शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
4
"मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
5
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
6
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
7
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
8
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
9
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
10
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
11
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
12
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
13
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
14
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
15
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
16
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
17
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
18
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
19
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
20
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...

अन् आभाळातील चांदणे जमिनीवर अवतरले!

By admin | Updated: November 21, 2015 00:47 IST

कापसाला पांढऱ्या सोन्याची उपमा दिली आहे. अनेक नामवंत प्रतिभावान कवी, लेखकांनी भन्नाट कल्पनाशक्तीच्या जोरावर जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांचे दु:ख कवितेत मांडले.

मजुरांची कमतरता : वेचणीअभावी शेत झाले कापसाचे पांढरे रानप्रकाश काळे गोवरीकापसाला पांढऱ्या सोन्याची उपमा दिली आहे. अनेक नामवंत प्रतिभावान कवी, लेखकांनी भन्नाट कल्पनाशक्तीच्या जोरावर जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांचे दु:ख कवितेत मांडले. मात्र शेतकऱ्यांची वेदना तसुभरही कमी झाली नाही. मजुरांची वानवा आणि वेचणीअभावी कापूस झाडावर दिवसा लखलखत आहे. त्यामुळे शेत आता कापसाचे पांढरे रान झाल्याने जणू आभाळातील चांदणेच जमिनीवर अवतरल्याचा भास अनेकांना आश्चर्यचकीत करणारा आहे.शेतकऱ्यांची अवस्था आज बिकट आहे. परिस्थितीच गुलाब बनून जगणाऱ्या शेतकऱ्यांना आता कुणाचीही साथ उरली नाही. शेतात कापूस फुटून आहे. मजूर मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कापूस वेचणीला अजुनही प्रारंभ केला नाही. झाडावर पांढरे सोने लोंबकळत पडल्याने कोणत्याही क्षणी कापूस मातीमोल होण्याचा धोका आहे. परंतु, सारी परिस्थितीच शेतकऱ्यांना मारक झाल्याने शेतकरी पार कोलमडून गेला आहे. कापूस वेचणीचे भाव वधारले. मात्र त्या तुलनेत कापसाचे दर वाढले नाही. कापूस वेचणीला मजूरांच्या शोधात शेतकरी गावोगाव भटकंती करीत आहे. परंतु, मजुरांची वानवा असल्याने मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे पहाटे घरून मजुरांच्या शोधात निघालेला शेतकरी बाप निराश मनाने हताश होऊन रिकाम्या हाताने घरी परतत आहे. तर काही शेतकऱ्यांनी परप्रांतातून मजूर आणून कापूस वेचणी सुरू केली आहे. हा सारा मजुरीचा खर्च शेतकऱ्यांना परवडणारा नाही. मात्र वर्षभर उसनवारी करून शेतीवर केलेला खर्च एका धर्माधात पाण्यात जाईल, या भितीपोटी शेतकरी स्वत:च कापूस वेचणीच्या कामाला लागला आहे. घरातील चिमुकल्यांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वच कापूस वेचणीच्या कामात गुंतले आहे. कुटूंबातील लहान मुलेही कष्टकरी बापाला कापूस वेचणीसाठी आधार झाली आहेत. कापूस वेचणीसाठी परप्रांतातून आणलेल्या मजूरांना गरजेपोटी अनेक शेतकऱ्यांनी आपल्याच कुटूंबात राहण्याची जागा उपलब्ध करून दिली आहे. तर काही शेतकऱ्यांच्या घरी कापूस भरून असल्याने राहण्यासाठी सुद्धा जागा शिल्लक नाही. शेतकऱ्यांच्या शेतात पांढरे सोने उन्हाने लखलखायला लागले आहे. कापूस वेचणीचे दर वाढवूनही मजूर मिळणे कठिण असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. पांढऱ्या सोन्याची होत असलेली परवड थांबता थांबायलाही तयार नाही. शेतकऱ्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. मात्र शासकीय यंत्रणेला त्यावर उपाय शोधता आला नाही. कापूस वेचणीला मजुरांची वानवा असल्याने हिरवेगार दिसणारे शेत कापसाने पांढरे झाले आहे. त्यामुळे आभाळातील चांदणेच जमिनीवर अवतरल्याचा भास आश्चर्यचकीत करणारा आहे.