शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

मान्सून धडकला...!

By admin | Updated: June 11, 2015 01:26 IST

गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली होती.

शेतकऱ्यांत आनंद : पेरणी कामांना येणार वेगचंद्रपूर : गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली होती. मृग नक्षत्राला सुरूवात होऊन तीन दिवसांचा कालावधी लोटत नाही तर बुधवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी काही प्रमाणात सुखावला असून पेरणी कामांना आता वेग येणार आहे.रोहिणी नक्षत्र संपून मृग नक्षत्राला ८ जूनला सुरूवात झाली. यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने मृग नक्षत्रात पाऊस पडल्यास पेरणी करण्याचे अनेक शेतकऱ्यांनी नियोजन केले. बी-बियाणांची जुळवाजुळव, खताची खरेदी, मशागत पूर्व कामे यापूर्वीच पार पडली आणि पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. मात्र पाऊस झाला नाही. त्यामुळे यावर्षीसुध्दा पाऊस लांबणीवर जाणार का, हवामान खात्याचा अंदाज खोटा ठरणार का, अशी शेतकऱ्यांत चर्चा होती. मात्र बुधवारी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी काही प्रमाणात समाधान व्यक्त केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)घुग्घुस, सावली येथे वादळी पाऊसघुग्घुस व सावली येथेही सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेकांच्या घरांवरचे टिनाचे पत्रे उडाली. वादळामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्याने येथील वीज पुरवठा पुर्णत: बंद झाला होता. नवरगाव येथे वादळाने अनेकांचे नुकसानबुधवारी सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने नवरगाव येथील अनेक नागरिकांना फटका बसला. घरावरील टिनाचे पत्रे, कवेलू वादळामुळे उडाले. तर अनेक झाडेही उन्मळून पडली. त्यामुळे येथील वीज पुरवठा बंद झाला होता.वीज पडून दोन बैलांचा मृत्यूवीज पडून दोन बैलांचा मृत्यू झाल्याची घटना जिवती तालुक्यातील वणी खुर्द या गावात बुधवारी घडली. बुधवारी जिवती तालुक्यातही वादळी पावसाने हजेरी लावली.ंपावसाने मनपाची पोल खोलचंद्रपुरात बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसाने मनपा प्रशासनाची पुन्हा एखादा पोल खोलली. मान्सूनपूर्व नाल्यांची साफसफाई केली जात असली तरी अनेक नाल्या कचऱ्याने तुंबल्या आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होऊन पाणी रस्त्यावरून वाहत होते. जयंत टॉकीज परिसरातील मुख्य मार्गावर पाणी साचल्याने वाहनधारकांना साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागला. तर अनेक ठिकाणी चिखल पसरला आहे.