शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अन् आभाळातील चांदणे जमिनीवर अवतरले!

By admin | Updated: November 21, 2015 00:47 IST

कापसाला पांढऱ्या सोन्याची उपमा दिली आहे. अनेक नामवंत प्रतिभावान कवी, लेखकांनी भन्नाट कल्पनाशक्तीच्या जोरावर जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांचे दु:ख कवितेत मांडले.

मजुरांची कमतरता : वेचणीअभावी शेत झाले कापसाचे पांढरे रानप्रकाश काळे गोवरीकापसाला पांढऱ्या सोन्याची उपमा दिली आहे. अनेक नामवंत प्रतिभावान कवी, लेखकांनी भन्नाट कल्पनाशक्तीच्या जोरावर जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांचे दु:ख कवितेत मांडले. मात्र शेतकऱ्यांची वेदना तसुभरही कमी झाली नाही. मजुरांची वानवा आणि वेचणीअभावी कापूस झाडावर दिवसा लखलखत आहे. त्यामुळे शेत आता कापसाचे पांढरे रान झाल्याने जणू आभाळातील चांदणेच जमिनीवर अवतरल्याचा भास अनेकांना आश्चर्यचकीत करणारा आहे.शेतकऱ्यांची अवस्था आज बिकट आहे. परिस्थितीच गुलाब बनून जगणाऱ्या शेतकऱ्यांना आता कुणाचीही साथ उरली नाही. शेतात कापूस फुटून आहे. मजूर मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कापूस वेचणीला अजुनही प्रारंभ केला नाही. झाडावर पांढरे सोने लोंबकळत पडल्याने कोणत्याही क्षणी कापूस मातीमोल होण्याचा धोका आहे. परंतु, सारी परिस्थितीच शेतकऱ्यांना मारक झाल्याने शेतकरी पार कोलमडून गेला आहे. कापूस वेचणीचे भाव वधारले. मात्र त्या तुलनेत कापसाचे दर वाढले नाही. कापूस वेचणीला मजूरांच्या शोधात शेतकरी गावोगाव भटकंती करीत आहे. परंतु, मजुरांची वानवा असल्याने मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे पहाटे घरून मजुरांच्या शोधात निघालेला शेतकरी बाप निराश मनाने हताश होऊन रिकाम्या हाताने घरी परतत आहे. तर काही शेतकऱ्यांनी परप्रांतातून मजूर आणून कापूस वेचणी सुरू केली आहे. हा सारा मजुरीचा खर्च शेतकऱ्यांना परवडणारा नाही. मात्र वर्षभर उसनवारी करून शेतीवर केलेला खर्च एका धर्माधात पाण्यात जाईल, या भितीपोटी शेतकरी स्वत:च कापूस वेचणीच्या कामाला लागला आहे. घरातील चिमुकल्यांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वच कापूस वेचणीच्या कामात गुंतले आहे. कुटूंबातील लहान मुलेही कष्टकरी बापाला कापूस वेचणीसाठी आधार झाली आहेत. कापूस वेचणीसाठी परप्रांतातून आणलेल्या मजूरांना गरजेपोटी अनेक शेतकऱ्यांनी आपल्याच कुटूंबात राहण्याची जागा उपलब्ध करून दिली आहे. तर काही शेतकऱ्यांच्या घरी कापूस भरून असल्याने राहण्यासाठी सुद्धा जागा शिल्लक नाही. शेतकऱ्यांच्या शेतात पांढरे सोने उन्हाने लखलखायला लागले आहे. कापूस वेचणीचे दर वाढवूनही मजूर मिळणे कठिण असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. पांढऱ्या सोन्याची होत असलेली परवड थांबता थांबायलाही तयार नाही. शेतकऱ्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. मात्र शासकीय यंत्रणेला त्यावर उपाय शोधता आला नाही. कापूस वेचणीला मजुरांची वानवा असल्याने हिरवेगार दिसणारे शेत कापसाने पांढरे झाले आहे. त्यामुळे आभाळातील चांदणेच जमिनीवर अवतरल्याचा भास आश्चर्यचकीत करणारा आहे.