मुख्याधिकाऱ्यांना निवेदन : विविध मागण्यांचा समावेशगडचांदूर : गडचांदूर नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्र. एक मधील चुदरी ले-आऊट व मालवानी ले-आऊट येथील सांडपाण्याची विल्हेवाट लावावी, मुख्य पोच मार्ग मोकळा करावा, बिबी पाणदणवरील अतिक्रमण हटवावे या प्रमुख मागणीसाठी येथील शेकडो नागरिकांनी नगर परिषदेवर सोमवारी मोर्चा काढून मुख्याधिकारी यांना निवेदन दिले.मोर्चाचे नेतृत्व जिल्हा परिषद सदस्य अरुण निमजे, नगर पालिकेचे विरोधी गटनेते नीलेश ताजने, नगरसेवक विजयालक्ष्मी डोहे, अरुण डोहे, बबलू रासेकर, प्रवीण कोल्हे, धनराज विरुटकर, दामू केराम यांनी केले.मुख्याधिकारी रवींद्र ढाके व अभियंता जोगी यांनी तातडीने दखल घेऊन समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. चुदरी ले-आऊट व मालवाणी ले-आऊटमधील समस्या गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे. पालिका स्थापन झाल्यानंतर समस्या सुटेल अशी अपेक्षा होती. मात्र नागरिकांची निराशा झाली. पक्या नाल्या नसल्याने सांडपाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून दूषित पाणी विहिरीत जात असल्याने आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तत्कालीन मुख्याधिकारी सुनील बलाल यांनी घटनास्थळी भेट देऊन सांडपाणी मशिनद्वारे काढले होते. पक्की नाली करण्याचे आश्वासन दिले. मात्र ते पूर्ण झाले नसल्याचा आरोप नगरसेविका विजयालक्ष्मी डोहे यांनी केला. या मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. (वार्ताहर)चुदरी ले-आऊट व मालवाणी ले-आऊट मधील समस्या संदर्भात पालिकेला अनेकदा निवेदने दिली. मात्र सत्तारुढ पालिका पदाधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे मोर्चा काढूृन लक्ष वेधले.- नीलेश ताजने, विरोधी पक्ष नेते, न.प. गडचांदूर .
गडचांदूर येथील नागरिकांचा नगर परिषदेवर मोर्चा
By admin | Updated: August 12, 2015 00:46 IST