शहरं
Join us  
Trending Stories
1
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
2
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
3
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
4
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
5
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"
6
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
7
"देशात परिस्थिती काय अन् ही थायलंडमध्ये...", नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगमुळे भारती सिंहला रडू कोसळलं
8
व्यवसायातही कोहलीची 'विराट' कामगिरी; फक्त टॅक्सच ६६ कोटींचा भरला; नेटवर्थ किती असेल?
9
अरेच्चा! तालिबान सरकारने अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर घातली बंदी, कारण...
10
7 मे रोहित अन् 12 मे विराट; टेस्ट क्रिकेटमधून 'ROKO' युगाचा अंत, अशी होती दोघांची कारकीर्द
11
हैदराबादच्या प्रसिद्ध 'कराची बेकरी'ची तोडफोड; पाकिस्तानविरोधी घोषणा देत केली 'ही' मागणी
12
लग्नाच्या पहिल्याच रात्री पती टेरेसवर झोपला, नववधूचा शाळेपासूनचा प्रियकर आला, अन्...
13
Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार
14
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केले होते ३२ विमानतळ, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
15
अभिनेता स्टेजवर अचानक बेशुद्ध होऊन कोसळला! तातडीने रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?
16
निष्काळजीपणाचा कळस! आई आजारी, लेकाच्या हातात रक्ताची बॉटल; नवऱ्याने ओढला स्ट्रेचर अन्...
17
सचिन तेंडुलकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बघतात! समीर चौघुलेंनी सांगितला किस्सा, म्हणाले- "त्यांनी माझं स्कीट.."
18
पायऱ्या चढा किंवा उतरा आणि हार्ट ॲटॅकची भीती विसरा; गंभीर आजारही होतील छूमंतर
19
Numerology: ७, १६ आणि २५ जन्मतारीख असलेल्यांना जन्मतः मिळते चाणाक्ष बुद्धी आणि तीक्ष्ण नजर!
20
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश

मान्सून धडकला...!

By admin | Updated: June 11, 2015 01:26 IST

गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली होती.

शेतकऱ्यांत आनंद : पेरणी कामांना येणार वेगचंद्रपूर : गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली होती. मृग नक्षत्राला सुरूवात होऊन तीन दिवसांचा कालावधी लोटत नाही तर बुधवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी काही प्रमाणात सुखावला असून पेरणी कामांना आता वेग येणार आहे.रोहिणी नक्षत्र संपून मृग नक्षत्राला ८ जूनला सुरूवात झाली. यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने मृग नक्षत्रात पाऊस पडल्यास पेरणी करण्याचे अनेक शेतकऱ्यांनी नियोजन केले. बी-बियाणांची जुळवाजुळव, खताची खरेदी, मशागत पूर्व कामे यापूर्वीच पार पडली आणि पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. मात्र पाऊस झाला नाही. त्यामुळे यावर्षीसुध्दा पाऊस लांबणीवर जाणार का, हवामान खात्याचा अंदाज खोटा ठरणार का, अशी शेतकऱ्यांत चर्चा होती. मात्र बुधवारी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी काही प्रमाणात समाधान व्यक्त केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)घुग्घुस, सावली येथे वादळी पाऊसघुग्घुस व सावली येथेही सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेकांच्या घरांवरचे टिनाचे पत्रे उडाली. वादळामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्याने येथील वीज पुरवठा पुर्णत: बंद झाला होता. नवरगाव येथे वादळाने अनेकांचे नुकसानबुधवारी सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने नवरगाव येथील अनेक नागरिकांना फटका बसला. घरावरील टिनाचे पत्रे, कवेलू वादळामुळे उडाले. तर अनेक झाडेही उन्मळून पडली. त्यामुळे येथील वीज पुरवठा बंद झाला होता.वीज पडून दोन बैलांचा मृत्यूवीज पडून दोन बैलांचा मृत्यू झाल्याची घटना जिवती तालुक्यातील वणी खुर्द या गावात बुधवारी घडली. बुधवारी जिवती तालुक्यातही वादळी पावसाने हजेरी लावली.ंपावसाने मनपाची पोल खोलचंद्रपुरात बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसाने मनपा प्रशासनाची पुन्हा एखादा पोल खोलली. मान्सूनपूर्व नाल्यांची साफसफाई केली जात असली तरी अनेक नाल्या कचऱ्याने तुंबल्या आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होऊन पाणी रस्त्यावरून वाहत होते. जयंत टॉकीज परिसरातील मुख्य मार्गावर पाणी साचल्याने वाहनधारकांना साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागला. तर अनेक ठिकाणी चिखल पसरला आहे.