शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

मान्सून धडकला...!

By admin | Updated: June 11, 2015 01:26 IST

गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली होती.

शेतकऱ्यांत आनंद : पेरणी कामांना येणार वेगचंद्रपूर : गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली होती. मृग नक्षत्राला सुरूवात होऊन तीन दिवसांचा कालावधी लोटत नाही तर बुधवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी काही प्रमाणात सुखावला असून पेरणी कामांना आता वेग येणार आहे.रोहिणी नक्षत्र संपून मृग नक्षत्राला ८ जूनला सुरूवात झाली. यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने मृग नक्षत्रात पाऊस पडल्यास पेरणी करण्याचे अनेक शेतकऱ्यांनी नियोजन केले. बी-बियाणांची जुळवाजुळव, खताची खरेदी, मशागत पूर्व कामे यापूर्वीच पार पडली आणि पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. मात्र पाऊस झाला नाही. त्यामुळे यावर्षीसुध्दा पाऊस लांबणीवर जाणार का, हवामान खात्याचा अंदाज खोटा ठरणार का, अशी शेतकऱ्यांत चर्चा होती. मात्र बुधवारी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी काही प्रमाणात समाधान व्यक्त केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)घुग्घुस, सावली येथे वादळी पाऊसघुग्घुस व सावली येथेही सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेकांच्या घरांवरचे टिनाचे पत्रे उडाली. वादळामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्याने येथील वीज पुरवठा पुर्णत: बंद झाला होता. नवरगाव येथे वादळाने अनेकांचे नुकसानबुधवारी सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने नवरगाव येथील अनेक नागरिकांना फटका बसला. घरावरील टिनाचे पत्रे, कवेलू वादळामुळे उडाले. तर अनेक झाडेही उन्मळून पडली. त्यामुळे येथील वीज पुरवठा बंद झाला होता.वीज पडून दोन बैलांचा मृत्यूवीज पडून दोन बैलांचा मृत्यू झाल्याची घटना जिवती तालुक्यातील वणी खुर्द या गावात बुधवारी घडली. बुधवारी जिवती तालुक्यातही वादळी पावसाने हजेरी लावली.ंपावसाने मनपाची पोल खोलचंद्रपुरात बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसाने मनपा प्रशासनाची पुन्हा एखादा पोल खोलली. मान्सूनपूर्व नाल्यांची साफसफाई केली जात असली तरी अनेक नाल्या कचऱ्याने तुंबल्या आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होऊन पाणी रस्त्यावरून वाहत होते. जयंत टॉकीज परिसरातील मुख्य मार्गावर पाणी साचल्याने वाहनधारकांना साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागला. तर अनेक ठिकाणी चिखल पसरला आहे.