वरोरा तालुक्यातील वीज ग्राहकांना मागील काही महिन्यांपासून विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वीज वितरण कंपनी वीज ग्राहकांच्या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत वीज ग्राहकांच्या समस्या त्वरीत सोडविण्याच्या मागणीकरिता सोमवारी वरोरा वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर आ. बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. मागण्या सात दिवसात निकाली काढल्या नाही तर पूर्वसूचनेविना पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.वरोरा व भद्रावती तालुक्यातील मेंटन्सची कामे जून महिना सुरू होवूनही वीज वितरण कंपनीकडून पूर्ण करण्यात आली नाही. त्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने वरोरा व भद्रावती तालुक्यातील वीज ग्राहकांना तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वीज वितरण कंपनीचे बहुतांश अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने वीज कार्यालयातील अनेकांची कामे प्रलंबीत आहे. अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने नागरिक आपल्या समस्या सोडवू शकत नाही. वरोरा व भद्रावती शहरातील वीज लाईन भूमिगत करण्यात यावी, वाकलेले वीजेचे खांब सरळ करण्यात यावे, नादुरुस्त ट्रान्सफार्मर त्वरीत बदलविण्यात यावे, वीज पुरवठा घेताना ग्रामपंचायत व नगर पालिकेचे नाहरकत प्रमाणपत्र सादर केल्यानंतर १०० रुपयाच्या स्टॅम्पपेपरवर अटी असलेले जोडण्याची सक्ती केली जाते, ती सक्ती बंद करावी, आदी मागण्या मोर्चादरम्यान करण्यात आल्या. कार्यकारी अभियंता नगराळे यांनी निवेदन स्वीकारले. (तालुका प्रतिनिधी)वीज पुरवठा सुरू करण्यासाठी कोठारी येथे गावकऱ्यांचा ‘राडा’कोठारी : मागील १० महिन्यापासून गावातील वीज पुरवठा खंडीत होत आहे. त्याबाबत गावकऱ्यांनी अनेकदा अधिकाऱ्यांना तक्रारी दिल्या. वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून नियमित वीज पुरवठा करण्याबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तरीही कोठारीतील विजेचा लपंडाव नियमित होता. अशात सतत दोन दिवस कुठलेही ठोस कारण नसताना वीज बेपत्ता झाली. त्यामुळे लोकांच्या संयमाचा बांध फुटला व ६ जूनच्या रात्री १० वाजता वीज खंडीत झाल्याबरोबर लोकांनी वीज वितरण कार्यालयाकडे धाव घेतली. वीज कर्मचाऱ्यांच्या गचाळ कारभाराचा जाब विचारत दोन तास वाहतूक ठप्प करून टायर जाळून निषेध नोंदविला व राडा घातला. कोठारी येथील वीज वितरण कंपनीच्या शाखा कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर व शाखा अभियंत्यावर कुणाचाही वचक नाही. कोणताही कर्मचारी व अभियंता मुख्यालयाला राहत नाही. कुणाचे कोणत्याही कामावर नियंत्रण नाही. केवळ १० ते १५ कर्मचारी पगारासाठी वीज कार्यालयात दाखल होतात. मात्र गावातील समस्या निस्तारण्यासाठी प्रयत्न करीत नाहीत. असे कर्मचारी समवेत अभियंता वीज समस्या निर्माण झाल्यानंतर दुरूस्ती करण्याचे कारण पुढे करून येनबोडी येथे पार्टीत गुंग असतात. वीज पुरवठ्यासाठी गावकरी आक्रोश करीत असताना कर्मचारी मात्र पार्टीचा आनंद घेत असतात. ३३ के.व्ही. उपकेंद्रातील कर्मचारी व आॅपरेटरचा कामाबाबत कधीही आस्था दाखवित नाहीत. मात्र कार्यालयाच्या मागे व आॅपरेटर रूमच्या मागे दारूच्या बाटल्यांचा खच्च पडून आहे. त्यावरून वीज कर्मचारी कुठे गुंग असतात व नेमून दिलेल्या कामात किती तत्पर असतात हे दिसून येते. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे किती लक्ष केंद्रीत आहे किंवा ते कर्मचाऱ्यांच्या पार्टीत सहभागी होतात, असा संशय आहे. (वार्ताहर)